शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मुलाखत : अनाथ नव्हे ‘स्वनाथ’; दृष्टीकोण बदलणे गरजेचे! - सुलक्षणा अहेर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 12:02 IST

अनाथांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे, असे मत ‘अनाथांचे आधार’, एकच धर्म मानव धर्म या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुलक्षणा अहेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- राजू चिमणकरअकोला : अपंगांना ज्याप्रमाणे दिव्यांग संबोधल्या जाते त्याचप्रमाणे अनाथांना स्वनाथ संबोधण्यात यावे. १८ वर्षांनंतर अनाथ मुला-मुलींच्या भवितव्याचा फार मोठा प्रश्न आहे. शासनाने अनाथांच्या धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अनाथांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे, असे मत ‘अनाथांचे आधार’, एकच धर्म मानव धर्म या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुलक्षणा अहेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. उत्कर्ष शिशुगृह, गायत्री बालिकाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्रेह संगम २०१८ च्या सोहळ््यासाठी त्या अकोल्यात आल्या होत्या. त्यांच्या कार्याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद. 

प्रश्न : ‘अनाथांचे आधार’ची संकल्पना समाजात कशी रुजली?वयाच्या १८ वर्षांनंतर अनाथाश्रमातील मुला-मुलींना बाहेर काढले जाते. त्यांच्यासमोर मोठे संकटच उभे राहते. त्यांचा गैरफायदा घेत अनाथ मुला-मुलींना वाममार्गाला लावले जाते. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारीचे कृत्य घडू नये, यासाठी राज्यभरातील १८ वर्षांनंतरच्या मुला-मुलींना भक्कमपणे पाठबळ मिळावे, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांच्या करिअरसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने ‘अनाथांचे आधार’ संकल्पना तयार झाली. ती आता खºया अर्थाने समाजामध्ये रुजत आहे. विविध उपक्रमांना समाजदूतांकडून मदतीचा हात मिळत आहे. 

प्रश्न : सध्या आपले कार्यक्षेत्र ?राज्यभरातील दीडशेंवर १८ वर्षांवरील मुला-मुलींच्या भवितव्यासाठी संस्था कार्यरत आहे. मुला-मुलींमध्ये राज्यातील मुला-मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे अनाथ मुला-मुलींनी स्वत:च पुढाकार घेऊन हे कार्य सुरू केले आहे. मुंबईचे अभय तेली, नागपूरचे अमित वासने, पुण्याच्या मयुरी जोशी यांचाही या कार्यात मोठा वाटा आहे. गत पाच वर्षांपासून संस्थेची वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या कार्याला पोलिसांचा सपोर्ट मिळत आहे.     

प्रश्न : अनाथांच्या पुर्नवसनासाठी शासनाची भूमिका काय ?१८ वर्षांनंतरच्या अनाथ मुला-मुलींच्या पुर्नवसनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यासाठी शासनाने महत्त्वाची भूमिका निभावणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अनाथांना एक टक्का आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. म्हाडा, सिडकोमध्ये अनाथ मुला-मुलींना घरे देण्यात यावीत. शासनाने अनाथ मुला-मुलींच्या भविष्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.शासनाने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष दिल्यास अनाथांनासोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल.

 प्रश्न : यंदाच्या महत्त्वाच्या उपक्रमाबाबत काय सांगाल ?अनाथांची दिवाळी हा उपक्रम यंदा नाशिकमध्ये घेण्यात येत आहे. यामध्ये १६ ते १९ नोव्हेंबर २०१८ दरम्यान राज्यातील अनाथ एकत्र येऊन दीपोत्सव साजरा करणार आहेत. यानिमित्ताने विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक परिसराची भ्रमंती, विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांची भेट, अनाथ मुला-मुलींचे समुपदेशन, जीवनविषयक दृष्टीकोन सांगणारी शॉर्ट मुव्हीचे प्रदर्शन, कपड्यांसह विविध जीवनोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात येईल. अनाथ मुला-मुलींना करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. अनाथ मुला-मुलींमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत