शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ओलावा नाही; हरभरा पेरणी खोळंबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 12:50 IST

अकोला : पावसातील खंडामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने, जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात रब्बी हरभरा पेरणी खोळंबली असून, पेरणीची वेळ निघून गेल्याने अनेक गावांत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीचे क्षेत्र रिकामे पडले आहे.

- संतोष येलकरअकोला : पावसातील खंडामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने, जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात रब्बी हरभरा पेरणी खोळंबली असून, पेरणीची वेळ निघून गेल्याने अनेक गावांत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीचे क्षेत्र रिकामे पडले आहे. पेरणीअभावी हरभरा पिकाचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे (ओलावा) कमी प्रमाण व त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. सोयाबीनचे पीक काढल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हरभरा पेरणीची तयारी सुरू केली; मात्र जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नसल्याने, अकोला तालुक्यातील अनेक गावांत रब्बी हरभरा पेरणी खोळंबली असून, अशीच परिस्थिती जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील इतर गावांमध्येही आहे. जमिनीत ओलावा नाही आणि सिंचनासाठी पाणी नसल्याने हरभरा पेरणी करण्यात आली नसल्याने हरभरा पेरणीचे क्षेत्र रिकामे पडले आहे. पेरणीची वेळ निघून गेली; मात्र अद्याप रब्बी हरभरा पेरणी झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत हरभरा पिकाचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.पेरणीअभावी ‘या’ गावांत रिकामे पडले हरभºयाचे क्षेत्र!जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नसल्याने, अकोला तालुक्यातील रामगाव, अन्वी मिर्झापूर, दहीगाव गावंडे, बहिरखेड, मजलापूर, धोतर्डी, बोरगाव मंजू, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर, कौलखेड जहागीर, बहादलपूर, पळसो बढे इत्यादी गावांच्या शिवारात रब्बी हंगामातील हरभरा पेरणी अद्याप करण्यात आली नाही. पेरणीअभावी या गावांमध्ये हरभºयाचे क्षेत्र रिकामे पडले आहे. पाण्याची सुविधा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील इतर गावांमध्येही हीच परिस्थिती आहे.प्रकल्पाचे पाणी सोडले; शेतापर्यंत पोहोचलेच नाही!रब्बी हंगामातील सिंचनासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून गत आठवड्यात पाणी सोडण्यात आले; परंतु लाभ क्षेत्रातील रामगाव, अन्वी मिर्झापूर, दहीगाव गावंडे, बहिरखेड, मजलापूर, धोतर्डी, बोरगाव मंजू, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर, कौलखेड जहागीर, बहादलपूर यासह इतर गावांतील शेतशिवारापर्यंत ९ नोव्हेंबरपर्यंत प्रकल्पाचे पाणी पोहोचलेच नाही....तर हरभरा पेरणी साधली असती!रब्बी हंगामासाठी आठ दिवसांपूर्वी काटेपूर्णा प्रकल्पातून लाभ क्षेत्राकरिता पाणी सोडण्यात आले; परंतु सिंचनासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून १५ दिवसांपूर्वी पाणी सोडले असते, तर जमिनीत ओलावा कमी असल्याने आणि पाण्याअभावी खोळंबलेली रब्बी हरभरा पेरणी साधली असती, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.तुरीचे पीकही अडचणीत!जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचे पीकही अडचणीत सापडले आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी तातडीने शेतापर्यंत पोहोचल्यास तुरीच्या पिकासाठी पोषक ठरणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.सोयाबीनचे पीक काढल्यानंतर रब्बी हरभरा पेरणीची तयारी केली; मात्र जमिनीत ओलावा नसल्याने, रामगावसह परिसरातील अनेक गावांत हरभरा पेरणी करण्यात आली नाही. पेरणीची वेळ निघून गेल्याने हरभºयाचे उत्पादन बुडाले आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून गत आठवड्यात सोडण्यात आलेले पाणी अद्याप शेतापर्यंत पोहोचले नाही. १५ दिवसांआधी प्रकल्पाचे पाणी मिळाले असते, तर हरभरा पेरणी साधली असती.-शिवाजीराव भरणे,शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी