शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वसुंधरा वाचविण्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज - प्रा. एच. एम. देसरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:32 IST

अकोला : वसुंधरेला पर्यायानेच मानवतेला व शेतकर्‍याला वाचविण्यासाठी ‘समता मुलक शाश्‍वत विकास मार्ग’ स्वीकारण्याची गरज आहे. यासाठी चंगळवादी जीवनशैलीचा त्याग करावा लागेल व निसर्गानुकूल जीवनशैलीचा स्वीकार केला. जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जा स्रोत विकसित केले तरच वसुंधरेचा व मानवतेचा बचाव करता येईल, असा आशावाद प्रख्यात अर्थतज्ज्ञ व राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देअर्थतज्ज्ञ देसरडा यांचे मत विदर्भातील महाविद्यालयांमध्ये व्यापक प्रमाणात प्रबोधन 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वसुंधरेला पर्यायानेच मानवतेला व शेतकर्‍याला वाचविण्यासाठी ‘समता मुलक शाश्‍वत विकास मार्ग’ स्वीकारण्याची गरज आहे. यासाठी चंगळवादी जीवनशैलीचा त्याग करावा लागेल व निसर्गानुकूल जीवनशैलीचा स्वीकार केला. जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जा स्रोत विकसित केले तरच वसुंधरेचा व मानवतेचा बचाव करता येईल, असा आशावाद प्रख्यात अर्थतज्ज्ञ व राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केला.स्थानिक शिवाजी महाविद्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. प्रा. देसरडा म्हणाले, की वसुंधरेच्या रक्षणाची आर्त हाक ऐकण्याची गरज आहे. कर्ब व अन्य विषारी वायूच्या बेसुमार उत्सर्जनामुळे तापमान वाढीची जी स्थिती निर्माण झाली आहे, त्याबाबत जगातील १८४ देशांच्या १५३६१ शास्त्रज्ञांनी हवामान बदलाच्या धोक्याचा इशारा दिला आहे. हा धोका जैवविविधतेचा लोप करणार आहे. यावर वेळीच इलाज केला नाही, तर मानवाच्या अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह लागेल, असा इशारा शास्त्रज्ञांनीच दिला आहे. त्यामुळेच या संकटाच्या विरोधात तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वसुंधरा बचाव, मानव बचाव, किसान बचाव अशा प्रबोधन संवाद यात्रेला ६ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. यवतमाळ येथून प्रारंभ झाल्यानंतर ही यात्रा विदर्भातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याचे प्रा. देसरडा यांनी सांगितले. येणार्‍या काळात सौर उर्जेचा वापर वाढविण्याची गरज असून, ही ऊर्जा शाश्‍वत आणि हवामान बदलाच्या संकटांवर मात करणारी ठरेल. त्यामुळेच कोळशापेक्षाही स्वस्त पडणारी ही ऊर्जा सर्वत्र स्वीकारली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरNatureनिसर्गenvironmentवातावरण