शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

अन्न सुरक्षा योजनेत नवीन गरजू शिधापत्रिकाधारकांची होणार निवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 12:45 IST

अकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत राज्यात नवीन पात्र व गरजू शिधापत्रिकाधारक लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या गरजू शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.

- संतोष येलकरअकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत राज्यात नवीन पात्र व गरजू शिधापत्रिकाधारक लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या गरजू शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.केंद्र शासनामार्फत अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ गत ५ जुलै २०१३ पासून लागू करण्यात आला. या अधिनियमानुसार राज्यासाठी ७६.३२ टक्के ग्रामीण (४६९.७१ लाख) आणि ४५.३४ टक्के शहरी (२३०.४५ लाख) अशी एकूण ७००.१६ लाख लाभार्थींची संख्या निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची राज्यात १ फेबु्रवारी २०१४ पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत जास्तीत जास्त लाभार्थींचा समावेश करण्यासाठी १६ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्यात आल्यानंतरही इष्टांकपूर्ती होत नसल्याने, नवीन पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांचा विचार करण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयात बदल करून अन्न सुरक्षा योजनेमध्ये नवीन पात्र लाभार्थींची निवड करताना १५ फेबु्रवारी २०१९ पर्यंतच्या योग्य व गरजू असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांचा विचार करण्यात यावा, असा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत २२ फेबु्रवारी २०१९ रोजी घेण्यात आला. त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेंतर्गत राज्यात नवीन पात्र गरजू शिधापत्रिकाधारकांची निवड करण्यात येणार असून, निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत नवीन पात्र व गरजू शिधापत्रिकाधारक लाभार्थींची निवड करून, त्यांना अन्नधान्याचा लाभ देण्यासंदर्भात जिल्ह्यातील तहसीलदार व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.-राहुल वानखेडे,जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला