शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

विलीनीकरणाच्या नावाखाली मूर्तिजापूर आगारावर संक्रांत!

By admin | Updated: June 13, 2017 00:31 IST

तेल्हारा आगार अकोटात विलीन करण्याचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : अकोला जिल्ह्यातील दोन आगारांसह राज्यातील पाच आगारांचे विलीनीकरण करण्याचे प्रस्तावित असून, या आगारांच्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. मूर्तिजापूर आगार बंद करून ते कारंजा आगारात, तर तेल्हारा आगार अकोटमध्ये विलीन करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील दोन आगाराव्यतिरिक्त राज्यातील आणखी तीन आगारांचे विलीनीकरण होणार असल्याचे संकेत आहेत. मूर्तिजापूर आगाराचे भूमिपूजन ३० नोव्हेंबर १९९७ रोजी तत्कालीन परिवहन मंत्री चंद्रकांत खैरे व एसटी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष शिवाजीराव गोताड यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर मूर्तिजापूर येथे ९ मे २००३ रोजी मूर्तिजापूर आगार सुरू झाले. स्थापनेच्या १४ वर्षांनंतरही आगारात सुविधांची वानवा आहे. एवढेच नव्हे तर आगाराला मान्यतेपासूनही वंचित ठेवण्यात आले आहे. आगाराच्या सुसूत्रीकरण आणि एकत्रीकरणाच्या नावाखाली मूर्तिजापूर आगार बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. याविषयी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या समितीची बैठक २ जून रोजी झाली. या बैठकीत मूर्तिजापूर आणि तेल्हारा आगाराची माहिती संबंधिताना देण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर या समितीची पुन्हा बैठक होणार असून, त्यामध्ये या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. वाढत्या स्पर्धेमुळे एसटी महामंडळाने आगाराची संख्या वाढवणे अपेक्षित असताना महामंडळाने मात्र आहे त्या आगारांना बंद करण्याचा सपाटा लावला आहे. मूर्तिजापुरात आगाराची गरज मूर्तिजापूर शहरातून यवतमाळ-परतवाडा या मार्गावर शकुंतला नॅरोगेज रेल्वे धावते. याशिवाय मूर्तिजापूर हे मध्य रेल्वेचे मोठे रेल्वे स्टेशन आहे. महामार्गावर असल्याने येथून अनेक बस मोठ्या शहरामध्ये जातात. असे असताना मूर्तिजापूर आगार शहरातच ठेवण्याची गरज आहे. मात्र, ते विलीन करण्याचा घाट घातल्या जात आहे. त्याला लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटनांनी विरोध करण्याची गरज आहे. मूर्तिजापूर आणि तेल्हारा आगारांमध्ये असलेली कर्मचारी संख्या व इतर माहिती वरिष्ठांनी मागितली होती. या आगारांच्या विलीनीकरणाचा निर्णय अजून झालेला नाही. दोन्ही आगारांची माहिती वरिष्ठांकडे सादर करण्यात आली आहे. - सचिन क्षीरसागर, विभागीय वाहतूक अधिकारी, अकोला