शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नांदेड - श्रीगंगानगर एक्स्प्रेसचं दर आठवड्याचं रडगाणं; सुरत, बिकानेरला जाणारे प्रवासी त्रस्त

By atul.jaiswal | Updated: September 12, 2022 12:46 IST

नांदेड येथून दर गुरुवारी सकाळी ६.५० वाजता निघणारी ही गाडी सकाळी ११.५० वाजता अकोल्यात येऊन पुढे भुसावळमार्गे श्रीगंगानगरला रवाना होते. परतीच्या प्रवासात शनिवारी सुटणारी ही गाडी रविवारी रात्री २१.२० वाजता अकोल्यात आल्यानंतर सोमवारी पहाटे २.३० वाजता नांदेड येथे पोहोचते.

अकोला : अकोल्यासह वाशिम, हिंगोली जिल्ह्यांतील प्रवाशांना सुरत, अहमदाबाद, बिकानेरमार्गे थेट राजस्थानमध्ये घेऊन जाणारी नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गत अनेक आठवड्यांपासून प्रस्थान स्थानकावरूनच पाच ते सहा तास उशिरा धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या रेल्वेगाडीच्या रेकचा वापर नांदेड-तिरूपती एक्स्प्रेसकरिता होत असल्याने दर आठवड्याला ही गाडी गंतव्यस्थळी सहा ते आठ तास उशिरा पोहोचत आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर व महाराष्ट्रातील नांदेड या दोन स्थानकांदरम्यान १७६२३/१७६२४ नांदेड-श्रीगंगानगर-नांदेड ही साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी धावते. विदर्भातील अकोला, वाशिमसह मराठवाड्यातील हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील प्रवासी व व्यापाऱ्यांना थेट सुरत, अहमदाबाद, बिकानेर या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जाण्यासाठी सोयीस्कर असल्याने ही गाडी लोकप्रिय ठरली आहे. 

नांदेड येथून दर गुरुवारी सकाळी ६.५० वाजता निघणारी ही गाडी सकाळी ११.५० वाजता अकोल्यात येऊन पुढे भुसावळमार्गे श्रीगंगानगरला रवाना होते. परतीच्या प्रवासात शनिवारी सुटणारी ही गाडी रविवारी रात्री २१.२० वाजता अकोल्यात आल्यानंतर सोमवारी पहाटे २.३० वाजता नांदेड येथे पोहोचते. त्यानंतर गुरुवारपर्यंत ही गाडी नांदेड येथे यार्डात उभी राहत असल्याने दक्षिण-मध्य रेल्वेने या गाडीच्या रेकचा वापर ०७६४१/०७६४२ नांदेड-तिरूपती-नांदेड एक्स्प्रेससाठी सुरू केला. सोमवारी रात्री नांदेड येथून तिरूपतीला निघणारी ही गाडी मंगळवारी रात्री गंतव्यस्थळी पोहोचते. 

परतीच्या प्रवासात मंगळवारी रात्री ११.५० ला निघणारी ही गाडी बुधवारी रात्री ११.४५ वाजता पोहोचते. तथापि, परळी व लातूर येथे दोन वेळा इंजिन मागे-पुढे करणे व विशेष गाडी असल्यामुळे नियमित गाड्या आधी जाऊ द्याव्या लागत असल्यामुळे या गाडीला नांदेड येथे पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे रेकच्या मेंटेनन्सला पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी गत काही आठवड्यांपासून नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेसला गुरुवारी पहाटे ६.५० या निश्चित वेळेत रवाना करणे शक्य होत नाही.

व्यापाऱ्यांची होत आहे गैरसोयपूर्णा, वसमत, हिंगोली, पुसद, वाशिम, रिसोड, अकोला येथील शेकडो व्यापारी सुरत, अहमदाबाद, वडोदरा, बिकानेर या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या शहरांमध्ये व्यवसायानिमित्त जाण्यासाठी नांदेड-श्रीगंगानर एक्स्प्रेसला प्राधान्य देतात. परंतु, गत काही आठवड्यांपासून ही गाडी उशिरा सुटत असल्यामुळे सुरत येथे मध्यरात्री पोहोचत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना रात्रीच्या वेळी भटकंती करावी लागत आहे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAkolaअकोलाpassengerप्रवासी