शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांसाठी आता मूल्यांकन अहवाल!

By atul.jaiswal | Updated: April 5, 2018 15:05 IST

अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे भवितव्य त्यांच्या ‘परफॉर्मन्स’वर ठरविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्दे कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर्स’ तयार करण्यात आले आहे.मूल्यांकन अहवालानुसार पगारवाढ, नोकरीवर कायम ठेवणे किंवा कमी करणे या बाबी निश्चित करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदची हाक दिली आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे भवितव्य त्यांच्या ‘परफॉर्मन्स’वर ठरविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर्स’ तयार करण्यात आले असून, कामगिरीनुसार त्यांना पगारवाढ द्यायची, नोकरीवर कायम ठेवायचे की सेवा थांबवावी, हे ठरणार आहे. राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक सतीश पवार यांनी २ एप्रिल रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स्ािंगद्वारे या सूचना दिल्याने कंत्राटी कर्मचाºयांची घालमेल वाढली असून, या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवित राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदची हाक दिली आहे.आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने तुटपुंजा मानधनावर कार्यरत असलेले ‘एनएचएम’ कर्मचारी आरोग्यसेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या या कर्मचाºयांना दरवर्षी अकरा महिन्यांची पुनर्नियुक्ती एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन देण्यात येते. समान काम-समान वेतन व कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याची शक्यता पडताळण्यासाठी आरोग्य विभागाने अभ्यास समिती गठित केली असतानाच, आयुक्त, आरोग्यसेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या कार्यालयाकडून २ एप्रिल रोजी राज्यभरातील जिल्हा कार्यालयांना कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मूल्यांकन अहवालाची एक्सलशिट पाठविण्यात आली आहे. यामध्ये कामाच्या स्वरूपानुसार गुणांकन पद्धती असून, त्यावर आधारित मूल्यांकन अहवाल तयार होणार आहे. मूल्यांकन अहवालानुसार कंत्राटी कर्मचाºयांना पगारवाढ, नोकरीवर कायम ठेवणे किंवा कमी करणे या बाबी निश्चित करण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदचा इशारा दिला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना यापुढे सहा महिन्यांची पुनर्नियुक्ती देण्याच्या सूचनाही अतिरिक्त संचालकांनी दिल्याचे संघटनेचे म्हणणे असून, त्यालाही संघटनेचा विरोध असल्याचे संघटनेचे सचिव विजय सोनोने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.काय आहेत मानांकने?कामगिरी                                                           परिणामअतिउत्तम (९५ टक्के किंवा जास्त)                    १५ टक्के पगारवाढउत्तम (८०-९५ टक्के)                                         १० टक्के पगारवाढखूप चांगली (६५-७९ टक्के)                                  ५ टक्के पगारवाढसमाधानकारक (४० ते ६४ टक्के)                        नोकरी कायमअसमाधानकारक (४० टक्क्यांपेक्षा कमी)            सेवा समाप्तसंघटनेचा आक्षेपकंत्राटी कर्मचाऱ्यांकडे ज्या कामाची जबाबदारी नाही किंवा जे काम त्यांच्या जॉबचार्टमध्ये नाही, त्याकरिता त्यांना जबाबदार धरून त्यांचे मूल्यांकन कमी करण्याचा प्रयत्न या एक्सलशिटमध्ये असल्याचा आरोप संघटनेचा आहे. आर्थिक बाबींचे अधिकार कंत्राटी कर्मचाºयांना नसतानाही, त्यासाठी त्यांना जबाबदार ठरविणे अत्यंत चुकीचे व अन्यायकारक असल्याचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने आयुक्त, आरोग्यसेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांना जॉबचार्टनुसारच एक्सलशिट देण्यात आली आहे. कामगिरीनुसार त्यांचे मूल्यांकन करण्यात येऊन, त्यावर त्यांची पगारवाढ किंवा इतर बाबी अवलंबून राहणार आहेत.- डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य उपसंचालक, आरोग्यसेवा, अकोला मंडळ.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना