शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

एक रुपयाही मिळाला नाही; शेतकरी पीक विमा भरणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:21 IST

अकोला : पीक विमा योजनेत गेल्या वर्षी गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यावर पीक नुकसानभरपाईपोटी एक रुपयाही मिळाला नाही. काढलेल्या ...

अकोला : पीक विमा योजनेत गेल्या वर्षी गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यावर पीक नुकसानभरपाईपोटी एक रुपयाही मिळाला नाही. काढलेल्या पीक विम्याची रक्कम विमा कंपनीच्या घशात जात असेल तर, यंदाही पीक विमा भरणार कसे, असा सवाल कोळासा येथील सरपंचांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्ह्यातील सरपंच आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत उपस्थित केला. पीक विमा योजनेतील जाचक अटी वगळण्याची मागणीही सरपंच आणि शेतकऱ्यांनी या वेळी जिल्हाधिकाऱ्यांपुढे केली.

पीक विमा आणि पीक कापणी प्रयोग यासंदर्भात अडचणी सोडविण्याच्या मुद्द्यावर कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सरपंच आणि शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणीया, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी दिलीप सेन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी दिनकर प्रधान, तंत्र सहायक रूपाली मेंगजे आदी उपस्थित होते. पीक विमा योजना तसेच पीक कापणी प्रयोगासंदर्भात या वेळी सरपंच आणि शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच यासंदर्भातील अडचणींवर सरपंच आणि शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सरपंच आणि शेतकऱ्यांनी पीक विमा व पीक कापणी प्रयोगातील अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसह विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. त्यामध्ये ‘गेल्या वर्षी पीक विमा काढूनही गावातील शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईचा एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे काढलेल्या पीक विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीच्या घशात जात असेल तर, यंदाही शेतकरी पीक विम्याची रक्कम कसे भरतील, असा प्रश्न कोळासा येथील सरपंच शेषराव वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. पीक विमा योजनेतील जाचक अटी वगळण्याची मागणीही सरपंच आणि शेतकऱ्यांनी या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

उंबरठा उत्पादनाची अट वगळा!

पीक विमा योजनेत मागील सात वर्षांचे उंबरठा उत्पादन ग्राह्य धरण्याची अट वगळण्यात यावी, तसेच महसूल मंडळनिहाय अट रद्द करून गावनिहाय पीक नुकसानभरपाई देण्याची मागणी गांधीग्राम येथील शेतकरी उमेश काठोळे यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच व शेतकऱ्यांच्या वतीने या बैठकीत करण्यात आली. त्यानुषंगाने पीक विमा योजनेतील संबंधित अटी शिथिल करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी या वेळी दिले.

...................................

बोंडअळीने शेतकरी हैराण;

पीक विम्याचे संरक्षण द्या!

कपाशी पिकावर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या पीक नुकसानामुळे शेतकरी हैराण असून, पीक नुकसानीपोटी एक रुपया मिळत नाही. त्यामुळे बोंडअळीमुळे होणाऱ्या नुकसानीला पीक विम्याचे संरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी उमेश काठोळे यांच्यासह सरपंच आणि शेतकऱ्यांनी या बैठकीत केली. तसेच पिकांवरील कीडरोगामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई का मिळत नाही, असा प्रश्नही एका सरपंचाने या वेळी उपस्थित केला.

......................