शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

‘नाफेड’ची पत उचल र्मयादा संपली!

By admin | Updated: November 9, 2014 01:14 IST

पणन महासंघासोबत करारास विलंब; शासकीय कापूस खरेदीवर प्रश्नचिन्ह.

राजरत्न सिरसाट/अकोला येत्या १५ नोव्हेंबरपासून राज्यात कापूस खरेदी सुरू करण्याची घोषणा राज्य शासनाने केली असली तरी, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड)ची पत उचल (क्रेडिट बॉरोईंग) र्मयादा संपली असल्याने, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाकडून हमी दराने कापूस खरेदी करण्याच्या करारासंदर्भात ह्यनाफेडह्णने हात वर केले आहेत आणि त्यामुळे शासकीय कापूस खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात यंदा जवळपास ८0 लाख गाठी कापसाचे उत्पादन अपेक्षित असून, शेतकर्‍यांनी कापूस विक्रीला सुरू वात केली आहे; परंतु शेतकर्‍यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांना कापूस पणन महासंघाद्वारा हमी दराने कापूस खरेदीची केंद्र्रे सुरू होण्याची प्रतीक्षा आहे; पण केंद्र शासनाच्या अर्थ विभागाकडून नाफेडला देण्यात आलेली २९00 कोटीची पत उचल र्मयादा यंदा संपली आहे. त्यामुळे नाफेडचा अभिकर्ता (एजंट) असलेल्या कापूस पणन महासंघासोबत करार करण्यात नाफेडने विलंब चालविला आहे. परिणामी राज्य शासनाने येत्या १५ नोव्हेंबर रोजी राज्यात कापूस खरेदीची घोषणा केली असली तरी, या पेचामुळे खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नाफेडची पत उचल र्मयादा संपल्याने यंदा पणन महासंघासोबत कापूस खरेदी करारास विलंब होत आहे. मुख्यमंत्र्यानी याबाबत दखल घेतली असल्याने, कापूस खरेदीचा प्रश्न लवकर मार्गी लागण्याची शक्यता असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी यांनी सांगीतले. *मुख्यमंत्र्याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न केद्रीय कृषी मंत्री राज्याच्या दौर्‍यावर आले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी कापूस खरेदीबाबत चर्चा केली. शुक्रवारी मुख्यमंत्र्याच्या वर्षा या निवासस्थानी कापूस खरेदीच्या पेचावर तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीला मुख्यमंत्र्यासह केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग, राज्याचे पणन व सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, तसेच पणन सचिव व व्यवस्थापकीय संचालकांची उपस्थिती होती. बैठकीत कापूस खरेदीबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आश्‍वासन केंद्रीय कृषी मंत्र्यानी दिले. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याबाबत तातडीने दखल घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.*कापूस खरेदी करणार कोण? पणन महासंघ की सीसीआय?नाफेडची पत उचल र्मयादा संपल्याने, कापूस खरेदी ह्यनाफेडह्ण करणार, की भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) असा प्रश्न निर्माण झाला आहे. ह्यनाफेडह्णला विलंब होत असेल, तर कापूस पणन महासंघ ह्यसीसीआयह्णचा अभिकर्ता म्हणून कापूस खरेदी करण्यास तयार असल्याचे, महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सीसीआयमार्फत कापूस खरेदी करायची असल्यास त्याकरीता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची परवानगी आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.*हमी दर प्रति क्विंटल ४0३0 रू पये केंद्र शासनाने यंदा कापसासाठी प्रति क्विंटल४0३0 रू पये हमी दर जाहीर केला आहे; परंतु यंदा वेळेवर कापूस खरेदी सुरू झाली नसल्याने, शेतकर्‍यांना बाजारात कवडीमोल दराने कापूस विकावा लागत आहे.