शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

ओलावा नाही; हरभरा पेरणी खोळंबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 12:50 IST

अकोला : पावसातील खंडामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने, जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात रब्बी हरभरा पेरणी खोळंबली असून, पेरणीची वेळ निघून गेल्याने अनेक गावांत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीचे क्षेत्र रिकामे पडले आहे.

- संतोष येलकरअकोला : पावसातील खंडामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने, जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात रब्बी हरभरा पेरणी खोळंबली असून, पेरणीची वेळ निघून गेल्याने अनेक गावांत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीचे क्षेत्र रिकामे पडले आहे. पेरणीअभावी हरभरा पिकाचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे (ओलावा) कमी प्रमाण व त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. सोयाबीनचे पीक काढल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हरभरा पेरणीची तयारी सुरू केली; मात्र जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नसल्याने, अकोला तालुक्यातील अनेक गावांत रब्बी हरभरा पेरणी खोळंबली असून, अशीच परिस्थिती जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील इतर गावांमध्येही आहे. जमिनीत ओलावा नाही आणि सिंचनासाठी पाणी नसल्याने हरभरा पेरणी करण्यात आली नसल्याने हरभरा पेरणीचे क्षेत्र रिकामे पडले आहे. पेरणीची वेळ निघून गेली; मात्र अद्याप रब्बी हरभरा पेरणी झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत हरभरा पिकाचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.पेरणीअभावी ‘या’ गावांत रिकामे पडले हरभºयाचे क्षेत्र!जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नसल्याने, अकोला तालुक्यातील रामगाव, अन्वी मिर्झापूर, दहीगाव गावंडे, बहिरखेड, मजलापूर, धोतर्डी, बोरगाव मंजू, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर, कौलखेड जहागीर, बहादलपूर, पळसो बढे इत्यादी गावांच्या शिवारात रब्बी हंगामातील हरभरा पेरणी अद्याप करण्यात आली नाही. पेरणीअभावी या गावांमध्ये हरभºयाचे क्षेत्र रिकामे पडले आहे. पाण्याची सुविधा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील इतर गावांमध्येही हीच परिस्थिती आहे.प्रकल्पाचे पाणी सोडले; शेतापर्यंत पोहोचलेच नाही!रब्बी हंगामातील सिंचनासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून गत आठवड्यात पाणी सोडण्यात आले; परंतु लाभ क्षेत्रातील रामगाव, अन्वी मिर्झापूर, दहीगाव गावंडे, बहिरखेड, मजलापूर, धोतर्डी, बोरगाव मंजू, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर, कौलखेड जहागीर, बहादलपूर यासह इतर गावांतील शेतशिवारापर्यंत ९ नोव्हेंबरपर्यंत प्रकल्पाचे पाणी पोहोचलेच नाही....तर हरभरा पेरणी साधली असती!रब्बी हंगामासाठी आठ दिवसांपूर्वी काटेपूर्णा प्रकल्पातून लाभ क्षेत्राकरिता पाणी सोडण्यात आले; परंतु सिंचनासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून १५ दिवसांपूर्वी पाणी सोडले असते, तर जमिनीत ओलावा कमी असल्याने आणि पाण्याअभावी खोळंबलेली रब्बी हरभरा पेरणी साधली असती, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.तुरीचे पीकही अडचणीत!जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचे पीकही अडचणीत सापडले आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी तातडीने शेतापर्यंत पोहोचल्यास तुरीच्या पिकासाठी पोषक ठरणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.सोयाबीनचे पीक काढल्यानंतर रब्बी हरभरा पेरणीची तयारी केली; मात्र जमिनीत ओलावा नसल्याने, रामगावसह परिसरातील अनेक गावांत हरभरा पेरणी करण्यात आली नाही. पेरणीची वेळ निघून गेल्याने हरभºयाचे उत्पादन बुडाले आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून गत आठवड्यात सोडण्यात आलेले पाणी अद्याप शेतापर्यंत पोहोचले नाही. १५ दिवसांआधी प्रकल्पाचे पाणी मिळाले असते, तर हरभरा पेरणी साधली असती.-शिवाजीराव भरणे,शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी