शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
4
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
5
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
6
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
7
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
8
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
9
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
10
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
11
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
12
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
13
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
14
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
15
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
16
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
17
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
18
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
19
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
20
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

जीआरच निघाला नाही; ५० हजारांची मदत मिळणार की नाही?

By atul.jaiswal | Updated: September 29, 2021 12:04 IST

Akola News : अद्याप कोणताही शासन निर्णय निघालेला नसून, कोणत्याही प्रकारचे दिशानिर्देश राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

ठळक मुद्दे कोरोना मृतांचे कुटुंबीय करताहेत विचारणा प्रशासन म्हणते अजून निर्देशच नाहीत

अकोला : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. ही मदत राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. माध्यमांमध्ये याबाबतचे वृत्त झळकल्यानंतर कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदतीची आस लागली आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणताही शासन निर्णय निघालेला नसून, कोणत्याही प्रकारचे दिशानिर्देश राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे ही मदत कधी मिळणार, हे अजूनही अनिश्चितच आहे.

कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याची शिफारस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवार, २२ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्य सरकारांकडून आपत्ती निवारण निधीतून ही मदत देण्यात येईल, असे निश्चित करतानाच यासाठी जिल्हा पातळीवर समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. आलेल्या अर्जांवर संबंधित यंत्रणेला ३० दिवसांत निर्णय घ्यावा लागणार असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.

निकषांबाबत प्रशासन अनभिज्ञ

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य देण्याचे निश्चित झाले असले, तरी याबाबत अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना किंवा शासन निर्णय आलेला नाही. त्यामुळे या मदतीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत, याबाबत जिल्हा प्रशासन अनभिज्ञ आहे.

 

कोठे करायचा संपर्क?

माध्यमांमध्ये वृत्त झळकल्यानंतर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांकडून ही मदत कधी, कशी प्राप्त होणार याबाबत विचारणा केली जात आहे. यासाठीचे निकष काय यासंदर्भातही विचारणा होत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता, याबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील कोरोना बळी

११३७

 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत देण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. तथापि, यासंदर्भात आम्हाला अजून कोणतेही निर्देश नाहीत किंवा तसा जीआरही निघालेला नाही. जिल्ह्यातील मृतांची यादी आमच्याकडे आहे. दिशानिर्देश प्राप्त झाल्यावर त्या दिशेने कार्यवाही करता येईल.

- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला