शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नवी बांधकाम विकास नियंत्रण नियमावली तातडीने लागू करावी!

By admin | Updated: June 16, 2014 22:11 IST

महानगरपालिकेने २0११ मध्ये मंजुरी दिलेली स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली लागू केल्यास, अशा बांधकामांपैकी तब्बल ८0 ते ९0 टक्के बांधकामे नियमानुकूल ठरू शकतात,

अकोला : महानगरपालिकेने जी बांधकामे नियमबाह्य ठरवून त्या विरुद्ध कारवाई सुरू केली आहे, त्या बांधकामांना, महानगरपालिकेने २0११ मध्ये मंजुरी दिलेली स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली लागू केल्यास, अशा बांधकामांपैकी तब्बल ८0 ते ९0 टक्के बांधकामे नियमानुकूल ठरू शकतात, ही वस्तुस्थिती असतानाही, नियमावलीला शासनाची मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी बांधकामांवर हातोडा उगारण्याची घाई का केल्या जात आहे, असा सवाल शहरातील व्यापारी-उद्योजकांच्या वर्तुळातून उपस्थित केल्या जाऊ लागला आहे. प्रस्तावित नियमावलीच्या अधीन राहून अशी बांधकामे दंड आकारून नियमित केल्यास महापालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडू शकते आणि त्यामधून शहरात ठप्प पडलेली विकासकामे सुरू केल्या जाऊ शकतात, अशी सूचनाही यासंदर्भात केल्या जात आहे. अकोला महानगरपालिकेने शहरातील अनेक बांधकामे नियमबाहय़ ठरवून त्या विरुद्ध कारवाई सुरू केली आहे. अशा सर्वच बांधकामांच्या मालकांना नोटीस बजावून काम बंद ठेवण्यास फर्माविण्यात आले असून, काही बांधकामे तर पाडण्यातही आली आहेत. परिणामी शहरातील सर्वात मोठा रोजगार निर्मिती उद्योग असलेला बांधकाम व्यवसाय मोठय़ा प्रमाणात ठप्प पडला असून, अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरासाठी २00१ मध्ये महापालिका अस्तित्वात आल्यापासून आजतागायत स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली लागू झालेली नाही. महापालिकेने गठनानंतर तब्बल दहा वर्षांनी, म्हणजे २0११ मध्ये स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली मंजूर करून अंतिम मंजुरातीसाठी राज्य शासनाकडे पाठविली; परंतु त्यासंदर्भात आवश्यक तो पाठपुरावा न केल्यामुळे अद्यापही शासनाची मंजुरी मिळू शकलेली नाही. दुसरीकडे राज्यातील काही अन्य महापालिकांनी अकोला महापालिकेने तयार केलेल्या स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावलीला शासनाची मंजुरी मिळवून, ती लागूदेखील केली आहे, हे येथे उल्लेखनीय आहे. सध्याच्या घडीला अकोला शहरासाठी लागू असलेली स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली १९८0 मध्ये तयार झाली होती आणि शासनाने तिला २00४ मध्ये परवानगी दिली होती. ह्यअह्ण वर्ग नगरपालिकांसाठी म्हणून तयार करण्यात आलेल्या त्या नियमावलीच्या आधारेच आजही शहरातील बांधकामांचे नियमन केल्या जात आहे. मुळात ती नियमावली तयार होऊन लागू होईपर्यंत तब्बल २४ वर्षांचा काळ उलटून गेला होता आणि आता तर आणखी १४ वर्षांचा काळ उलटला आहे. दरम्यानच्या काळात नगरपालिकेची जागा महापालिकेने घेतली. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, सध्या लागू असलेली नियमावली कालबाहय़ झाली असल्याचे कुणीही अमान्य करू शकणार नाही आणि तरीदेखील त्या नियमावलीच्या आधारे बांधकामांचे नियमन करण्याचा आग्रह चुकीचा आहे, असे मत व्यापारी-उद्योजक व्यक्त करीत आहेत. या पृष्ठभूमीवर, राज्य शासनाने अधिक विलंब न करता, अकोला शहरासाठीच्या स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीस तातडीने मंजुरी द्यावी आणि नांदेड शहराच्या धर्तीवर, बांधकामे पाडण्यऐवजी, जी बांधकामे नव्या नियमावलीनुसार नियमात बसत असतील, त्यांच्या मालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून, ती नियमित करावी आणि महापालिकेच्या तिजोरीत भर घालून शहराच्या विकासास चालना द्यावी, अशी सूचना व्यापारी-उद्योजकांच्या वर्तुळातून केल्या जात आहे.