शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

गैरहजेरीत देयक काढणाऱ्यांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 14:49 IST

अकोला: शाखा अभियंता रजेवर असताना त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीतील देयक अदा करून तब्बल ५ लाख ३० हजार रुपये अतिरिक्त देणे, कागदपत्रांची पूर्तता न करता १० लाख रुपये कंत्राटदारांना परत करणे, यासारख्या गंभीर बाबी करणाºया पाणीपुरवठा विभागातील संबंधित अभियंता, कर्मचाºयांची चौकशी करण्याचा ठराव गुरुवारी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत घेण्यात आला.

अकोला: शाखा अभियंता रजेवर असताना त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीतील देयक अदा करून तब्बल ५ लाख ३० हजार रुपये अतिरिक्त देणे, कागदपत्रांची पूर्तता न करता १० लाख रुपये कंत्राटदारांना परत करणे, यासारख्या गंभीर बाबी करणाºया पाणीपुरवठा विभागातील संबंधित अभियंता, कर्मचाºयांची चौकशी करण्याचा ठराव गुरुवारी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत घेण्यात आला. कार्यकारी अभियंता ढवळे अनुपस्थित असल्याने संबंधितांना माहिती देता आली नाही. त्यामुळे सभेत सदस्यांनी धारेवर धरले.सभेत अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्यासह सभापती रेखा अंभोरे, माधुरी गावंडे, देवका पातोंड यांच्यासह सदस्य गोपाल कोल्हे, श्रीकांत खोणे, हरणे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.व्ही. देशमुख उपस्थित होते. जलव्यवस्थापन समितीच्या गेल्या सभेत तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाचे अंतिम देयक अदा करताना तब्बल ५ लाख १३ हजार रुपये अतिरिक्त रक्कम कंत्राटदाराला देण्यात आली. सोबतच खांबोरा ६४ खेडी योजना दुरुस्तीसाठी १० लाख रुपयांचे देयकही अदा करण्यात आले. हा प्रकार नियमित प्रभार असलेल्या शाखा अभियंत्याच्या रजेच्या कालावधीत करण्यात आला. पाणी पुरवठा विभागातील तांत्रिक विभागाचे शाखा अभियंता तिडके यांच्याकडे असलेल्या कामासंदर्भात शाखा अभियंता अनिश खान यांनी हा प्रकार केल्याचे शेळके यांनी सभागृहात सांगितले. योजनेचे कंत्राटदार नरेंद्र पाटील, गोपी पंजवाणी यांची देयके अदा करण्यात एवढी घाई कशासाठी करण्यात आली, हा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. त्यावर पाणी पुरवठा विभागाने संपूर्ण माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष वाघोडे यांनी दिले होते. त्यानुसार गुरुवारी सदस्य गोपाल कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची माहिती उपकार्यकारी अभियंता कांबळे देऊ शकले नाही. त्यावर याप्रकरणी सर्वसंबंधितांची चौकशी करण्याचा ठराव घेण्यात आला. लघुसिंचन, पाणीपुरवठा विभागाकडे अखर्चित असलेला ४ कोटी रुपये निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याचेही बजावण्यात आले.- वडाळी गावात कोट्यवधी खर्च, तरीही पाणी नाहीअकोट तालुक्यातील वडाळी देशमुख येथे पाणीपुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी २६ लाख रुपये खर्च झाले. वर्षभरापूर्वी रक्कम खर्ची पडली; मात्र ग्रामस्थांना पाणीच मिळालेले नाही. योजनेतीला कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने पाणी मिळाले नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी सातत्याने केली. त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यावर तातडीने चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद