शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नवरात्र व्याख्यानमाला : दहशतवादी हल्ले भारतीय संस्कृतीला कलंक -फ्रान्सिस दिब्रिटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 13:13 IST

अलीकडच्या काळात अल्पसंख्याकांच्या हत्या झाल्या आहेत. ही हिंसा धर्मापुरती नाही राहिली. ती विचारवंतापर्यंत आली आहे. विचारांचे बळी पण गेले आहेत. दाभोळकर, पानसरेंच्या रू पात विचारांचे बळी गेले आहेत, असे प्रखर विचार वसई येथील वक्ता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले.

अकोला: हिंसेचे विशाल रू प म्हणजे दहशतवादी हल्ले. दहशतवादी हल्ले हे भारतीय संस्कृतीला कलंक आहेत. अलीकडच्या काळात अल्पसंख्याकांच्या हत्या झाल्या आहेत. ही हिंसा धर्मापुरती नाही राहिली. ती विचारवंतापर्यंत आली आहे. विचारांचे बळी पण गेले आहेत. दाभोळकर, पानसरेंच्या रू पात विचारांचे बळी गेले आहेत, असे प्रखर विचार वसई येथील वक्ता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले.बाबूजी देशमुख वाचनालयाच्या वतीने आयोजित नवरात्री व्याख्यानमाला प्रमिलाताई ओक सभागृह येथे सुरू आहे. सोमवारी तिसरे पुष्प गुंफताना फादर फ्रान्सिस दिब्रिटो ‘बलशाली भारत होवो’ या विषयावर बोलत होते. फादर दिब्रिटो पुढे म्हणाले, भयगंड ही मानसिक समस्या आहे. विचारवंतांनी यावर वस्तुनिष्ठ चिंतन करणे आवश्यक आहे. ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ आपल्याकडे अशी म्हण आहे. कारण भीतीपोटी संशय निर्माण होतो. संशयातून द्वेष आणि या द्वेषातूनच हिंसा घडते. पहिल्या हिंसेमध्येच दुसऱ्या हिंसेचे बीज पेरल्या जाते. हिंसा ही आपल्याच देशात घडते, असे नाही. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातदेखील वांशिक द्वेष होता. या द्वेषातूनच हत्या झाल्या आहेत. लिब्रो लोकांना झुंडीने ठार मारण्यात आले. माणसाला माणसांनी झुंडीने ठार केले आहे. जागतिक आकड्यानुसार आतापर्यंत २,०५७ झुंडीने हत्या जगात झाल्या आहेत. या झुंड हत्येचे विशाल रू प म्हणजे आजचे दहशतवादी हल्ले.निवडणुका लोकशाहीत आवश्यक आहे; परंतु सत्ता संपादन करण्यासाठी धर्माचा वापर होत असेल तर तो गैर आहे. यावर राजकीय पक्षातील नेत्यांनी विचार करणे गरजेचे आहे, असेही दिब्रिटो म्हणाले. आर्थिक महासत्तेत शोषण आहे. शोषण होणारी महासत्ता आपल्याला निर्माण करायची नाही. शेतकºयांना आत्महत्या का कराव्या लागतात, याचा सखोल विचार कोणी करीत नाही. शेतकºयांच्या आत्महत्यांमागे मल्टी नॅशनल कंपन्या असल्याचा आरोप दिब्रिटो यांनी केला. जगाला मोठी बाजारपेठ भारत मिळाली आहे. त्यांचे प्रेम भारतावर नाही. भारताच्या पैशांवर आहे. अशाने बलशाली भारत कसा निर्माण होईल, याचा विचार विचारवंतानी केला पाहिजे. आज अध्यात्मिक महासत्ता निर्माण करण्याची गरज आहे. एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती हा जगण्याचा आणि टिकून राहण्याचा एकमेव मंत्र आहे. एकता राहिली तरच बलशाली भारत निर्माण होईल, असे दिब्रिटो म्हणाले. 

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक