शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

अकोल्यात ‘‘भारत बंद’ला प्रतिसादच नाही, पटाेलेंच्या नेतृत्वात रॅली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 18:27 IST

No response to "Bharat Bandh" in Akola : नाना पटाेले हे स्वत: बंदसाठी अकाेल्यात मुक्कामी थांबले असतानाही अकाेल्यात नगण्य प्रतिसाद मिळाला.

अकोला : शेतकरी व कामगाराविराेधी कायद्यांच्या विराेधात राजधानीच्या सीमेवर शेतकरी वर्षभरापासून आंदाेलन करत आहेत. या पृष्ठभूमीवर साेमवारी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेसने पाठिंबा दिला हाेता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले हे स्वत: बंदसाठी अकाेल्यात मुक्कामी थांबले असतानाही अकाेल्यात नगण्य प्रतिसाद मिळाला. दरम्यान, पटाेलेंच्या नेतृत्वात काँग्रेसने माेटारसायकल रॅली काढून हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून रॅलीचा समाराेप केला.

शेतकरी विराेधी कायद्यांच्या विराेधातील आवाज दुर्लक्षित करून केंद्र सरकारने झाेपेचे साेंग घेतले आहे. सरकारने या आंदाेलनाकडे पाठ फिरविली आहे. केंद्राला जागे करत, जाब विचारण्यासाठी साेमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली हाेती. पटोले यांच्या नेतृत्वात स्वराज्य भवन येथून दुपारी १२.२०ला सुरू झालेली रॅली शहरातील मुख्य बाजारपेठमार्गे हुतात्मा स्मारक येथे पोहोचल्यानंतर तेथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहत रॅलीचा समारोप करण्यात आला. दरम्यान, व्यापाऱ्यांनी ‘भारत बंद’कडे पाठ फिरविली. काँग्रेसच्या रॅलीदरम्यान व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले, तेव्हा व्यापारी केवळ शटर खाली ओढून घेत होते. रॅली पुढे निघाली की, पुन्हा शटर उघडण्यात आले. या रॅलीमध्ये काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव चाैधरी, जिल्हाध्यक्ष अशाेक अमानकर, विराेधी पक्षनेते साजीद खान पठाण, नगरसेवक डाॅ.जिशान हुसेन आदींनी सहभाग घेतला.

 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदNana Patoleनाना पटोलेAkolaअकोला