शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला गटबाजीची लागण; कार्यकर्ते निपचित!

By admin | Updated: May 9, 2017 02:49 IST

पक्षात बदल केल्याची बाब अनेकांच्या जिव्हारी

अकोला : राज्य सरकारमध्ये सहभागी असणार्‍या शिवसेनेने शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीचा विषय असो वा तूर खरेदीच्या मुद्यावरून भाजपला लक्ष्य करत सर्वत्र रान उठवले आहे. ही भूमिका विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने घेणे अपेक्षित असताना अकोल्यात राष्ट्रवादीला अंतर्गत गटबाजीने पोखरल्याचे दिसून येते. राकाँच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा विजय देशमुख यांच्याकडे गेल्यानंतर पक्षांतर्गत बदल अनेकांच्या पचनी पडले नसल्याची पक्षात चर्चा आहे. जनहिताच्या मुद्यावर जुन्या जाणत्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी एकत्र येण्याची गरज असताना त्यांनी साधलेल्या चुप्पीमुळे राष्ट्रवादीच्या पुढील वाटचालीवर प्रश्नचिन्हं उपस्थित होण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील पाचपैकी तीन नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत भाजपने सत्ता स्थापन केली. भाजपच्या विजयी रथाला रोखणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघासह शिवसेनेला अशक्य झाल्याचे दिसून आले. निवडणुकांमध्ये जय-पराजय होणार, हे निश्‍चित असले, तरी अपयशामुळे खचून न जाता राजकीय पक्षांनी पुन्हा नव्या जोमाने उभे राहणे अपेक्षित होते. तूर्तास अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं तसेच काँग्रेसच्या गोटातील निरव शांतता कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत आहे. त्याउलट सरकारमध्ये सहभागी असणार्‍या शिवसेनेची भूमिका प्रचंड आक्रमक असल्याचे दिसून येते. शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीवरून भाजप सरकारला जेरीस आणणार्‍या शिवसेनेने तूर खरेदीच्या विषयावर सरकारला लक्ष्य केले. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी तूर खरेदीच्या ठिकाणी धाव घेऊन नाफेडच्या अधिकार्‍यांवर तूर फेकत निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ बाळापूर तालुक्यात शेतकर्‍यांचा रूमणे मोर्चा काढून भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. सेनेच्या रूमणे मोर्चाची दखल घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जिल्हाभरात आंदोलन तीव्र करण्याचा आदेश जिल्हाप्रमुख देशमुख यांना दिला आहे. त्यादिशेने शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. सरकारमध्ये सहभागी शिवसेनेने विरोधकांची भूमिका निभावणे पसंत केले असतानाच स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी चुप्पी साधली आहे. २0१४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत फेरबदल करत जिल्हाध्यक्षपदी विजय देशमुख यांची नियुक्ती केली. आधीच गलितगात्र झालेल्या राकाँतील अनेक आजी-माजी पदाधिकार्‍यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारणे तर दूरच, उलट पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी घालणे पसंत केल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. त्याचा परिणाम पक्ष बांधणीसह संघटनेवर होत असून, जनहिताच्या कोणत्या मुद्यावर राष्ट्रवादी लढा उभारणार, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांवर युती सरकार वारंवार घुमजाव करत आहे. सरकारच्या विरोधात आंदोलन उभारणे ही शिवसेनेची ह्यड्रामेबाजीह्ण सर्वसामान्यांच्या लक्षात आली आहे. येत्या ११ मे रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये पुढील रणनीती ठरवल्या जाईल. -विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष राकाँ