शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

रात्रीची संचारबंदी फक्त कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 11:57 IST

पोलिसांच्या कारवाईचाही धाक संपला असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत रस्त्यावरची गर्दी कायम असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने टिपले आहे.

अकोला : ‘अनलॉक’च्या या प्रक्रियेत कोरोनाही ‘अनलॉक’ झाला असून, अकोलेकरांंच्या बेफिकिरीमुळे या अत्यंत घातक विषाणूचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ आॅगस्ट रोजी लॉकडाऊन संदर्भात आदेश काढताना १ ते ३० सप्टेंबरपर्यंत संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी घोषित केली आहे; मात्र अकोल्यातील कोणत्याही कोपºयात या संचारबंदीच्या अंमलबजावणीचे चित्र नाही. पोलिसांच्या कारवाईचाही धाक संपला असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत रस्त्यावरची गर्दी कायम असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने टिपले आहे.‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनलॉक-४ सुरू झाला असून, यामध्ये अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आतापर्यंत बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवाही बहाल करण्यात आली असून, आंतरजिल्हा प्रवासासाठी आवश्यक असलेली ई-पासची अट तसेच रविवारचे लॉकडाऊनही रद्द करण्यात आले आहे. या विविध सवलती दिल्या जात असताना नागरिकांनी मास्क परिधान करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आणि किमान संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत संचारबंदीचे पालन करून संसर्ग टाळणे अपेक्षित आहे; परंतु अनलॉकच्या प्रक्रियेत नागरिक अधिक बेफिकीर झाल्याचे चित्र अकोला शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. अकोल्यातील सिंधी कॅम्प मार्गावर तर संध्याकाळी सातनंतर दुकानेही सुरू असतात अन् नागरिकांची वर्दळही रात्री १२ पर्यंत असते. जठारपेठ, टॉवर चौक, गांधी रोड, तुकाराम चौक, इन्कमटॅक्स चौक, जुने शहर अशा महत्त्वाच्या चौकातही रात्री वर्दळ असते. कलम १४४ च्या कारवाईचा धाकही संपला!कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदीचा आदेश काढलेला आहे. गेल्या १० दिवसात या आदेशाचे उल्लंघन झाले म्हणून एकाही व्यक्तीवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे कारवाईचा धाकच नसल्याने नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला