शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नवतपा २५ मेपासून तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST

चंद्र केंद्रस्थानी ठेवून, वर्षभर सूर्याचे भ्रमण एकूण सत्तावीस नक्षत्रांमधून होत असते, असे भारतीय पंचांग सांगते. वर्षाचे ३६५ दिवस २७ ...

चंद्र केंद्रस्थानी ठेवून, वर्षभर सूर्याचे भ्रमण एकूण सत्तावीस नक्षत्रांमधून होत असते, असे भारतीय पंचांग सांगते. वर्षाचे ३६५ दिवस २७ नक्षत्रांमध्ये विभागलेले असून, ते विविध १२ राशींच्या अंतर्गत पडतात. सरासरी एका नक्षत्राचा अवधी १३ दिवसांपेक्षा थोडा अधिक असतो. सूर्याचा ‘रोहिणी’ नक्षत्रामध्ये होणारा प्रवेश आणि या कालावधीतील प्रथम नऊ दिवस म्हणजे ‘नवतपा’. उन्हाळ्यातील सर्वात जास्त तापणारे दिवस असा त्यांचा लौकिक आहे. या दिवसांत हवा आणि जमिनीचे उष्ण तापमान सर्वात जास्त राहते. या नऊ दिवसांचा सरळ संबंध पुढे येणाऱ्या नऊ नक्षत्रांसोबत जोडलेला असतो. नवतपा म्हणजे ९ दिवसांचा काळ असून या ९ दिवसांत उन्हाळ्यातील सर्वाधिक ऊन तापते असे म्हटले जाते. म्हणजेच उन्हाळ्याच्या ४ महिन्यांतील उन्हाची कसर या ९ दिवसांत निघते, असे बोलले जाते.

नवतपाचे हे आहे महत्त्व

जर, ‘नवतपा’ कालावधी, खऱ्या अर्थाने उष्ण आणि शुष्क राहिला, तर त्या वर्षी पाऊस उत्तम बरसतो, याउलट ज्या दिवशी तापमान कमी असेल, गारवा किंवा पाऊस पडल्यास ते संबंधित नक्षत्र कोरडे किंवा कमी पावसाचे राहत असल्याचे सांगण्यात येते.

पुढे येणारी नऊ नक्षत्रे

मृगशिरा किंवा मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी हस्त, चित्रा आणि स्वाती. स्वाती नक्षत्राची सुरुवात म्हणजे त्या वर्षाकरिता मान्सूनचा कालावधी संपुष्टात आला आहे, असे गृहीत धरले जाते, तेथून मोसमी वारे परतीचा प्रवास सुरू करतात.

नवतपा काळात उत्तरायणातील सूर्य कर्कवृत्ताच्या अगदी जवळ पोहोचलेला असतो, त्यामुळे भारतात तापमानवाढ आणि उन्हाळा हा ऋतू उच्चतम स्थितीमध्ये असतो. या वर्षी २०२१ मध्ये नवतपा २५ मेपासून सुरू होत आहेत. नवतपामधील वातावरण आणि पाऊस घेऊन येणारे नक्षत्र यांचा स्थानिक परिणाम प्रत्येक गाव/स्थान/ठिकाणाच्या केंद्रापासून ५० किमीच्या परिघात अनुभवता येतो.

- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक