शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नीळकंठ सूतगिरणी शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार - धोत्रे

By admin | Updated: May 16, 2017 01:58 IST

तेल्हारा : सूतगिरणी सुरू करण्याकरिता जे जे सहकार्य करतील त्यांचे व येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्ज्वल राहील, असे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : यापूर्वी अनेक सूतगिरण्या सुरू झाल्या व बंद पडल्या; परंतु नीळकंठ सपकाळ सह. सूतगिरणी पुन्हा सुरू झाल्यास ती शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला निश्चितच बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळेल व सूतगिरणी नफ्यात राहील, याची हमी देत असल्याने सूतगिरणी सुरू करण्याकरिता जे जे सहकार्य करतील त्यांचे व येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्ज्वल राहील, असे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले. ते तेल्हारा येथील शेतकरी मेळाव्यामध्ये बोलत होते.कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक संदीप खारोडे यांनी नगर परिषदेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात दि नीळकंठ सपकाळ सह. सूतगिरणी अकोलाचे संचालक या नात्याने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. याकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेशदादा तराळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, नीळकंठ सह. सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ. रणजित सपकाळ, संचालक श्रीराम कुकडे, संदीप खारोडे, नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, नयनाताई मनतकार, डॉ. केशवराव अवताडे यांची उपस्थिती होती. संजय धोत्रे यांनी शेतकरी संघटित होऊन जर काम करीत असतील तर यश निश्चितच येणार. तेल्हारा तालुका हा चांगल्या प्रतिचा कापूस पिकविण्यामध्ये प्रथम आहे. त्याच्या कापसाला भाव जर चांगला मिळाला, तर निश्चित शेतकऱ्यांची प्रगती होईल. सूतगिरणी नफ्यात राहणार असल्याने भागधारकांना लाभांषसुद्धा मिळेल. शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास पश्चात्तापाची वेळ येणार नाही, त्यामुळे सूतगिरणीचे भागधारक व्हा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ. रणजित सपकाळ यांनी सूतगिरणीच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत विस्तृत माहिती दिली. संचालन अ‍ॅड. गजानन तराळे व आभार बाजार समिती सभापती सुरेश तराळे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक व विविध राजकीय पक्षांचे व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूतगिरणी झाल्यास शेतकऱ्यांचा फायदा - आ. सावरकरआज या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहकार क्षेत्रामधील बँका व विविध कार्यकारी सोसायट्या यामध्ये व्यवहार करणे जेवढे सहज शक्य झाले आहे, तेवढे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये नाही, त्यामुळे सहकारी सूतगिरणी सुरू झाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल, असे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.