शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

नवरात्रोत्सवापूर्वीच कर्जमुक्तीचा शेतकर्‍यांना लाभ द्या! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:45 IST

भाजपाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून,  कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरून देताना शेतकर्‍यांना  रांगेत तासन्तास ताटकळत ठेवल्या जात आहे. आधार  कार्डमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी काढून शेतकर्‍यांची  बोळवण केली जात आहे. आधार कार्डमध्ये दुरुस्ती  करण्याच्या नावाखाली शेतकरी बांधवांना शासकीय  कार्यालयांचे हेलपाटे घ्यावे लागत आहेत. नवरात्र उत्सवा पूर्वी शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांचे तातडीने निवारण  करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून द्या; अन्यथा गंभीर  परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेच्यावतीने  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना देण्यात आला. 

ठळक मुद्देशिवसेनेचा जिल्हाधिकार्‍यांना इशारासेनेच्या मोर्चाने दणाणले शहर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजपाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून,  कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरून देताना शेतकर्‍यांना  रांगेत तासन्तास ताटकळत ठेवल्या जात आहे. आधार  कार्डमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी काढून शेतकर्‍यांची  बोळवण केली जात आहे. आधार कार्डमध्ये दुरुस्ती  करण्याच्या नावाखाली शेतकरी बांधवांना शासकीय  कार्यालयांचे हेलपाटे घ्यावे लागत आहेत. नवरात्र उत्सवा पूर्वी शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांचे तातडीने निवारण  करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून द्या; अन्यथा गंभीर  परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेच्यावतीने  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना देण्यात आला.  कर्जमाफीच्या नावाखाली भाजपाने शेतकर्‍यांच्या भावनांशी  खेळ चालवला आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे  अर्ज सादर करण्याचा निकष शेतकर्‍यांसाठी त्रासदायक ठरत  आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे त्यात  अधिकच भर पडल्याचा आरोप करीत शिवसेना जिल्हाप्रमुख  नितीन देशमुख यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढला. रेल्वे स्टेशन रोडवरील जिजाऊ  हॉल येथून  मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोर्चात शिवसेना  आ. गोपीकिशन बाजोरिया, सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर,  जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, मा.आ. संजय गावंडे, उ पजिल्हाप्रमुख बंडू ढोरे, गोपाल दातकर, दिलीप बोचे, रवींद्र  पोहरे, मुकेश मुरूमकार, महादेवराव गवळे, डॉ. दीपक  केळकर, शहरप्रमुख अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, प्रदीप  गुरुखुद्दे, तालुकाप्रमुख विकास पागृत, विजय माहोड, संजय  शेळके, अप्पू तिडके, गजानन मानतकर, रवी मुर्तडकर,  श्याम गावंडे, बळीराम कपले, आनंद बनचरे, विनायक  गुल्हाने, हरिभाऊ भालतिलक, विनीत पाटील भौरदकर,  सुभाष धनोकार, नगरसेवक गजानन चव्हाण, संतोष  अनासने, सर्कलप्रमुख दिनेश सरोदे, उपशहर प्रमुख  अभिषेक खरसाडे, योगेश गीते, अश्‍विन नवले, राहुल  कराळे, दिनू सुरोसे, तरुण बगेरे, गजानन बोराळे, शहरप्रमुख  विक्रांत शिंदे, सुनील रंधे, आनंद बनचरे, प्रवीण इंगळे, स तीश मानकर, अविनाश मोरे,अजय देशमुख, डॉ.राजेंद्र शर्मा,  संजय वाडेकर आदींसह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले  होते. 

काय म्हणाले पदाधिकारी?जिल्हाधिकार्‍यांसोबत आ.गोपीकिशन बाजोरिया, सहसंपर्क  प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, मा.आ.  संजय गावंडे यांनी सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील किती  शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार, ऑनलाइन प्रक्रिये त तांत्रिक अडचणी येत असताना त्या दूर करण्यासाठी  पर्यायी व्यवस्थेची उभारणी का केली नाही, असा सवाल  आ.बाजोरिया यांनी उपस्थित केला. अर्ज सादर करताना शे तकर्‍यांना त्रास होत असून, सेतू केंद्र चालकांकडून आर्थिक  लूट केली जात असल्याचे नितीन देशमुख यांनी नमूद केले.  या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले  जात असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी  सांगितले. यावेळी सविता वाकोडे, सुनीता मेटांगे, ज्योत्स्ना  चोरे, देवश्री ठाकरे उपस्थित होत्या.

मुस्लीम बांधवांचा मोठा सहभागकर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेने काढलेल्या मोर्चात जिल्ह्या तील शेतकर्‍यांसह मुस्लीम बांधवांची उपस्थिती लक्षणीय हो ती. खांद्यावर भगवे ध्वज घेऊन मुस्लीम तरुण मोर्चात  सहभागी झाले होते. 

बैलगाड्यातून पोहोचले पदाधिकारी!शेतकर्‍यांसाठी काढलेल्या मोर्चात शिवसेनेचे पदाधिकारी  बैलगाड्यांमधून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.  गोरेगाव येथील सविता वाकोडे यांच्यासह असंख्य महिला  मोर्चात सहभागी होत्या. बैलगाड्यातून वाकोडे यांच्यासह  माजी नगरसेविका राजेश्‍वरी शर्मा व इतर महिलांनी  जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.