शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अन्न सुरक्षा योजनेत नवीन गरजू शिधापत्रिकाधारकांची होणार निवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 12:45 IST

अकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत राज्यात नवीन पात्र व गरजू शिधापत्रिकाधारक लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या गरजू शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.

- संतोष येलकरअकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत राज्यात नवीन पात्र व गरजू शिधापत्रिकाधारक लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या गरजू शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.केंद्र शासनामार्फत अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ गत ५ जुलै २०१३ पासून लागू करण्यात आला. या अधिनियमानुसार राज्यासाठी ७६.३२ टक्के ग्रामीण (४६९.७१ लाख) आणि ४५.३४ टक्के शहरी (२३०.४५ लाख) अशी एकूण ७००.१६ लाख लाभार्थींची संख्या निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची राज्यात १ फेबु्रवारी २०१४ पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत जास्तीत जास्त लाभार्थींचा समावेश करण्यासाठी १६ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्यात आल्यानंतरही इष्टांकपूर्ती होत नसल्याने, नवीन पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांचा विचार करण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयात बदल करून अन्न सुरक्षा योजनेमध्ये नवीन पात्र लाभार्थींची निवड करताना १५ फेबु्रवारी २०१९ पर्यंतच्या योग्य व गरजू असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांचा विचार करण्यात यावा, असा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत २२ फेबु्रवारी २०१९ रोजी घेण्यात आला. त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेंतर्गत राज्यात नवीन पात्र गरजू शिधापत्रिकाधारकांची निवड करण्यात येणार असून, निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत नवीन पात्र व गरजू शिधापत्रिकाधारक लाभार्थींची निवड करून, त्यांना अन्नधान्याचा लाभ देण्यासंदर्भात जिल्ह्यातील तहसीलदार व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.-राहुल वानखेडे,जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला