शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

पीक कर्ज वाटपाकडे राष्ट्रीयीकृत बँकांचा कानाडोळा!

By admin | Updated: July 3, 2014 01:41 IST

अकोला जिल्ह्यात २५७ कोटींपैकी केवळ ७२ कोटींचे केले कर्ज वाटप

संतोष येलकर / अकोलाअकोला : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांना २५७ कोटी ६९ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ७२ कोटी ८३ लाखाचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पाऊस दडी मारून बसल्याने, जिल्हय़ात दुष्काळाचे सावट असल्याच्या स्थितीत शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाच्या कामाकडे राष्ट्रीयीकृत बँकांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे चित्र समोर येत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँक, ग्रामीण बँक, १७ राष्ट्रीयीकृत बँकांसह व्यापारी बँकांमिळून जिल्हय़ातील शेतकर्‍यांना एकूण ७१९ कोटी ३६ लाख पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले. त्यानुसार संबंधित बँकांमार्फत पीक कर्जाचे वाटपाची प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. त्यामध्ये गत मे महिन्याअखेर एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत ४१७ कोटी ७९ लाखांचे पीक कर्ज वाटप बँकांमार्फत करण्यात आले. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत ३0२ कोटी २३ लाख, ग्रामीण बँक ४0 कोटी, व्यापारी बँका २ कोटी ७३ लाख आणि १७ राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत केवळ ७२ कोटी ८३ लाखांचे पीक कर्ज वाटपाचा समावेश आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, देना बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सिंडीकेट बँक, इको बँक, बँक ऑफ इंडिया व इतर बँकांसह एकूण १७ राष्ट्रीयीकृत बँकांना खरिप हंगामात २५७ कोटी ६९ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी, मे अखेर या बँकांमार्फत केवळ ७२ कोटी ८३ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आल्याची स्थिती आहे.पावसाळा सुरू होऊन महिना उलटून जात आहे; मात्र पावसाचा पत्ता नसल्याने जिल्हय़ात खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून,जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असतानाच शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाच्या कामाकडे मात्र जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांचा कानाडोळा होत असल्याचे चित्र आहे.कर्ज वाटपाची गती वाढविण्याचे निर्देश देणार!खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे बँकांना देण्यात आलेले उद्दिष्ट आणि त्या तुलनेत वाटप करण्यात आलेले पीक कर्ज यासंदर्भात लवकरच राष्ट्रीयीकृत बँकांसह सर्वच बँकांच्या अधिकार्‍यांची बैठक घेण्यात येणार आहे. पीक कर्ज वाटपाच्या कामाची गती वाढविण्याचे निर्देश राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात येणार आहेत. -अरुण शिंदे, जिल्हाधिकारी