शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे आणखी ७४ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 11:56 IST

आणखी ७३ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी शासनाकडून दोन टप्प्यात प्राप्त झालेली २३१ कोटी १० लाख रुपयांची मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित तिसºया टप्प्यातील मदत वाटपासाठी आणखी ७३ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली.अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील १०६ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळ पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनामार्फत जाहीर करण्यात आली.जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी एकूण ३०५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. त्यापैकी मदत वाटपाच्या दोन टप्प्यात १३ डिसेंबरपर्यंत २३१ कोटी १० लाख रुपयांची मदत शासनाकडून प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी आणखी ७३ कोटी ९० हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने तिसºया टप्प्यातील मदतीचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.दोन टप्प्यात वितरित केलेली अशी आहे मदतीची रक्कम!जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी शासनामार्फत दोन टप्प्यात प्राप्त झालेली २३१ कोटी १० लाख रुपयांची मदत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आली.अकोला तालुका-४३ कोटी ७९ लाख ३६ हजार रुपये, बार्शीटाकळी- २७ कोटी ४३ लाख ५८ हजार रुपये, अकोट -४१ कोटी १८ लाख ८४ हजार रुपये, तेल्हारा -२९ कोटी ८५ लाख ८ हजार रुपये, बाळापूर -३२ कोटी ७४ लाख ९ हजार रुपये, पातूर -२४ कोटी ५३ लाख रुपये व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी ३१ कोटी ५५ लाख ११ हजार रुपये मदतीची रक्कम वितरित करण्यात आली आहे.वितरित मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईची मदत शेतकºयांना वाटप करण्यासाठी दोन टप्प्यात शासनाकडून प्राप्त मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित तिसºया टप्प्यातील मदत वाटप करण्यासाठी आवश्यक असलेल्या मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी