शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

गैरहजेरीत देयक काढणाऱ्यांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 14:49 IST

अकोला: शाखा अभियंता रजेवर असताना त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीतील देयक अदा करून तब्बल ५ लाख ३० हजार रुपये अतिरिक्त देणे, कागदपत्रांची पूर्तता न करता १० लाख रुपये कंत्राटदारांना परत करणे, यासारख्या गंभीर बाबी करणाºया पाणीपुरवठा विभागातील संबंधित अभियंता, कर्मचाºयांची चौकशी करण्याचा ठराव गुरुवारी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत घेण्यात आला.

अकोला: शाखा अभियंता रजेवर असताना त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीतील देयक अदा करून तब्बल ५ लाख ३० हजार रुपये अतिरिक्त देणे, कागदपत्रांची पूर्तता न करता १० लाख रुपये कंत्राटदारांना परत करणे, यासारख्या गंभीर बाबी करणाºया पाणीपुरवठा विभागातील संबंधित अभियंता, कर्मचाºयांची चौकशी करण्याचा ठराव गुरुवारी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत घेण्यात आला. कार्यकारी अभियंता ढवळे अनुपस्थित असल्याने संबंधितांना माहिती देता आली नाही. त्यामुळे सभेत सदस्यांनी धारेवर धरले.सभेत अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्यासह सभापती रेखा अंभोरे, माधुरी गावंडे, देवका पातोंड यांच्यासह सदस्य गोपाल कोल्हे, श्रीकांत खोणे, हरणे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.व्ही. देशमुख उपस्थित होते. जलव्यवस्थापन समितीच्या गेल्या सभेत तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाचे अंतिम देयक अदा करताना तब्बल ५ लाख १३ हजार रुपये अतिरिक्त रक्कम कंत्राटदाराला देण्यात आली. सोबतच खांबोरा ६४ खेडी योजना दुरुस्तीसाठी १० लाख रुपयांचे देयकही अदा करण्यात आले. हा प्रकार नियमित प्रभार असलेल्या शाखा अभियंत्याच्या रजेच्या कालावधीत करण्यात आला. पाणी पुरवठा विभागातील तांत्रिक विभागाचे शाखा अभियंता तिडके यांच्याकडे असलेल्या कामासंदर्भात शाखा अभियंता अनिश खान यांनी हा प्रकार केल्याचे शेळके यांनी सभागृहात सांगितले. योजनेचे कंत्राटदार नरेंद्र पाटील, गोपी पंजवाणी यांची देयके अदा करण्यात एवढी घाई कशासाठी करण्यात आली, हा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. त्यावर पाणी पुरवठा विभागाने संपूर्ण माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष वाघोडे यांनी दिले होते. त्यानुसार गुरुवारी सदस्य गोपाल कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची माहिती उपकार्यकारी अभियंता कांबळे देऊ शकले नाही. त्यावर याप्रकरणी सर्वसंबंधितांची चौकशी करण्याचा ठराव घेण्यात आला. लघुसिंचन, पाणीपुरवठा विभागाकडे अखर्चित असलेला ४ कोटी रुपये निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याचेही बजावण्यात आले.- वडाळी गावात कोट्यवधी खर्च, तरीही पाणी नाहीअकोट तालुक्यातील वडाळी देशमुख येथे पाणीपुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी २६ लाख रुपये खर्च झाले. वर्षभरापूर्वी रक्कम खर्ची पडली; मात्र ग्रामस्थांना पाणीच मिळालेले नाही. योजनेतीला कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने पाणी मिळाले नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी सातत्याने केली. त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यावर तातडीने चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद