शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बातम्यांच्या विपर्यास न करता वस्तुनिष्ठ मुल्यांकनाची गरज

By admin | Updated: March 26, 2017 13:56 IST

पत्रकारांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.

कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे पत्रकार संघाच्या अधिवेशनात प्रतिपादनअकोला : अलिकडच्या काळात बातम्या देण्याची वाढलेली स्पर्धा ही अनेकदा बातम्यांच विपर्यास करणारी ठरली आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ मुल्यांकन करणारे वार्तांकन केल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाणार नाही त्यासाठी पत्रकारांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले. अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या अकोला जिल्हा शाखेच्या वतीने आयोजीत एक दिवशीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल आदी उपस्थित होते. ना.फुंडकर म्हणाले की, पत्रकार हे समाजाचे कान, नाक डोळे आहेत. पत्रकारामुळे अनेक प्रश्न समोर येतात, सुटतात, त्या प्रश्नांना वाचा फुटते त्यामुळे हे क्षेत्र अतिशय जबाबदारीचे क्षेत्र आहे. अलिकडच्या काळात वाढलेल्या स्पर्धेमुळे अनेकदा चुकीचे वार्तांकन होते. मंत्रालयात शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीचे प्रकरणही असेच अर्धसत्यावर आधारीत आहे त्यामुळे चुकीच्या गोष्टींचा प्रसार होणार नाही याची दक्षता पत्रकारांनी घ्यावी. पत्रकारांना सरंक्षण व पेन्शन या दोन महत्वाच्या मागण्यांबाबत शासन निश्चीतपणे सकारात्मक असून त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.