शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

शिक्षणापासून वंचितांना आता मुक्त शाळेचा आधार!

By admin | Updated: September 8, 2014 00:51 IST

मध्येच शाळा सोडणार्‍यांना आठवीचे प्रमाणपत्र मिळणार

संतोष येलकर/ अकोलाशाळा मध्येच सोडली.. वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षण राहून गेले.. आठवीपर्यंतही शिक्षण झाले नाही, अशा १५ वर्षावरील व्यक्तींना यापुढे मुक्त शाळेतील शिक्षणाचा आधार मिळणारआहे. प्राथमिक शिक्षणही पूर्ण न करता मध्येच शाळा सोडणार्‍यांनां ाता इयत्ता आठवी उत्तीर्णचे प्रमाणपत्र राष्ट्रीय मुक्त शाळेमार्फत दिले जाणार आहे.शाळेत नाव टाकल्यानंतर मध्येच शाळा सोडली किंवा एक-दोन वर्ग शिकल्यानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे शाळा सोडावी लागल्यामुळे प्राथमिक शिक्षणही पूर्ण करू न शकलेल्या १५ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला आठवीपर्यंंतचे शिक्षण देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या १५ वर्षांवरील व्यक्तींचे वर्ग आणि चाचणी घेऊन, त्यांना इयत्ता आठवी उत्तीर्णचे प्रमाणपत्र देण्याची योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मुक्त शाळेमार्फत लवकरच राबविली जाणार आहे. त्यासाठी अकोला जिल्ह्यात निरंतर शिक्षण विभागांतर्गत १५ वर्षांंवरील आठवीपर्यंंत शिक्षण न झालेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार येत आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढविणे आणि ज्यांचे शिक्षण राहून गेले, त्यांना किमान आठवीपर्यंंतच्या शिक्षणाचा दर्जा देणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.शाळा सोडलेल्या किंवा किमान आठवीपर्यंंत शिक्षण न झालेल्या १५ वर्षांंवरील प्रत्येक व्यक्तीला आठवीपर्यंंतच्या शिक्षणाचा दर्जा मिळावा, यासाठी राष्ट्रीय मुक्त शाळेमार्फत त्यांना आठवी उत्तीर्णचे प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील आठवीपर्यंंत शिक्षण न झालेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी (निरंतर) प्रकाश मुकुंद यांनी सांगीतले. * गटशिक्षणाधिकार्‍यांना सर्वेक्षणाचे निर्देश!जिल्ह्यातील शाळा सोडलेल्या आणि आठवीपर्यंंत शिक्षण न झालेल्या १५ वर्षांंवरील व्यक्तींचे सर्वेक्षण करून, माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा निरंतर शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत.* जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण ७७.८१ टक्के !सन २0११ च्या जनगणनेनुसार अकोला जिल्ह्यातील साक्षरतेचा दर ७७.८१ टक्के आहे. तर निरक्षरतेचे प्रमाण २२.१९ टक्के आहे. साक्षरतेचे प्रमाण लक्षात घेता, दिवसेंदिवस जिल्ह्यातील साक्षरतेच्या दरात लक्षणीय वाढ झाली.* अल्पसंख्याकांसाठी ह्यतालिम-ए-बालीगानह्ण कार्यक्रम!अल्पसंख्याक समाजात साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनामार्फत मौलाना आझाद ह्यतालिम -ए-बालीगानह्ण राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक समाजातील साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला जात आहे.