शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

अन्न सुरक्षा योजनेत नवीन गरजू शिधापत्रिकाधारकांची होणार निवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 12:45 IST

अकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत राज्यात नवीन पात्र व गरजू शिधापत्रिकाधारक लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या गरजू शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.

- संतोष येलकरअकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत राज्यात नवीन पात्र व गरजू शिधापत्रिकाधारक लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या गरजू शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.केंद्र शासनामार्फत अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ गत ५ जुलै २०१३ पासून लागू करण्यात आला. या अधिनियमानुसार राज्यासाठी ७६.३२ टक्के ग्रामीण (४६९.७१ लाख) आणि ४५.३४ टक्के शहरी (२३०.४५ लाख) अशी एकूण ७००.१६ लाख लाभार्थींची संख्या निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची राज्यात १ फेबु्रवारी २०१४ पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत जास्तीत जास्त लाभार्थींचा समावेश करण्यासाठी १६ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्यात आल्यानंतरही इष्टांकपूर्ती होत नसल्याने, नवीन पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांचा विचार करण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयात बदल करून अन्न सुरक्षा योजनेमध्ये नवीन पात्र लाभार्थींची निवड करताना १५ फेबु्रवारी २०१९ पर्यंतच्या योग्य व गरजू असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांचा विचार करण्यात यावा, असा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत २२ फेबु्रवारी २०१९ रोजी घेण्यात आला. त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेंतर्गत राज्यात नवीन पात्र गरजू शिधापत्रिकाधारकांची निवड करण्यात येणार असून, निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत नवीन पात्र व गरजू शिधापत्रिकाधारक लाभार्थींची निवड करून, त्यांना अन्नधान्याचा लाभ देण्यासंदर्भात जिल्ह्यातील तहसीलदार व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.-राहुल वानखेडे,जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला