शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

९९७ गावांमधील एकाही विद्यार्थ्याला मिळाले नाही शिक्षण शुल्क

By admin | Updated: July 27, 2016 01:42 IST

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक देण्यास शाळा, महाविद्यालये उदासीन!

अकोला: जिल्हय़ातील ५0 पैशांपेक्षा कमी किंवा अंतिम पैसेवारी असलेल्या दुष्काळग्रस्त गावांमधील इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शिक्षण विभागाने माफ केले. त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दुष्काळगस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक मागितले; परंतु आतापर्यंत पाच ते सहा शाळांनीच बँक खाते दिले. उर्वरित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी खाते न दिल्याने जिल्हय़ातील ९९७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी भरलेले शिक्षण शुल्क परत मिळालेले नाही. जिल्हय़ातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना भारत सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त करणारे विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांची माहिती पाठविण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाने तीन महिन्यांपूर्वीच दिल्या होत्या. अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक एस.आर. कुळकर्णी यांनी सर्व मुख्याध्यापकांना पत्र पाठवून खरीप हंगामातील ५0 पैशांपेक्षा कमी किंवा अंतिम पैसेवारी असलेल्या दुष्काळसदृश गावांमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करण्यात आल्याचे कळविले होते आणि त्यानुसार अकोला जिल्हय़ातील ९९७ दुष्काळसदृश गावांमधील विद्यार्थ्यांंचे शिक्षण शुल्क माफ करण्यात आले. जिल्हय़ातील अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित विद्यालयांतील २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले असल्यामुळे विद्यार्थ्यांंची यादी (ज्या विद्यार्थ्यांंनी परीक्षा शुल्क भरले आहे), बँक खाते शिक्षण विभागाने मागितले होते. तीन महिन्यांचा कालावधी उलटूनसुद्धा जिल्हय़ातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंची माहिती शिक्षण विभागास सादर केली नाही. त्यामुळे शिक्षण शुल्क माफ होऊनही विद्यार्थ्यांंना त्यांचे शिक्षण शुल्क परत मिळू शकलेले नाही. दरम्यान, या संदर्भात कुठल्याही विद्यार्थी संघटनेने आवाज उठविला नाही.