शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

नीळकंठ सूतगिरणी शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार - धोत्रे

By admin | Updated: May 16, 2017 01:58 IST

तेल्हारा : सूतगिरणी सुरू करण्याकरिता जे जे सहकार्य करतील त्यांचे व येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्ज्वल राहील, असे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : यापूर्वी अनेक सूतगिरण्या सुरू झाल्या व बंद पडल्या; परंतु नीळकंठ सपकाळ सह. सूतगिरणी पुन्हा सुरू झाल्यास ती शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला निश्चितच बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळेल व सूतगिरणी नफ्यात राहील, याची हमी देत असल्याने सूतगिरणी सुरू करण्याकरिता जे जे सहकार्य करतील त्यांचे व येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्ज्वल राहील, असे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले. ते तेल्हारा येथील शेतकरी मेळाव्यामध्ये बोलत होते.कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक संदीप खारोडे यांनी नगर परिषदेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात दि नीळकंठ सपकाळ सह. सूतगिरणी अकोलाचे संचालक या नात्याने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. याकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेशदादा तराळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, नीळकंठ सह. सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ. रणजित सपकाळ, संचालक श्रीराम कुकडे, संदीप खारोडे, नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, नयनाताई मनतकार, डॉ. केशवराव अवताडे यांची उपस्थिती होती. संजय धोत्रे यांनी शेतकरी संघटित होऊन जर काम करीत असतील तर यश निश्चितच येणार. तेल्हारा तालुका हा चांगल्या प्रतिचा कापूस पिकविण्यामध्ये प्रथम आहे. त्याच्या कापसाला भाव जर चांगला मिळाला, तर निश्चित शेतकऱ्यांची प्रगती होईल. सूतगिरणी नफ्यात राहणार असल्याने भागधारकांना लाभांषसुद्धा मिळेल. शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास पश्चात्तापाची वेळ येणार नाही, त्यामुळे सूतगिरणीचे भागधारक व्हा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ. रणजित सपकाळ यांनी सूतगिरणीच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत विस्तृत माहिती दिली. संचालन अ‍ॅड. गजानन तराळे व आभार बाजार समिती सभापती सुरेश तराळे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक व विविध राजकीय पक्षांचे व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूतगिरणी झाल्यास शेतकऱ्यांचा फायदा - आ. सावरकरआज या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहकार क्षेत्रामधील बँका व विविध कार्यकारी सोसायट्या यामध्ये व्यवहार करणे जेवढे सहज शक्य झाले आहे, तेवढे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये नाही, त्यामुळे सहकारी सूतगिरणी सुरू झाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल, असे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.