शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र व्याख्यानमाला : दहशतवादी हल्ले भारतीय संस्कृतीला कलंक -फ्रान्सिस दिब्रिटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 13:13 IST

अलीकडच्या काळात अल्पसंख्याकांच्या हत्या झाल्या आहेत. ही हिंसा धर्मापुरती नाही राहिली. ती विचारवंतापर्यंत आली आहे. विचारांचे बळी पण गेले आहेत. दाभोळकर, पानसरेंच्या रू पात विचारांचे बळी गेले आहेत, असे प्रखर विचार वसई येथील वक्ता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले.

अकोला: हिंसेचे विशाल रू प म्हणजे दहशतवादी हल्ले. दहशतवादी हल्ले हे भारतीय संस्कृतीला कलंक आहेत. अलीकडच्या काळात अल्पसंख्याकांच्या हत्या झाल्या आहेत. ही हिंसा धर्मापुरती नाही राहिली. ती विचारवंतापर्यंत आली आहे. विचारांचे बळी पण गेले आहेत. दाभोळकर, पानसरेंच्या रू पात विचारांचे बळी गेले आहेत, असे प्रखर विचार वसई येथील वक्ता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले.बाबूजी देशमुख वाचनालयाच्या वतीने आयोजित नवरात्री व्याख्यानमाला प्रमिलाताई ओक सभागृह येथे सुरू आहे. सोमवारी तिसरे पुष्प गुंफताना फादर फ्रान्सिस दिब्रिटो ‘बलशाली भारत होवो’ या विषयावर बोलत होते. फादर दिब्रिटो पुढे म्हणाले, भयगंड ही मानसिक समस्या आहे. विचारवंतांनी यावर वस्तुनिष्ठ चिंतन करणे आवश्यक आहे. ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ आपल्याकडे अशी म्हण आहे. कारण भीतीपोटी संशय निर्माण होतो. संशयातून द्वेष आणि या द्वेषातूनच हिंसा घडते. पहिल्या हिंसेमध्येच दुसऱ्या हिंसेचे बीज पेरल्या जाते. हिंसा ही आपल्याच देशात घडते, असे नाही. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातदेखील वांशिक द्वेष होता. या द्वेषातूनच हत्या झाल्या आहेत. लिब्रो लोकांना झुंडीने ठार मारण्यात आले. माणसाला माणसांनी झुंडीने ठार केले आहे. जागतिक आकड्यानुसार आतापर्यंत २,०५७ झुंडीने हत्या जगात झाल्या आहेत. या झुंड हत्येचे विशाल रू प म्हणजे आजचे दहशतवादी हल्ले.निवडणुका लोकशाहीत आवश्यक आहे; परंतु सत्ता संपादन करण्यासाठी धर्माचा वापर होत असेल तर तो गैर आहे. यावर राजकीय पक्षातील नेत्यांनी विचार करणे गरजेचे आहे, असेही दिब्रिटो म्हणाले. आर्थिक महासत्तेत शोषण आहे. शोषण होणारी महासत्ता आपल्याला निर्माण करायची नाही. शेतकºयांना आत्महत्या का कराव्या लागतात, याचा सखोल विचार कोणी करीत नाही. शेतकºयांच्या आत्महत्यांमागे मल्टी नॅशनल कंपन्या असल्याचा आरोप दिब्रिटो यांनी केला. जगाला मोठी बाजारपेठ भारत मिळाली आहे. त्यांचे प्रेम भारतावर नाही. भारताच्या पैशांवर आहे. अशाने बलशाली भारत कसा निर्माण होईल, याचा विचार विचारवंतानी केला पाहिजे. आज अध्यात्मिक महासत्ता निर्माण करण्याची गरज आहे. एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती हा जगण्याचा आणि टिकून राहण्याचा एकमेव मंत्र आहे. एकता राहिली तरच बलशाली भारत निर्माण होईल, असे दिब्रिटो म्हणाले. 

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक