शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Sting Operation : लॉगबुकचा पत्ताच नाही; सरपंचाला तोंडी दिली जाते माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:24 IST

खेट्री: पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर पातूर तालुक्यातील उमरा, सुकळी आणि पिंपळखुटा या गावांमध्ये प्रत्येकी एक टँकरची व्यवस्था करण्यात आली; परंतु लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या गावांची तहान एका टँकरवर भागत नाही.

- नासीर शेखखेट्री (ता. पातूर): पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर पातूर तालुक्यातील उमरा, सुकळी आणि पिंपळखुटा या गावांमध्ये प्रत्येकी एक टँकरची व्यवस्था करण्यात आली; परंतु लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या गावांची तहान एका टँकरवर भागत नाही. तसेच या गावांमध्ये येणाऱ्या टँकरचालकाकडे खेपांची नोंद करण्यासाठी असलेले लॉगबुकच उपलब्ध नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने १२ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणी पाण्याच्या खेपांची अनियमितता होण्याची शक्यता नाकारता येत नाहीपातूर पंचायत समितीकडून तालुक्यातील उमरा, सुकळी, पिंपळखुटा या तीन गावांची टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची निवड करण्यात आली आहे. या तिन्ही गावांना २४ हजार लीटरच्या प्रत्येकी १ टँकरद्वारे ९ मेपासून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पिंपळखुटा गावात पहिल्याच दिवशी टँकर रस्ता अरुंद असल्याचे कारण देत चालकाने टँकर परत नेला. शेतातील अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून टँकरद्वारे पाणी आणून गावातील विहिरींमध्ये टाकून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु मोठ्या लोकसंख्येला हा पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या टँकरवर अधिकाºयाऐवजी ग्रामपंचायत शिपाई नियंत्रण ठेवत असल्याचे दोन्ही गावांमध्ये आढळून आले. पाणी मिळाल्याची नोंद लॉगबुकमध्ये करणे गरजेचे आहे; मात्र या ठिकाणी लॉगबुकच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. विहिरीमध्ये पाणी टाकण्याची माहिती सरपंचाला तोंडी दिली जाते, असे टँकरचालकांनी सांगितले. दोन्ही टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित असल्याचेही दिसून आले; परंतु त्यावर नियंत्रण कुणाचे, हे चालकालाही ठाऊक नव्हते.ब्लिचिंग पावडरचा वापर नाहीटँकरद्वारे आणलेले पाणी ज्या विहिरींमध्ये टाकल्या जाते, त्या विहिरी स्वच्छ दिसून आल्या; परंतु या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात नसल्याचे वास्तव आहे.टँकरची एकच फेरीउमरा व सुकळी या गावांमध्ये दिवसातून एक वेळ टँकर येतो. टँकरमुळे पाणीटंचाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तर टँकरच्या दोना फेºया केल्यास पाणीटंचाईची समस्या दूर होऊ शकते, अशी मागणी होत आहे.विद्युत पुरवठा खंडित असल्याचा फटकापरिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाणी भरण्यासाठी टँकर तासन्तास ताटकळत उभा करावा लागत असल्यामुळे पाणीपुरवठा करण्यास विलंब होत आहे. याकडे वीज वितरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

टँकरची एकच फेरी होत असल्यामुळे पाणी पुरवठा अपुरा होत आहे. टँकरच्या दोन फेºया केल्यास पाणीटंचाई दूर होऊ शकते. - नारायण रामदास हरमकार, ग्रामस्थ, उमरा. गावाला एक टँकर मिळाला असून, काही प्रमाणात पाणीटंचाई दूर झाली आहे. दोन टँकरने पाणी पुरवठा केल्यास पूर्ण पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल.काशीराम हिवराळे मा. सरपंच. पिंपळखुटा येथे पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर आला होता; परंतु रस्ता अरुंद असल्यामुळे चालकांनी टँकर परत नेला. पंचायत समितीकडून दुसरा टँकर आज मिळणार आहे.- सुनीता रवींद्र शेलार, सरपंच, पिंपळखुटा.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाईPaturपातूर