शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांसाठी आता मूल्यांकन अहवाल!

By atul.jaiswal | Updated: April 5, 2018 15:05 IST

अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे भवितव्य त्यांच्या ‘परफॉर्मन्स’वर ठरविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्दे कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर्स’ तयार करण्यात आले आहे.मूल्यांकन अहवालानुसार पगारवाढ, नोकरीवर कायम ठेवणे किंवा कमी करणे या बाबी निश्चित करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदची हाक दिली आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे भवितव्य त्यांच्या ‘परफॉर्मन्स’वर ठरविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर्स’ तयार करण्यात आले असून, कामगिरीनुसार त्यांना पगारवाढ द्यायची, नोकरीवर कायम ठेवायचे की सेवा थांबवावी, हे ठरणार आहे. राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक सतीश पवार यांनी २ एप्रिल रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स्ािंगद्वारे या सूचना दिल्याने कंत्राटी कर्मचाºयांची घालमेल वाढली असून, या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवित राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदची हाक दिली आहे.आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने तुटपुंजा मानधनावर कार्यरत असलेले ‘एनएचएम’ कर्मचारी आरोग्यसेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या या कर्मचाºयांना दरवर्षी अकरा महिन्यांची पुनर्नियुक्ती एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन देण्यात येते. समान काम-समान वेतन व कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याची शक्यता पडताळण्यासाठी आरोग्य विभागाने अभ्यास समिती गठित केली असतानाच, आयुक्त, आरोग्यसेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या कार्यालयाकडून २ एप्रिल रोजी राज्यभरातील जिल्हा कार्यालयांना कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मूल्यांकन अहवालाची एक्सलशिट पाठविण्यात आली आहे. यामध्ये कामाच्या स्वरूपानुसार गुणांकन पद्धती असून, त्यावर आधारित मूल्यांकन अहवाल तयार होणार आहे. मूल्यांकन अहवालानुसार कंत्राटी कर्मचाºयांना पगारवाढ, नोकरीवर कायम ठेवणे किंवा कमी करणे या बाबी निश्चित करण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदचा इशारा दिला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना यापुढे सहा महिन्यांची पुनर्नियुक्ती देण्याच्या सूचनाही अतिरिक्त संचालकांनी दिल्याचे संघटनेचे म्हणणे असून, त्यालाही संघटनेचा विरोध असल्याचे संघटनेचे सचिव विजय सोनोने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.काय आहेत मानांकने?कामगिरी                                                           परिणामअतिउत्तम (९५ टक्के किंवा जास्त)                    १५ टक्के पगारवाढउत्तम (८०-९५ टक्के)                                         १० टक्के पगारवाढखूप चांगली (६५-७९ टक्के)                                  ५ टक्के पगारवाढसमाधानकारक (४० ते ६४ टक्के)                        नोकरी कायमअसमाधानकारक (४० टक्क्यांपेक्षा कमी)            सेवा समाप्तसंघटनेचा आक्षेपकंत्राटी कर्मचाऱ्यांकडे ज्या कामाची जबाबदारी नाही किंवा जे काम त्यांच्या जॉबचार्टमध्ये नाही, त्याकरिता त्यांना जबाबदार धरून त्यांचे मूल्यांकन कमी करण्याचा प्रयत्न या एक्सलशिटमध्ये असल्याचा आरोप संघटनेचा आहे. आर्थिक बाबींचे अधिकार कंत्राटी कर्मचाºयांना नसतानाही, त्यासाठी त्यांना जबाबदार ठरविणे अत्यंत चुकीचे व अन्यायकारक असल्याचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने आयुक्त, आरोग्यसेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांना जॉबचार्टनुसारच एक्सलशिट देण्यात आली आहे. कामगिरीनुसार त्यांचे मूल्यांकन करण्यात येऊन, त्यावर त्यांची पगारवाढ किंवा इतर बाबी अवलंबून राहणार आहेत.- डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य उपसंचालक, आरोग्यसेवा, अकोला मंडळ.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना