शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एक रुपयाही मिळाला नाही; शेतकरी पीक विमा भरणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:21 IST

अकोला : पीक विमा योजनेत गेल्या वर्षी गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यावर पीक नुकसानभरपाईपोटी एक रुपयाही मिळाला नाही. काढलेल्या ...

अकोला : पीक विमा योजनेत गेल्या वर्षी गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यावर पीक नुकसानभरपाईपोटी एक रुपयाही मिळाला नाही. काढलेल्या पीक विम्याची रक्कम विमा कंपनीच्या घशात जात असेल तर, यंदाही पीक विमा भरणार कसे, असा सवाल कोळासा येथील सरपंचांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्ह्यातील सरपंच आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत उपस्थित केला. पीक विमा योजनेतील जाचक अटी वगळण्याची मागणीही सरपंच आणि शेतकऱ्यांनी या वेळी जिल्हाधिकाऱ्यांपुढे केली.

पीक विमा आणि पीक कापणी प्रयोग यासंदर्भात अडचणी सोडविण्याच्या मुद्द्यावर कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सरपंच आणि शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणीया, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी दिलीप सेन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी दिनकर प्रधान, तंत्र सहायक रूपाली मेंगजे आदी उपस्थित होते. पीक विमा योजना तसेच पीक कापणी प्रयोगासंदर्भात या वेळी सरपंच आणि शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच यासंदर्भातील अडचणींवर सरपंच आणि शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सरपंच आणि शेतकऱ्यांनी पीक विमा व पीक कापणी प्रयोगातील अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसह विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. त्यामध्ये ‘गेल्या वर्षी पीक विमा काढूनही गावातील शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईचा एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे काढलेल्या पीक विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीच्या घशात जात असेल तर, यंदाही शेतकरी पीक विम्याची रक्कम कसे भरतील, असा प्रश्न कोळासा येथील सरपंच शेषराव वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. पीक विमा योजनेतील जाचक अटी वगळण्याची मागणीही सरपंच आणि शेतकऱ्यांनी या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

उंबरठा उत्पादनाची अट वगळा!

पीक विमा योजनेत मागील सात वर्षांचे उंबरठा उत्पादन ग्राह्य धरण्याची अट वगळण्यात यावी, तसेच महसूल मंडळनिहाय अट रद्द करून गावनिहाय पीक नुकसानभरपाई देण्याची मागणी गांधीग्राम येथील शेतकरी उमेश काठोळे यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच व शेतकऱ्यांच्या वतीने या बैठकीत करण्यात आली. त्यानुषंगाने पीक विमा योजनेतील संबंधित अटी शिथिल करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी या वेळी दिले.

...................................

बोंडअळीने शेतकरी हैराण;

पीक विम्याचे संरक्षण द्या!

कपाशी पिकावर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या पीक नुकसानामुळे शेतकरी हैराण असून, पीक नुकसानीपोटी एक रुपया मिळत नाही. त्यामुळे बोंडअळीमुळे होणाऱ्या नुकसानीला पीक विम्याचे संरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी उमेश काठोळे यांच्यासह सरपंच आणि शेतकऱ्यांनी या बैठकीत केली. तसेच पिकांवरील कीडरोगामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई का मिळत नाही, असा प्रश्नही एका सरपंचाने या वेळी उपस्थित केला.

......................