शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

९९७ गावांमधील एकाही विद्यार्थ्याला मिळाले नाही शिक्षण शुल्क

By admin | Updated: July 27, 2016 01:42 IST

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक देण्यास शाळा, महाविद्यालये उदासीन!

अकोला: जिल्हय़ातील ५0 पैशांपेक्षा कमी किंवा अंतिम पैसेवारी असलेल्या दुष्काळग्रस्त गावांमधील इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शिक्षण विभागाने माफ केले. त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दुष्काळगस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक मागितले; परंतु आतापर्यंत पाच ते सहा शाळांनीच बँक खाते दिले. उर्वरित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी खाते न दिल्याने जिल्हय़ातील ९९७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी भरलेले शिक्षण शुल्क परत मिळालेले नाही. जिल्हय़ातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना भारत सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त करणारे विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांची माहिती पाठविण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाने तीन महिन्यांपूर्वीच दिल्या होत्या. अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक एस.आर. कुळकर्णी यांनी सर्व मुख्याध्यापकांना पत्र पाठवून खरीप हंगामातील ५0 पैशांपेक्षा कमी किंवा अंतिम पैसेवारी असलेल्या दुष्काळसदृश गावांमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करण्यात आल्याचे कळविले होते आणि त्यानुसार अकोला जिल्हय़ातील ९९७ दुष्काळसदृश गावांमधील विद्यार्थ्यांंचे शिक्षण शुल्क माफ करण्यात आले. जिल्हय़ातील अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित विद्यालयांतील २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले असल्यामुळे विद्यार्थ्यांंची यादी (ज्या विद्यार्थ्यांंनी परीक्षा शुल्क भरले आहे), बँक खाते शिक्षण विभागाने मागितले होते. तीन महिन्यांचा कालावधी उलटूनसुद्धा जिल्हय़ातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंची माहिती शिक्षण विभागास सादर केली नाही. त्यामुळे शिक्षण शुल्क माफ होऊनही विद्यार्थ्यांंना त्यांचे शिक्षण शुल्क परत मिळू शकलेले नाही. दरम्यान, या संदर्भात कुठल्याही विद्यार्थी संघटनेने आवाज उठविला नाही.