शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तीन महिन्यांचे एकदाच नव्हे, दरमहा मिळेल धान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 08:36 IST

धान्य वाटप प्रक्रियेत कुठल्याही टप्प्यावर हलगर्जी झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये गोरगरीब, मजुरांची उपासमार होऊ नये, यासाठी देशभरातील शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे धान्य मोफत दिले जाणार आहे. तीन महिन्याचे धान्य एकाच वेळी नव्हे, तर दरमहा लाभार्थींना वाटप करण्याचा आदेश ३१ मार्च रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिला. या प्रकाराने राज्यभरातील दुकानदारांसह पुरवठा यंत्रणेचाही जीव भांड्यात पडला, तर धान्य वाटप प्रक्रियेत कुठल्याही टप्प्यावर हलगर्जी झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.केंद्र व राज्य शासनाने देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. त्यामुळे देशभरातील गरीब, मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यावर उपाय म्हणून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रती माह ५ किलो धान्य तीन महिने मोफत दिले जाणार आहे. धान्य वाटपाचे हे परिमाण पाहता दुकानदार आणि यंत्रणेचा कमालीचा गोंधळ व धावपळ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यावर शासनाने ३१ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.माहे एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांसाठी दिलेल्या अन्नधान्याच्या नियमित नियतनानुसार धान्याचे वाटप त्या-त्या महिन्यात केले जाणार आहे. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

- अंत्योदय लाभार्थींना अतिरिक्त वाटपसर्व प्रकारातील लाभार्थींना दरमहा नियमित धान्य वाटप केल्यानंतर अंत्योदय लाभार्थींना प्रति सदस्य पाच किलोप्रमाणे अतिरिक्त तांदळाचे वाटप केले जाणार आहे. सोबतच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींनाही त्याच प्रमाणात वाटप करण्याचेही आदेशात म्हटले.

- अतिरिक्त तांदूळ वाटपात कुचराई भोवणार!नियमित धान्यासोबतच अतिरिक्त तांदूळ वाटप करण्यास जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, उपनियंत्रक यांच्या स्तरावर कुचराई झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.

- राज्यासाठी ५.४० लाख क्विंटल अतिरिक्त तांदूळराज्यातील अंत्योदय योजनेच्या २५ लाख शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सदस्यांसाठी ५ लाख ४० हजार २० क्विंटल अतिरिक्त तांदूळ मंजूर करण्यात आला आहे. ठरलेल्या परिमाणानुसार त्याचे वाटप होणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला