शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बिल नाही तर वीज नाही; महावितरणची मंगळवारपासून ‘शून्य थकबाकी’ मोहिम

By atul.jaiswal | Updated: November 20, 2017 19:23 IST

अकोला : महावितरण च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम मंगळवारपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे

ठळक मुद्देनागपूर परिक्षेत्रात २०९ कोटींची थकबाकी वसुलीसाठी पथके गठितवीज बिल भरलेले नाही, त्यांच वीज पुरवठा खंडीत करण्याचा आदेश

- अतुल जयस्वालअकोला : महावितरण च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम मंगळवारपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे. या मोहीमेदरम्यान थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने ग्राहकांनी त्यांचेकडील थकीत वीजबिलाचा लगेच भरणा करून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदीया या पाचही परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे मार्च महिन्यात ४५ कोटी ४४ लाखांवर असलेली थकबाकी सात महिन्यांत तब्बल २०९ कोटी ६५ लाख रुपयांवर पोहचल्याने, महावितरणने या थकबाकीच्या वसुलीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या मोहिमेअतंर्गत ‘बिल नाही तर वीज नाही’ हा संदेश देत थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी-कर्मचा-यांची पथके निर्माण करून वसुली मोहीम राबविली जाणार आहे. प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत आणि पाचही परिमंडलांचे मुख्य अभियंते यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. वसुली करताना कोणाचीही गय होणार नाही. ज्यांनी वीज बिल भरलेले नाही, त्यांच वीज पुरवठा खंडीत करण्याचा आदेश या मोहीमेत सहभागी सर्व पथकांना देण्यात आले आहे.

अशी आहे जिल्हावार थकबाकीसप्टेंबर २०१७ अखेरीस महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत ३९लाखाहून अधिक घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक असून त्यांचेकडील जिल्हावार थकबाकी - अकोला (३२.३७ कोटी), बुलढाणा (२९.०६कोटी), वाशिम (२१.५१ कोटी), अमरावती (३२.४७ कोटी), यवतमाळ (२७.६६ कोटी), चंद्र्रपूर (१०.९६ कोटी), गडचिरोली (५.६४ कोटी), भंडारा (६.४३ कोटी), गोंदीया (१२.९९ कोटी), नागपूर (२७.३९ कोटी) तर वर्धा (९.४ कोटी) अशी एकूण २०९ कोटी ६५ लाख रुपयांवर थकबाकी आहे.मागच्या कारवाईत १९ हजार ग्राहकांवर कारवाईमागिल आठवड्यात राबविलेल्या मोहीमेत थकित वीजबिलांचा भरणा न करणाºया नागपूर परिक्षेत्रातील १९ हजार ५४४ ग्राहकांचा वीजपुरवठा ८ कोटी ९१ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित केला होता. यात नागपूर परिमंडल- ५ हजार ८४६ (१कोटी ७२ लाख), अकोला परिमंडल- ४ हजार ९८५ (३ कोटी), अमरावती परिमंडल- ५ हजार ६२१ (३ कोटी १३ लाख) चंद्रपूर परिमंडल- १ हजार ५९३ ( ६३ लाख) तर गोंदीया परिमंडलात १ हजार ४३३ ग्राहकांचा (५४ लाख) वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. 

टॅग्स :mahavitaranमहावितरण