शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे आणखी ७४ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 11:56 IST

आणखी ७३ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी शासनाकडून दोन टप्प्यात प्राप्त झालेली २३१ कोटी १० लाख रुपयांची मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित तिसºया टप्प्यातील मदत वाटपासाठी आणखी ७३ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली.अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील १०६ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळ पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनामार्फत जाहीर करण्यात आली.जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी एकूण ३०५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. त्यापैकी मदत वाटपाच्या दोन टप्प्यात १३ डिसेंबरपर्यंत २३१ कोटी १० लाख रुपयांची मदत शासनाकडून प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी आणखी ७३ कोटी ९० हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने तिसºया टप्प्यातील मदतीचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.दोन टप्प्यात वितरित केलेली अशी आहे मदतीची रक्कम!जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी शासनामार्फत दोन टप्प्यात प्राप्त झालेली २३१ कोटी १० लाख रुपयांची मदत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आली.अकोला तालुका-४३ कोटी ७९ लाख ३६ हजार रुपये, बार्शीटाकळी- २७ कोटी ४३ लाख ५८ हजार रुपये, अकोट -४१ कोटी १८ लाख ८४ हजार रुपये, तेल्हारा -२९ कोटी ८५ लाख ८ हजार रुपये, बाळापूर -३२ कोटी ७४ लाख ९ हजार रुपये, पातूर -२४ कोटी ५३ लाख रुपये व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी ३१ कोटी ५५ लाख ११ हजार रुपये मदतीची रक्कम वितरित करण्यात आली आहे.वितरित मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईची मदत शेतकºयांना वाटप करण्यासाठी दोन टप्प्यात शासनाकडून प्राप्त मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित तिसºया टप्प्यातील मदत वाटप करण्यासाठी आवश्यक असलेल्या मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी