शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

बातम्यांच्या विपर्यास न करता वस्तुनिष्ठ मुल्यांकनाची गरज

By admin | Updated: March 26, 2017 13:56 IST

पत्रकारांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.

कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे पत्रकार संघाच्या अधिवेशनात प्रतिपादनअकोला : अलिकडच्या काळात बातम्या देण्याची वाढलेली स्पर्धा ही अनेकदा बातम्यांच विपर्यास करणारी ठरली आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ मुल्यांकन करणारे वार्तांकन केल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाणार नाही त्यासाठी पत्रकारांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले. अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या अकोला जिल्हा शाखेच्या वतीने आयोजीत एक दिवशीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल आदी उपस्थित होते. ना.फुंडकर म्हणाले की, पत्रकार हे समाजाचे कान, नाक डोळे आहेत. पत्रकारामुळे अनेक प्रश्न समोर येतात, सुटतात, त्या प्रश्नांना वाचा फुटते त्यामुळे हे क्षेत्र अतिशय जबाबदारीचे क्षेत्र आहे. अलिकडच्या काळात वाढलेल्या स्पर्धेमुळे अनेकदा चुकीचे वार्तांकन होते. मंत्रालयात शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीचे प्रकरणही असेच अर्धसत्यावर आधारीत आहे त्यामुळे चुकीच्या गोष्टींचा प्रसार होणार नाही याची दक्षता पत्रकारांनी घ्यावी. पत्रकारांना सरंक्षण व पेन्शन या दोन महत्वाच्या मागण्यांबाबत शासन निश्चीतपणे सकारात्मक असून त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.