शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला गटबाजीची लागण; कार्यकर्ते निपचित!

By admin | Updated: May 9, 2017 02:49 IST

पक्षात बदल केल्याची बाब अनेकांच्या जिव्हारी

अकोला : राज्य सरकारमध्ये सहभागी असणार्‍या शिवसेनेने शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीचा विषय असो वा तूर खरेदीच्या मुद्यावरून भाजपला लक्ष्य करत सर्वत्र रान उठवले आहे. ही भूमिका विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने घेणे अपेक्षित असताना अकोल्यात राष्ट्रवादीला अंतर्गत गटबाजीने पोखरल्याचे दिसून येते. राकाँच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा विजय देशमुख यांच्याकडे गेल्यानंतर पक्षांतर्गत बदल अनेकांच्या पचनी पडले नसल्याची पक्षात चर्चा आहे. जनहिताच्या मुद्यावर जुन्या जाणत्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी एकत्र येण्याची गरज असताना त्यांनी साधलेल्या चुप्पीमुळे राष्ट्रवादीच्या पुढील वाटचालीवर प्रश्नचिन्हं उपस्थित होण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील पाचपैकी तीन नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत भाजपने सत्ता स्थापन केली. भाजपच्या विजयी रथाला रोखणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघासह शिवसेनेला अशक्य झाल्याचे दिसून आले. निवडणुकांमध्ये जय-पराजय होणार, हे निश्‍चित असले, तरी अपयशामुळे खचून न जाता राजकीय पक्षांनी पुन्हा नव्या जोमाने उभे राहणे अपेक्षित होते. तूर्तास अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं तसेच काँग्रेसच्या गोटातील निरव शांतता कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत आहे. त्याउलट सरकारमध्ये सहभागी असणार्‍या शिवसेनेची भूमिका प्रचंड आक्रमक असल्याचे दिसून येते. शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीवरून भाजप सरकारला जेरीस आणणार्‍या शिवसेनेने तूर खरेदीच्या विषयावर सरकारला लक्ष्य केले. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी तूर खरेदीच्या ठिकाणी धाव घेऊन नाफेडच्या अधिकार्‍यांवर तूर फेकत निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ बाळापूर तालुक्यात शेतकर्‍यांचा रूमणे मोर्चा काढून भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. सेनेच्या रूमणे मोर्चाची दखल घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जिल्हाभरात आंदोलन तीव्र करण्याचा आदेश जिल्हाप्रमुख देशमुख यांना दिला आहे. त्यादिशेने शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. सरकारमध्ये सहभागी शिवसेनेने विरोधकांची भूमिका निभावणे पसंत केले असतानाच स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी चुप्पी साधली आहे. २0१४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत फेरबदल करत जिल्हाध्यक्षपदी विजय देशमुख यांची नियुक्ती केली. आधीच गलितगात्र झालेल्या राकाँतील अनेक आजी-माजी पदाधिकार्‍यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारणे तर दूरच, उलट पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी घालणे पसंत केल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. त्याचा परिणाम पक्ष बांधणीसह संघटनेवर होत असून, जनहिताच्या कोणत्या मुद्यावर राष्ट्रवादी लढा उभारणार, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांवर युती सरकार वारंवार घुमजाव करत आहे. सरकारच्या विरोधात आंदोलन उभारणे ही शिवसेनेची ह्यड्रामेबाजीह्ण सर्वसामान्यांच्या लक्षात आली आहे. येत्या ११ मे रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये पुढील रणनीती ठरवल्या जाईल. -विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष राकाँ