शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रीय पेयजल’चा आठ कोटींचा निधी शिल्लक

By admin | Updated: January 14, 2015 01:10 IST

अकोला जिल्ह्यातील कामे बंद करण्याची मागणी फेटाळली.

अकोला - राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मिळालेल्या निधीतून आठ कोटी रुपये शिल्लक आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन महिनेच शिल्लक असताना जिल्हाभरातील कामे विविध तक्रारींमुळे थांबविण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली. तथापि, तक्रारी काही मोजक्या गावातील कामांबाबत असताना संपूर्ण जिल्ह्यातील कामे थांबविण्याची सदस्यांची मागणी अधिकारी आणि पदाधिकार्‍यांच्या ठाम भूमिकेमुळे फेटाळून लावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक मंगळवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. या सभेत सदस्यांनी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातील कामांबाबत होत असलेल्या तक्रारींकडे पदाधिकारी आणि अधिकार्‍यांचे लक्ष वेधले तसेच तक्रारीची चौकशी होईपर्यंत जिल्ह्यात कोणतीच कामे करण्यात येऊ नये, असा आग्रह सदस्यांनी धरला. मुळात जिल्ह्याला मिळालेल्या एकूण निधीपैकी ४३ टक्के निधी अद्याप अखर्चित आहे, आर्थिक वर्ष संपत आले आहे; अशा परिस्थितीत कामे थांबविल्यास ८ कोटी ३२ लाख ८४ हजार रुपयांचा निधी अखर्चित राहू शकतो. २0१४-१५ या वर्षाकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडून अकोला जिल्ह्याला १९ कोटी ४६ लाख ४१ हजार रुपये निधी प्राप्त झाला होता. या निधीतून डिसेंबर २0१४ अखेरपर्यंत ११ कोटी १३ लाख ५७ हजार रुपये खर्च करण्यात आले. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मिळालेल्या एकूण निधीपैकी ५७. २१ टक्के निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. उर्वरित निधीतून कामे करण्यासाठी आता केवळ दोन-अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अशा वेळी काही योजनांच्या तक्रारींसाठी संपूर्ण जिल्ह्यातील कामे थांबविण्याचा निर्णय घेणे म्हणजे आठ कोटींचा निधी शिल्लक ठेवणे होय, ही बाब ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ज्या योजनांबाबत तक्रारी आहेत, ती कामे बंद ठेवून तत्काळ चौकशी करण्यात यावी आणि ज्या कामांबाबत तक्रारी नाहीत, ती कामे सुरू ठेवण्यात यावीत, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले. त्यामुळे सदस्यांना त्यांचा आग्रह सोडावा लागला.