शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नॅशनल अचिव्हमेंट सर्वेक्षण :  सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, नगरची पोरं हुश्शार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 13:32 IST

अचिव्हमेंट सर्वेक्षणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसंपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.

- नितीन गव्हाळे

अकोला : केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. या जिल्ह्यातील अनुक्रमे अचिव्हमेंट सर्वेक्षणामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ स्थान पटकावून आपली गुणवत्ता दाखवून दिली, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीत शिकणाºया विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि त्यांचे विषयांमधील ज्ञान तपासण्यासाठी विद्या प्राधिकरण पुणेमार्फत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण केले होते. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले. इयत्ता तिसरी, पाचवीच्या आणि आठवीच्या ५१ शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान इयत्ता तिसरीत शिकणाºया विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास (ईव्हीएस), मराठी भाषा, गणित विषयाची चाचणी घेण्यात आली. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास, मराठी भाषा, गणित विषयाची, तर इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची विज्ञान, मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र विषयातील चाचणी घेण्यात आली. या सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने तिसºया वर्गामध्ये उत्कृष्ट निकाल देत राज्यात प्रथम स्थान पटकावले. त्याखालोखाल रत्नागिरीने दुसरे, सातारा जिल्ह्याने तिसरे अहमदनगरने चौथे, तर सोलापूर जिल्ह्याने पाचवे स्थान पटकावले. सहावे स्थान बीड, तर सातवे स्थान गडचिरोली जिल्ह्याने मिळविले. इयत्ता पाचवीच्या सर्वेक्षणात पहिले स्थान रत्नागिरी, दुसरे सिंधुदुर्ग, हिंगोलीने तिसरे, गडचिरोलीने चौथे, बीडने पाचवे, तर उस्मानाबाद जिल्ह्याने सहावे स्थान पटकावले. तसेच आठवीच्या सर्वेक्षणात पहिले स्थान बीड जिल्ह्याने पटकावले. दुसरे सिंधुदुर्ग, तिसरे नंदूरबारने, चौथे बुलडाणाने, पाचवे स्थान हिंगोलीने, तर सहावे स्थान गडचिरोली जिल्ह्याने पटकावले. या सर्वेक्षणात गडचिरोली जिल्हा वगळता विदर्भातील एकाही जिल्ह्याने पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले नाही. यावरून विदर्भातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरत असल्याचे दिसून येते.

सर्वेक्षणातील पहिल्या पाचमधील जिल्ह्यांची टक्केवारीसिंधुदुर्ग जिल्ह्याने तिसºया वर्गातील सर्वेक्षणात एकूण ८२.१७ टक्के प्राप्त केले. रत्नागिरी जिल्ह्याने ८१.४५ टक्के, सातारा जिल्ह्याने ८0.३२, टक्के, तर नगर जिल्ह्याचा निकाल ७७.३९ टक्के, बीड जिल्ह्याचा ७६,७४, सोलापूर जिल्ह्याचा ७६.३४ आणि गडचिरोली जिल्ह्याचा ७१.१५ टक्के निकाल लागला.

पाचवीच्या सर्वेक्षणात रत्नागिरी अव्वलवर्ग पाचवीच्या सर्वेक्षणात रत्नागिरी जिल्ह्याने ६८.५१ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्याने ६५.१३ टक्के, हिंगोली जिल्ह्याने ६३.६७, गडचिरोली जिल्ह्याने ६२.९१ टक्के मिळविले. बीड जिल्ह्याने ६0.६१ टक्के पटकावत पाचवे स्थान मिळविले.

आठवीच्या सर्वेक्षणात बीड प्रथमवर्ग आठवीचा निकाल कमी लागला असून, यात बीडने ५५.0४ टक्के मिळवित पहिले स्थान पटकावले. ४८.२४ टक्के मिळवून दुसरे स्थान सिंधुदुर्गने, तर नंदुरबार जिल्ह्याने ५0.६१ टक्के मिळवून तिसरे स्थान प्राप्त केले.  बुलडाण्याने ४५.३५ टक्के मिळवित चौथे, तर हिंगोलीने ४६ टक्के मिळवित पाचवे आणि गडचिरोली जिल्ह्याने ४६.६२ टक्के प्राप्त करीत सहाव्या स्थानी झेप घेतली. 

विदर्भातील जिल्ह्यांची टक्केवारीगडचिरोली, बुलडाणा, वाशिमची कामगिरी समाधानकारक

गडचिरोली- ७१.१५ टक्के (वर्ग तिसरा)                ६२.९१ टक्के (वर्ग पाचवा)                ४६.६२  टक्के (वर्ग आठवा)वाशिम- ७१.८४  टक्के (वर्ग तिसरा)           ५९.७४ टक्के (वर्ग पाचवा)           ३८.0१ टक्के (वर्ग आठवा)अकोला-६२.८३ टक्के (वर्ग तिसरा)            ५५.४९ टक्के (वर्ग पाचवा)            ३६.५३ टक्के (वर्ग आठवा)नागपूर- ६७.६९ टक्के (वर्ग तिसरा)          ५0.८३ टक्के (वर्ग पाचवा)            ३४.४८ टक्के (वर्ग आठवा)अमरावती- ६0.२६ टक्के (वर्ग तिसरा)              ५0.४९ टक्के (वर्ग पाचवा)              ३६.९८ टक्के (वर्ग आठवा)यवतमाळ- ५६.८२ टक्के (वर्ग तिसरा)               ४५.८४ टक्के (वर्ग पाचवा)               ३३.८२ टक्के (वर्ग आठवा)बुलडाणा- ६८.४ टक्के (वर्ग तिसरा)           ५६.७४ टक्के (वर्ग पाचवा)            ४५.३५ टक्के (वर्ग आठवा)

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिक