शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नेर-धामणा बॅरेज : भूमीगत जलवाहिनीच्या कामाची किंमत गेली ७० वरून दिडशे कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:51 IST

अकोला : पाटबंधारे विभागाच्या अनास्थेचा परिणाम जिल्ह्यातील पथदर्शी नेरधामणा बॅरेजवर झाला आहे.मागील ९ वर्षापासून बॅरेजची कामे अर्धवटच आहेत. बांधकामाधीन अनेक कामे तर प्रलबिंत आहेतच भविष्यात करावयाच्या कामाबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने या बॅरेजचे भविष्य अधातंरी लटकले आहे.

ठळक मुद्देपाटचाऱ्या आता बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्याने सिंचनासाठी जलवाहीनीव्दारे पाणी सोडले जाणार आहे. निविदेसाठी विंलब होत असल्याने ७० कोटी रू पये मूळ किमत असलेल्या या भूमीगत सिंचन जलवाहीनीच्या कामाची किंमत आता दिडशे कोटी रू पयांवर गेली आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : पाटबंधारे विभागाच्या अनास्थेचा परिणाम जिल्ह्यातील पथदर्शी नेरधामणा बॅरेजवर झाला आहे.मागील ९ वर्षापासून बॅरेजची कामे अर्धवटच आहेत. बांधकामाधीन अनेक कामे तर प्रलबिंत आहेतच भविष्यात करावयाच्या कामाबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने या बॅरेजचे भविष्य अधातंरी लटकले आहे.पाटचाऱ्या आता बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्याने सिंचनासाठी जलवाहीनीव्दारे पाणी सोडले जाणार आहे. नेरधामणा बॅरेज प्रकल्पाच्या या कामाच्या निविदेसाठी विंलब होत असल्याने ७० कोटी रू पये मूळ किमत असलेल्या या भूमीगत सिंचन जलवाहीनीच्या कामाची किंमत आता दिडशे कोटी रू पयांवर गेली आहे. विशेष म्हणजे या पाईपलाईन प्रणालीव्दारे ३० टक्के पाण्याची बचत होते.त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ करणे गरजेचे आहे त्याचे कोणतेही काम झालेले नाही. ३० टक्के बचत होणाºया पाण्यामुळे निंबोरा,पाळोदी इत्यादी मागणी असलेल्या गावांचा या लाभ क्षेत्रात समावेश करता येईल पण ते करणार कोण असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे. तसेच यासाठी लागणाºया पंपीग मशीनची चाचणी घेऊन उच्च दाबाने शेतापर्यंत पणी पोहोचण्यात सक्षम आहे का याची खात्री करावी लागणार आहे. कारण ठिबक व तुषार सिंचनाने पिकांना पाणी देण्यासाठी २ ते ३ किलोग्रॅम प्रती सेमी. स्केवअर एवढा दाब शेतात मिळणे आवश्यक आहे. बॅरेजस्थळी जाण्यासाठी रस्ता नाही तर बॅरेजच्या गेटचे संचालन कसे करणार हा प्रश्न आहे. त्यासाठी फ्लड झोनचे काम करणे गरजेचे होते पण तेही झाले नाही.पाणीपुरवठ्यासाठी येथे विद्युतपुरवठा आवश्यक आहे त्यासाठी ३३ केव्ही उपकेंद्र उभारणीच्या कामाचे काय झाले हा प्रश्न अनुत्तरीत आहे.धामणा व नेर गावांच्या सुरक्षीततेसाठी या गावालगत घाट बांधून दोन गावांना जोडणाºया बाधीत रस्त्याची पूर्नस्थापना करावी लागणार असून, नदीचे पात्र रूद झाल्याने पुराच्या प्रवाहाची दिशा पावसाळ््यात बदलते असते. त्यामुळे या भागातील शेकडो हेक्टर शेतातील पिके व जमिन खरडून जाण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. या पुराच्या प्रवाहाची दिशा बदलने गरजेचे आहे त्यासाठी जमिनीचे संपादन करू न त्याचा मोबदला संबधिताना द्यावा लागेल पण अद्याप एकाही कामाखा मूहुर्त निघाला नाही. पानेटव इतर तिर्थक्षेत्र या बॅरेजच्या बुडीत क्षेत्रात जात असल्याने ही तिर्थक्षेत्र योग्य ठिकाणी स्थलांतरीत करू न घाट बांधावा लागणार आहे. बुडीत क्षेत्रातील वाहिन्या बाहेर काढणे,उपनद्यावरील पूल रस्त्याची पुर्नस्थापना करावी लागणार आहे. 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाNer-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज