शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

रात्रीची संचारबंदी फक्त कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 11:57 IST

पोलिसांच्या कारवाईचाही धाक संपला असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत रस्त्यावरची गर्दी कायम असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने टिपले आहे.

अकोला : ‘अनलॉक’च्या या प्रक्रियेत कोरोनाही ‘अनलॉक’ झाला असून, अकोलेकरांंच्या बेफिकिरीमुळे या अत्यंत घातक विषाणूचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ आॅगस्ट रोजी लॉकडाऊन संदर्भात आदेश काढताना १ ते ३० सप्टेंबरपर्यंत संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी घोषित केली आहे; मात्र अकोल्यातील कोणत्याही कोपºयात या संचारबंदीच्या अंमलबजावणीचे चित्र नाही. पोलिसांच्या कारवाईचाही धाक संपला असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत रस्त्यावरची गर्दी कायम असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने टिपले आहे.‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनलॉक-४ सुरू झाला असून, यामध्ये अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आतापर्यंत बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवाही बहाल करण्यात आली असून, आंतरजिल्हा प्रवासासाठी आवश्यक असलेली ई-पासची अट तसेच रविवारचे लॉकडाऊनही रद्द करण्यात आले आहे. या विविध सवलती दिल्या जात असताना नागरिकांनी मास्क परिधान करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आणि किमान संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत संचारबंदीचे पालन करून संसर्ग टाळणे अपेक्षित आहे; परंतु अनलॉकच्या प्रक्रियेत नागरिक अधिक बेफिकीर झाल्याचे चित्र अकोला शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. अकोल्यातील सिंधी कॅम्प मार्गावर तर संध्याकाळी सातनंतर दुकानेही सुरू असतात अन् नागरिकांची वर्दळही रात्री १२ पर्यंत असते. जठारपेठ, टॉवर चौक, गांधी रोड, तुकाराम चौक, इन्कमटॅक्स चौक, जुने शहर अशा महत्त्वाच्या चौकातही रात्री वर्दळ असते. कलम १४४ च्या कारवाईचा धाकही संपला!कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदीचा आदेश काढलेला आहे. गेल्या १० दिवसात या आदेशाचे उल्लंघन झाले म्हणून एकाही व्यक्तीवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे कारवाईचा धाकच नसल्याने नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला