शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

नॅशनल अचिव्हमेंट सर्वेक्षण :  सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, नगरची पोरं हुश्शार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 13:32 IST

अचिव्हमेंट सर्वेक्षणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसंपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.

- नितीन गव्हाळे

अकोला : केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. या जिल्ह्यातील अनुक्रमे अचिव्हमेंट सर्वेक्षणामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ स्थान पटकावून आपली गुणवत्ता दाखवून दिली, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीत शिकणाºया विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि त्यांचे विषयांमधील ज्ञान तपासण्यासाठी विद्या प्राधिकरण पुणेमार्फत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण केले होते. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले. इयत्ता तिसरी, पाचवीच्या आणि आठवीच्या ५१ शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान इयत्ता तिसरीत शिकणाºया विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास (ईव्हीएस), मराठी भाषा, गणित विषयाची चाचणी घेण्यात आली. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास, मराठी भाषा, गणित विषयाची, तर इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची विज्ञान, मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र विषयातील चाचणी घेण्यात आली. या सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने तिसºया वर्गामध्ये उत्कृष्ट निकाल देत राज्यात प्रथम स्थान पटकावले. त्याखालोखाल रत्नागिरीने दुसरे, सातारा जिल्ह्याने तिसरे अहमदनगरने चौथे, तर सोलापूर जिल्ह्याने पाचवे स्थान पटकावले. सहावे स्थान बीड, तर सातवे स्थान गडचिरोली जिल्ह्याने मिळविले. इयत्ता पाचवीच्या सर्वेक्षणात पहिले स्थान रत्नागिरी, दुसरे सिंधुदुर्ग, हिंगोलीने तिसरे, गडचिरोलीने चौथे, बीडने पाचवे, तर उस्मानाबाद जिल्ह्याने सहावे स्थान पटकावले. तसेच आठवीच्या सर्वेक्षणात पहिले स्थान बीड जिल्ह्याने पटकावले. दुसरे सिंधुदुर्ग, तिसरे नंदूरबारने, चौथे बुलडाणाने, पाचवे स्थान हिंगोलीने, तर सहावे स्थान गडचिरोली जिल्ह्याने पटकावले. या सर्वेक्षणात गडचिरोली जिल्हा वगळता विदर्भातील एकाही जिल्ह्याने पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले नाही. यावरून विदर्भातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरत असल्याचे दिसून येते.

सर्वेक्षणातील पहिल्या पाचमधील जिल्ह्यांची टक्केवारीसिंधुदुर्ग जिल्ह्याने तिसºया वर्गातील सर्वेक्षणात एकूण ८२.१७ टक्के प्राप्त केले. रत्नागिरी जिल्ह्याने ८१.४५ टक्के, सातारा जिल्ह्याने ८0.३२, टक्के, तर नगर जिल्ह्याचा निकाल ७७.३९ टक्के, बीड जिल्ह्याचा ७६,७४, सोलापूर जिल्ह्याचा ७६.३४ आणि गडचिरोली जिल्ह्याचा ७१.१५ टक्के निकाल लागला.

पाचवीच्या सर्वेक्षणात रत्नागिरी अव्वलवर्ग पाचवीच्या सर्वेक्षणात रत्नागिरी जिल्ह्याने ६८.५१ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्याने ६५.१३ टक्के, हिंगोली जिल्ह्याने ६३.६७, गडचिरोली जिल्ह्याने ६२.९१ टक्के मिळविले. बीड जिल्ह्याने ६0.६१ टक्के पटकावत पाचवे स्थान मिळविले.

आठवीच्या सर्वेक्षणात बीड प्रथमवर्ग आठवीचा निकाल कमी लागला असून, यात बीडने ५५.0४ टक्के मिळवित पहिले स्थान पटकावले. ४८.२४ टक्के मिळवून दुसरे स्थान सिंधुदुर्गने, तर नंदुरबार जिल्ह्याने ५0.६१ टक्के मिळवून तिसरे स्थान प्राप्त केले.  बुलडाण्याने ४५.३५ टक्के मिळवित चौथे, तर हिंगोलीने ४६ टक्के मिळवित पाचवे आणि गडचिरोली जिल्ह्याने ४६.६२ टक्के प्राप्त करीत सहाव्या स्थानी झेप घेतली. 

विदर्भातील जिल्ह्यांची टक्केवारीगडचिरोली, बुलडाणा, वाशिमची कामगिरी समाधानकारक

गडचिरोली- ७१.१५ टक्के (वर्ग तिसरा)                ६२.९१ टक्के (वर्ग पाचवा)                ४६.६२  टक्के (वर्ग आठवा)वाशिम- ७१.८४  टक्के (वर्ग तिसरा)           ५९.७४ टक्के (वर्ग पाचवा)           ३८.0१ टक्के (वर्ग आठवा)अकोला-६२.८३ टक्के (वर्ग तिसरा)            ५५.४९ टक्के (वर्ग पाचवा)            ३६.५३ टक्के (वर्ग आठवा)नागपूर- ६७.६९ टक्के (वर्ग तिसरा)          ५0.८३ टक्के (वर्ग पाचवा)            ३४.४८ टक्के (वर्ग आठवा)अमरावती- ६0.२६ टक्के (वर्ग तिसरा)              ५0.४९ टक्के (वर्ग पाचवा)              ३६.९८ टक्के (वर्ग आठवा)यवतमाळ- ५६.८२ टक्के (वर्ग तिसरा)               ४५.८४ टक्के (वर्ग पाचवा)               ३३.८२ टक्के (वर्ग आठवा)बुलडाणा- ६८.४ टक्के (वर्ग तिसरा)           ५६.७४ टक्के (वर्ग पाचवा)            ४५.३५ टक्के (वर्ग आठवा)

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिक