शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रस्त्याची दुरुस्ती नाहीच; उड्डाणपुलाचे काम अकोलेकरांच्या जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 15:01 IST

खदान पोलीस ठाणे ते थेट रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता अकोलेकरांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे.

अकोला: शहरातील निर्माणाधिन उड्डाणपुलाचे काम सर्वसामान्य अकोलेकरांच्या जीवावर उठले आहे. २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणीच्या दिवशी भाजपचे लोकप्रतिनिधी स्वत:च्या राजकीय भवितव्याची चिंता करीत असताना उड्डाणपुलालगतच्या रस्ता दुरुस्तीला ठेंगा दाखवणाºया कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील एका तरुणाचा ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतरही कंत्राटदाराने रस्ता दुरुस्तीला सुरुवात केली नाही आणि भाजप लोकप्रतिनिधींनासुद्धा या गंभीर प्रकाराची दखल घ्यावीशी वाटली नसल्याने उड्डाणपुलाचे काम आणखी किती निष्पाप अकोलेकरांचा बळी घेणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.प्रशस्त रस्ते, उड्डाणपुलामुळे शहराच्या विकासाला चालना मिळते, यात दुमत नाही; परंतु विकास कामांना प्रारंभ करण्यापूर्वी नियोजन आणि पर्यायी उपाययोजनांची काटेक ोरपणे अंमलबजावणी आवश्यक ठरते. शहरातील विकास कामांचा भाजपच्या स्तरावर गवगवा केला जात असला तरी प्रत्यक्षात पर्यायी उपाययोजनांकडे साफ कानाडोळा केला जात असल्याची परिस्थिती आहे. प्र्रशस्त रस्ते निर्मितीच्या नावाखाली शहरात एकाच वेळी सर्व मुख्य रस्त्यांचे खोदकाम केल्या जात असल्यामुळे वाहतूक व्यवस्था पार कोलमडून गेली आहे. खदान पोलीस स्टेशन ते अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंत उड्डाणपुलासाठी खोदकाम केल्या जात आहे. खोदकामादरम्यान मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याची परिस्थिती आहे. उड्डाणपुलाचे काम करणाºया कंत्राटदारानेच रस्त्याची दुरुस्ती करणे भाग असून, निविदेतही रस्ता दुरुस्तीचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून उड्डाणपुलासाठी खोदकाम करणाºया कंत्राटदाराने पैसे वाचविण्याच्या मानसिकतेतून रस्ता दुरुस्तीकडे सपशेल पाठ फिरवल्यामुळे खदान पोलीस ठाणे ते थेट रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता अकोलेकरांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे.वजनदार ‘सेठ’मुळे भाजपची चुप्पीशहराचा विकास व्हावा, या उदात्त उद्देशातून आमदार गोवर्धन शर्मा यांनी उड्डाणपुलासाठी शासनाकडे रेटा लावून धरला होता. त्यानुषंगाने शासनाने १६७ कोटी रुपये मंजूर केले. उड्डाणपुलाचे काम नागपूर येथील कंपनीमार्फत केल्या जात असले तरी प्रत्यक्षात भाजपमधील स्थानिक वजनदार ‘सेठ’ची भागिदारी असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून रस्ता दुरुस्तीसाठी प्रत्यक्षात पुढाकार घेतला जाईल का, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचा इशारा; तरीही निकृष्ट कामखदान पोलीस स्टेशन ते रेल्वे स्टेशनपर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. निर्माणाधिन उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याची चाळण झाल्यामुळे अकोलेकरांना वाहन चालविणे मुश्कील झाले आहे. ही बाब लक्षात घेता शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी मध्यंतरी संबंधित कंत्राटदाराला रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर थातूरमातूर डांबराचा निकृष्ट थर अंथरण्यात आल्याचे समोर आले.

कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराच्या काँग्रेस नगरमधील एका निष्पाप तरुणाचा बळी गेला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात न केल्यास उड्डाणपुलाचे काम बंद केले जाईल.-राजेश मिश्रा शहर प्रमुख शिवसेना 

 

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग