शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

एक रुपयाही मिळाला नाही; शेतकरी पीक विमा भरणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:21 IST

अकोला : पीक विमा योजनेत गेल्या वर्षी गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यावर पीक नुकसानभरपाईपोटी एक रुपयाही मिळाला नाही. काढलेल्या ...

अकोला : पीक विमा योजनेत गेल्या वर्षी गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यावर पीक नुकसानभरपाईपोटी एक रुपयाही मिळाला नाही. काढलेल्या पीक विम्याची रक्कम विमा कंपनीच्या घशात जात असेल तर, यंदाही पीक विमा भरणार कसे, असा सवाल कोळासा येथील सरपंचांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्ह्यातील सरपंच आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत उपस्थित केला. पीक विमा योजनेतील जाचक अटी वगळण्याची मागणीही सरपंच आणि शेतकऱ्यांनी या वेळी जिल्हाधिकाऱ्यांपुढे केली.

पीक विमा आणि पीक कापणी प्रयोग यासंदर्भात अडचणी सोडविण्याच्या मुद्द्यावर कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सरपंच आणि शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणीया, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी दिलीप सेन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी दिनकर प्रधान, तंत्र सहायक रूपाली मेंगजे आदी उपस्थित होते. पीक विमा योजना तसेच पीक कापणी प्रयोगासंदर्भात या वेळी सरपंच आणि शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच यासंदर्भातील अडचणींवर सरपंच आणि शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सरपंच आणि शेतकऱ्यांनी पीक विमा व पीक कापणी प्रयोगातील अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसह विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. त्यामध्ये ‘गेल्या वर्षी पीक विमा काढूनही गावातील शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईचा एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे काढलेल्या पीक विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीच्या घशात जात असेल तर, यंदाही शेतकरी पीक विम्याची रक्कम कसे भरतील, असा प्रश्न कोळासा येथील सरपंच शेषराव वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. पीक विमा योजनेतील जाचक अटी वगळण्याची मागणीही सरपंच आणि शेतकऱ्यांनी या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

उंबरठा उत्पादनाची अट वगळा!

पीक विमा योजनेत मागील सात वर्षांचे उंबरठा उत्पादन ग्राह्य धरण्याची अट वगळण्यात यावी, तसेच महसूल मंडळनिहाय अट रद्द करून गावनिहाय पीक नुकसानभरपाई देण्याची मागणी गांधीग्राम येथील शेतकरी उमेश काठोळे यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच व शेतकऱ्यांच्या वतीने या बैठकीत करण्यात आली. त्यानुषंगाने पीक विमा योजनेतील संबंधित अटी शिथिल करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी या वेळी दिले.

...................................

बोंडअळीने शेतकरी हैराण;

पीक विम्याचे संरक्षण द्या!

कपाशी पिकावर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या पीक नुकसानामुळे शेतकरी हैराण असून, पीक नुकसानीपोटी एक रुपया मिळत नाही. त्यामुळे बोंडअळीमुळे होणाऱ्या नुकसानीला पीक विम्याचे संरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी उमेश काठोळे यांच्यासह सरपंच आणि शेतकऱ्यांनी या बैठकीत केली. तसेच पिकांवरील कीडरोगामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई का मिळत नाही, असा प्रश्नही एका सरपंचाने या वेळी उपस्थित केला.

......................