शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

संघटन वाढविण्याची गरज- किरण अग्रवाल

By admin | Updated: October 14, 2015 01:26 IST

महाराज अग्रसेन जयंती उत्साहात

अकोला: देशात परिवर्तनाची लाट आहे आणि वेळ तीव्र गतीने सरकत आहे. केवळ जयजयकार करून सामाजिक संघटन निर्माण होणार नाही, तर त्यासाठी सर्व स्तरांतून युद्धस्तरावर प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक येथील अग्रसेवा दलाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल यांनी येथे केले.महाराज अग्रसेन जयंतीनिमित्त अग्रवाल समाजाच्यावतीने मंगळवारी दुपारी राणी सतिधाम येथून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेचा समारोप महाराज अग्रसेन भवन येथे झाला. यावेळी आयोजित समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अग्रसेन समाज कार्यकर्ते नेटाने कार्य करीत असले तरी त्याची दखल देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर घेतली जात आहे की नाही, हे पाहण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपण कोठे आहोत आणि आपल्याला कोठे जायचे आहे, हे आधी ठरवावे लागेल. तळागाळातील बांधवांच्या प्रगतीकरिता युद्धस्तरावर प्रयत्न करावे लागतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज प्रत्येक जण एकमेकांशी कनेक्ट असला तरी, एकमेकांपासून दूर जात आहे. बदल घडवून आणण्याची प्रचंड शक्ती युवकांमध्ये आहे. अग्रवाल समाजाचे संघटन वाढवावयाचे असेल, तर युवा वर्गाला आमुलाग्र परिवर्तन घडवावे लागेल. आत्मपरीक्षणाची गरज असून, संघटन वाढीसाठी मरगळ झटकण्याचे आवाहन किरण अग्रवाल यांनी यावेळी केले.