शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मुंबई विद्यापीठाचे नामांतर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करा - मधूकरराव कांबळे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 15:38 IST

अकोला : मुंबई विद्यापीठाचे नामातंर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करावे, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)मधूकरराव कांबळे यांनी शुक्रवारी येथे दिली.

ठळक मुद्दे शुक्रवार,१५जून रोजी कांबळे यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली. शासनाने साडेसहाशे कोटीची तरतूद केली असून, हे भव्य स्मारक मुंबईतील घाटकोपर भागातील चिराग नगर येथे साकारणार आहे.याचा आराखडा लवकरच तयार करणार असून, त्याअगोदर चिराग नगरातील लोकांचे इमारतीमध्ये पूर्नवसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अकोला : मुंबई विद्यापीठाचे नामातंर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करावे, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)मधूकरराव कांबळे यांनी शुक्रवारी येथे दिली. त्यांनी मुंबईतील घाटकोपर भागात अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक सरकार उभारणा असल्याचेही सांगितले.मुंबई विद्यापीठाला मॉ जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली असून, त्यांनतर लगेचच शुक्रवार,१५जून रोजी कांबळे यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली. यासंदर्भात नामातंराच्या नव्या वादाला ही सुरू वात समजायची का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता मुंबई विद्यापिठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची आमची जुनीच मागणी असल्याचे कांबळे यांनी सांगितले. संयुक्त महाराष्ट्रचा आवाज अण्णाभाऊ साठे यांनी बुलंद केला. कामगार,कष्टकरी,समतावादी चळवळ उभी केली. भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबध त्यांनी दृढ केले. त्यांच्या अजरामर साहित्याने समाज जागृती केली,या भूमीपुत्राचे नाव मुंबई विद्यापीठाला दिल्यास विद्यापीठाचा गौरव वाढणारा आहे. म्हणून ही आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे हा वादाचा विषयच नसल्यसाचे त्यांनी अधोरेखित केले. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बांधण्यासाठी शासनाने साडेसहाशे कोटीची तरतूद केली असून, हे भव्य स्मारक मुंबईतील घाटकोपर भागातील चिराग नगर येथे साकारणार आहे. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय  ग्रंथालय,राष्ट्रीय व राज्य लोकसेवा आयोगाची विद्यार्थ्यांना पूर्व तयार करता यावी म्हणून, निवासी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल.वातानुकूलीत सभागृह, मुला-मुलीचे वसतीगृही येथे असेल. याचा आराखडा लवकरच तयार करणार असून, त्याअगोदर चिराग नगरातील लोकांचे इमारतीमध्ये पूर्नवसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.आरक्षणाच्या मुद्दयावर त्यांनी आरक्षण अनुसूचित जातीतील एकाच मोठ्या वर्गाला मिळाले असल्याचा आरोप करीत आरक्षणाचे वर्गीकरण करू न अनुसचित जातीतील शेवटच्या घटकापर्यंत हे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठीची मागणी अनेकवर्षापासून करतो आहे. याकरिता अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार आरक्षण असावे, यासाठीचा आमचा संघर्ष यापुढेही सुरू राहणार असल्याने त्यांनी सांगितले. जळगाव जिल्हयात दलित (मांतग)समाजाच्या मुलांनी विहिरीत आंघोळ केली म्हणून मारहाण करण्यात आली.

दलितावरील अत्याचार आणि सरकारचा संबध नाही 

दलितावरील अन्यायाचे प्रकार या सरकारमध्ये वाढले आहेत, या प्रश्नावर बोलताना त्यांनी अन्याय अत्याचार आणि सरकारचा यात काहीच संबध नसल्याचे सांगत, दलितावरील अत्याचर हजारोवर्षापासून सुरू आहेत. याचा सरकारशी संबध नसतो, यापुर्वीच्या सरकारमध्येही अत्याचार झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाMumbai Universityमुंबई विद्यापीठ