शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याच्या ५० टक्के नमुन्यात नायट्रेट; २५६ गावांमध्ये ‘आरओ’ मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:32 IST

अकोला : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण प्रतिलीटर ५०० मिलीग्रॅमपेक्षा अधिक असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्या गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत ठराव घेतलेल्या ठरावासह प्रस्ताव जिल्हा परिषदेत सादर करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

अकोला : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण प्रतिलीटर ५०० मिलीग्रॅमपेक्षा अधिक असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्या गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत ठराव घेतलेल्या ठरावासह प्रस्ताव जिल्हा परिषदेत सादर करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.रासायनिक पाणी गुणवत्ता तपासणीत जिल्ह्यातील विविध स्रोतांतून घेतलेल्या २८०७ पैकी १५११ नमुन्यांच्या स्रोतातील पाणी आरोग्यास धोक्याचे आहे. १४२७ नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे, तर ६६ नमुन्यांमध्ये क्लोराइड अधिक आहे. पाण्याच्या रासायनिक आणि जैविक गुणधर्मात बदल झाल्याने त्याचा सजीवांवर घातक परिणाम होत असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधीच प्रसिद्ध केला आहे. सोबतच पाणी पुरवठा व स्वच्छता साहाय्य संस्थेनेही पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी केली आहे.भूगर्भ जल गुणवत्ता निर्देशांकाचे मोजमाप करण्यासाठी सामू, एकूण कठीणपणा, कॅल्शिअमचा कठीणपणा, मॅग्नेशिअम, क्लोराइड, एकूण विरघळलेले पदार्थ, फ्लोराइड, नायट्रेट, सल्फेट या घटकांचा विचार केला जातो. अकोला जिल्ह्यातील २८०७ पाणी नमुन्यांची २०१७ मध्ये आॅगस्टअखेर मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्यात आली. अकोला शहरासह सात तालुक्यांतील एकूण पाण्याच्या नमुन्यांपैकी १४२७ नमुन्यांत नायट्रेटचे प्रमाण मानवी आरोग्यास हानिकारकतेच्या मर्यादेपलीकडे असल्याचे पुढे आले. त्याशिवाय ६६ नमुन्यांतील क्लोराइडचे प्रमाणही आरोग्यास हानिकारक असल्याचे नमूद आहे. ३१९ नमुन्यांतील पाण्याचा कठीणपणा अधिक आहे. पाणी अधिक आम्लारीधर्मी असल्याचे १४१ नमुन्यांच्या तपासणीत पुढे आले. या पाण्याच्या वापरामुळे मानवास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी पाणी गुणवत्तेसाठी ग्रामपंचायती, आरोग्य विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये किडनीच्या आजाराने मृत्यूच्या घटनाही होत आहेत.त्यामुळे राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता साहाय्य विभागाने रासायनिक तपासणीच्या अहवालानुसार जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेला पत्र देत ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचा ठराव सादर करण्याचे पत्र पाठविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत घेतलेल्या ठरावात अटी व शर्तीसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

क्षाराचे प्रमाण अधिक असलेल्या गावांची संख्यातालुका                    गावेअकोला                    ३२अकोट                     १३बार्शीटाकळी             ६३बाळापूर                   ३०मूर्तिजापूर               ४७पातूर                        २१तेल्हारा                       ४०

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी