शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकाधारकांना आता ओळख पटवून धान्य वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:06 IST

अकोला : आधार संलग्नित सार्वजनिक वितरण व्यवस्था (एईपीडीएस) प्रणालीचा वापर करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याची प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्हय़ात सुरू करण्यात येणार आहे; मात्र ज्या शिधापत्रिकाधारकांकडे ‘आधारकार्ड’ नाही, अशा शिधापत्रिकाधारकांना ओळख पटवून धान्य वितरित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे १ मार्चपासून अंमलबजावणी ‘एईपीडीएस’ प्रणालीचा होणार वापर

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आधार संलग्नित सार्वजनिक वितरण व्यवस्था (एईपीडीएस) प्रणालीचा वापर करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याची प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्हय़ात सुरू करण्यात येणार आहे; मात्र ज्या शिधापत्रिकाधारकांकडे ‘आधारकार्ड’ नाही, अशा शिधापत्रिकाधारकांना ओळख पटवून धान्य वितरित करण्यात येणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्या असून, त्याद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवून पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यामध्ये सध्या राज्यातील नागपूर, सोलापूर, वाशिम, जालना, नांदेड, कोल्हापूर, हिंगोली, वर्धा व भंडारा  या जिल्हय़ातील रास्त भाव दुकानांत आधार संलग्नित सार्वजनिक वितरण व्यवस्था (एईपीडीएस) या अद्ययावत प्रणालीचा वापर करून धान्य वितरित करण्यात येत आहे. या पृष्ठभूमीवर अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या गत २ फेब्रुवारी रोजीच्या पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हय़ात १ मार्चपासून ‘एईपीडीएस’ प्रणालीचा वापर करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित करण्यात आलेल्या शिधपत्रिकाधारकांना ‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्य वितरित करण्यात येणार आहे. तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक संलग्नित करण्यात आले नाही, अशा शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक संलग्नित (लिंक) करण्यात येणार आहेत; मात्र ज्या शिधापत्रिकाधारकांकडे आधारकार्ड किंवा आधार क्रमांक नाही, अशा शिधापत्रिकाधारकांना त्यांची ओळख पटवून धान्य वाटप करण्यात येणार आहे. आधार क्रमांक ‘लिंक’ असलेल्या गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठय़ांमार्फत आधारकार्ड नसलेल्या शिधापत्रिकाधारकांची ओळख पटविण्यात येणार असून,ओळख पटवून संबंधित शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यात येणार आहे.

‘डीएसओं’नी मागितली सरपंच, तलाठय़ांची माहिती!आधारकार्ड नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना ओळख पटवून रास्त भाव दुकानांमधून धान्य वितरित करण्यात येणार आहे. गाव पातळीवर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व ग्रामसेवकांमार्फत संबंधित शिधापत्रिकाधारकांची ओळख पटविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने अकोला जिल्हय़ातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी त्यांचे आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक इत्यादी माहिती जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून (डीएसओ) मागविण्यात आली आहे. अशीच माहिती इतर जिल्हय़ातही ‘डीएसओं’कडून मागविण्यात आली आहे.

‘एईपीडीएस’ प्रणालीचा वापर करून १ मार्चपासून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्या शिधापत्रिकांकडे आधार क्रमांक नाही, अशा शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवून धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हय़ातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचे आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक इत्यादी माहिती मागविण्यात आली आहे.- संतोष शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Akola cityअकोला शहर