शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नॅशनल अचिव्हमेंट सर्वेक्षण :  सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, नगरची पोरं हुश्शार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 13:32 IST

अचिव्हमेंट सर्वेक्षणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसंपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.

- नितीन गव्हाळे

अकोला : केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. या जिल्ह्यातील अनुक्रमे अचिव्हमेंट सर्वेक्षणामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ स्थान पटकावून आपली गुणवत्ता दाखवून दिली, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीत शिकणाºया विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि त्यांचे विषयांमधील ज्ञान तपासण्यासाठी विद्या प्राधिकरण पुणेमार्फत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण केले होते. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले. इयत्ता तिसरी, पाचवीच्या आणि आठवीच्या ५१ शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान इयत्ता तिसरीत शिकणाºया विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास (ईव्हीएस), मराठी भाषा, गणित विषयाची चाचणी घेण्यात आली. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास, मराठी भाषा, गणित विषयाची, तर इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची विज्ञान, मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र विषयातील चाचणी घेण्यात आली. या सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने तिसºया वर्गामध्ये उत्कृष्ट निकाल देत राज्यात प्रथम स्थान पटकावले. त्याखालोखाल रत्नागिरीने दुसरे, सातारा जिल्ह्याने तिसरे अहमदनगरने चौथे, तर सोलापूर जिल्ह्याने पाचवे स्थान पटकावले. सहावे स्थान बीड, तर सातवे स्थान गडचिरोली जिल्ह्याने मिळविले. इयत्ता पाचवीच्या सर्वेक्षणात पहिले स्थान रत्नागिरी, दुसरे सिंधुदुर्ग, हिंगोलीने तिसरे, गडचिरोलीने चौथे, बीडने पाचवे, तर उस्मानाबाद जिल्ह्याने सहावे स्थान पटकावले. तसेच आठवीच्या सर्वेक्षणात पहिले स्थान बीड जिल्ह्याने पटकावले. दुसरे सिंधुदुर्ग, तिसरे नंदूरबारने, चौथे बुलडाणाने, पाचवे स्थान हिंगोलीने, तर सहावे स्थान गडचिरोली जिल्ह्याने पटकावले. या सर्वेक्षणात गडचिरोली जिल्हा वगळता विदर्भातील एकाही जिल्ह्याने पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले नाही. यावरून विदर्भातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरत असल्याचे दिसून येते.

सर्वेक्षणातील पहिल्या पाचमधील जिल्ह्यांची टक्केवारीसिंधुदुर्ग जिल्ह्याने तिसºया वर्गातील सर्वेक्षणात एकूण ८२.१७ टक्के प्राप्त केले. रत्नागिरी जिल्ह्याने ८१.४५ टक्के, सातारा जिल्ह्याने ८0.३२, टक्के, तर नगर जिल्ह्याचा निकाल ७७.३९ टक्के, बीड जिल्ह्याचा ७६,७४, सोलापूर जिल्ह्याचा ७६.३४ आणि गडचिरोली जिल्ह्याचा ७१.१५ टक्के निकाल लागला.

पाचवीच्या सर्वेक्षणात रत्नागिरी अव्वलवर्ग पाचवीच्या सर्वेक्षणात रत्नागिरी जिल्ह्याने ६८.५१ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्याने ६५.१३ टक्के, हिंगोली जिल्ह्याने ६३.६७, गडचिरोली जिल्ह्याने ६२.९१ टक्के मिळविले. बीड जिल्ह्याने ६0.६१ टक्के पटकावत पाचवे स्थान मिळविले.

आठवीच्या सर्वेक्षणात बीड प्रथमवर्ग आठवीचा निकाल कमी लागला असून, यात बीडने ५५.0४ टक्के मिळवित पहिले स्थान पटकावले. ४८.२४ टक्के मिळवून दुसरे स्थान सिंधुदुर्गने, तर नंदुरबार जिल्ह्याने ५0.६१ टक्के मिळवून तिसरे स्थान प्राप्त केले.  बुलडाण्याने ४५.३५ टक्के मिळवित चौथे, तर हिंगोलीने ४६ टक्के मिळवित पाचवे आणि गडचिरोली जिल्ह्याने ४६.६२ टक्के प्राप्त करीत सहाव्या स्थानी झेप घेतली. 

विदर्भातील जिल्ह्यांची टक्केवारीगडचिरोली, बुलडाणा, वाशिमची कामगिरी समाधानकारक

गडचिरोली- ७१.१५ टक्के (वर्ग तिसरा)                ६२.९१ टक्के (वर्ग पाचवा)                ४६.६२  टक्के (वर्ग आठवा)वाशिम- ७१.८४  टक्के (वर्ग तिसरा)           ५९.७४ टक्के (वर्ग पाचवा)           ३८.0१ टक्के (वर्ग आठवा)अकोला-६२.८३ टक्के (वर्ग तिसरा)            ५५.४९ टक्के (वर्ग पाचवा)            ३६.५३ टक्के (वर्ग आठवा)नागपूर- ६७.६९ टक्के (वर्ग तिसरा)          ५0.८३ टक्के (वर्ग पाचवा)            ३४.४८ टक्के (वर्ग आठवा)अमरावती- ६0.२६ टक्के (वर्ग तिसरा)              ५0.४९ टक्के (वर्ग पाचवा)              ३६.९८ टक्के (वर्ग आठवा)यवतमाळ- ५६.८२ टक्के (वर्ग तिसरा)               ४५.८४ टक्के (वर्ग पाचवा)               ३३.८२ टक्के (वर्ग आठवा)बुलडाणा- ६८.४ टक्के (वर्ग तिसरा)           ५६.७४ टक्के (वर्ग पाचवा)            ४५.३५ टक्के (वर्ग आठवा)

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिक