शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

‘राष्ट्रीय पेयजल’चा आठ कोटींचा निधी शिल्लक

By admin | Updated: January 14, 2015 01:10 IST

अकोला जिल्ह्यातील कामे बंद करण्याची मागणी फेटाळली.

अकोला - राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मिळालेल्या निधीतून आठ कोटी रुपये शिल्लक आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन महिनेच शिल्लक असताना जिल्हाभरातील कामे विविध तक्रारींमुळे थांबविण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली. तथापि, तक्रारी काही मोजक्या गावातील कामांबाबत असताना संपूर्ण जिल्ह्यातील कामे थांबविण्याची सदस्यांची मागणी अधिकारी आणि पदाधिकार्‍यांच्या ठाम भूमिकेमुळे फेटाळून लावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक मंगळवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. या सभेत सदस्यांनी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातील कामांबाबत होत असलेल्या तक्रारींकडे पदाधिकारी आणि अधिकार्‍यांचे लक्ष वेधले तसेच तक्रारीची चौकशी होईपर्यंत जिल्ह्यात कोणतीच कामे करण्यात येऊ नये, असा आग्रह सदस्यांनी धरला. मुळात जिल्ह्याला मिळालेल्या एकूण निधीपैकी ४३ टक्के निधी अद्याप अखर्चित आहे, आर्थिक वर्ष संपत आले आहे; अशा परिस्थितीत कामे थांबविल्यास ८ कोटी ३२ लाख ८४ हजार रुपयांचा निधी अखर्चित राहू शकतो. २0१४-१५ या वर्षाकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडून अकोला जिल्ह्याला १९ कोटी ४६ लाख ४१ हजार रुपये निधी प्राप्त झाला होता. या निधीतून डिसेंबर २0१४ अखेरपर्यंत ११ कोटी १३ लाख ५७ हजार रुपये खर्च करण्यात आले. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मिळालेल्या एकूण निधीपैकी ५७. २१ टक्के निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. उर्वरित निधीतून कामे करण्यासाठी आता केवळ दोन-अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अशा वेळी काही योजनांच्या तक्रारींसाठी संपूर्ण जिल्ह्यातील कामे थांबविण्याचा निर्णय घेणे म्हणजे आठ कोटींचा निधी शिल्लक ठेवणे होय, ही बाब ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ज्या योजनांबाबत तक्रारी आहेत, ती कामे बंद ठेवून तत्काळ चौकशी करण्यात यावी आणि ज्या कामांबाबत तक्रारी नाहीत, ती कामे सुरू ठेवण्यात यावीत, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले. त्यामुळे सदस्यांना त्यांचा आग्रह सोडावा लागला.