शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील माझं गावं, माझं पाणी आता संपूर्ण विदर्भात!

By admin | Updated: December 5, 2014 23:42 IST

लोकमत इफेक्ट: पाणीटंचाई दूर करणारा प्रकल्प संपूर्ण विदर्भात राबविण्याच्या सूचना.

संतोष मुंढे/ वाशिमजिल्ह्यातील चार गावांमध्ये पाणीटंचाईचे निवारण आणि सिंचनवाढीसाठी राबविण्यात आलेला माझ गावं, माझं पाणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता विदर्भातील अकराही जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना नागपूर आणि अमरावती विभागाचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या उपसंचालकांनी दिल्या आहेत. पाणीटंचाई दूर करून, सिंचनासाठीही उपयुक्त ठरणार्‍या या प्रकल्पावर लोकमतने प्रकाशझोत टाकला होता, हे विशेष. पाण्यासाठी कायम टँकरवर अवलंबून असलेल्या वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालूक्यांतर्गत येत असलेल्या सावरगाव फॉरेस्ट, रिसोड तालुक्यातील कवठा खूर्द, मालेगाव तालुक्यातील सुदी, अनसिंग आणि वाशिम तालुक्यातील भोयता या चार गावांमध्ये पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी जलसंधारणाची कामे हाती घेतली होती. या कामासाठी जिल्हाधिकार्‍यांनी भूजल सर्वेक्षण विभागाला एक कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला होता. त्यानंतर चारही गावांमध्ये जलसंधारणाच्या पथदश्री प्रकल्पाला सुरुवात झाली होती. वर्षभराचे काम अल्प कालावधीत, म्हणजे केवळ अडीच ते तीन महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाचे वरीष्ठ भूवैज्ञानिक बी.एस. गजभीये यांच्या नेतृत्वातील पथकाने पूर्ण केले. गावाजवळून वाहणार्‍या लहान, मोठय़ा नाल्यावर वरच्या बाजूला १५ ते २0 मिटर खोलीचे बोअर करण्यात आले. त्यामध्ये पावसाळ्य़ातील पाणी भूगर्भात सोडून जलपूनर्भरणाची व्यवस्था करण्यात आली. त्याखाली एक गॅबीयन बंधारा, त्यानंतर अडीच, तीन मिटर खोल व ९ ते १0 मिटर रुंद व १६0 ते २00 मिटर लांब असा पूनर्भरण चर बांधण्यात आला. मधल्या टप्यातही तीन बोअर, गॅबीयन बंधारा व तसाच पुनर्भरण चर बांधण्यात आला. शेवटच्या टप्प्यात तीन बोअर, गॅबीयन बंधारा, जलपूर्भरण चर, त्यानंतर आणखी तीन बोअर आणि एक मोठा भूमिगत बंधारा करण्यात आला. हे काम अंतीम टप्प्यात असतानाच मार्च, एप्रिलमध्ये परतीचा पाउस आला. त्यामुळे बोअरच्या सहाय्याने भूगर्भात जलपूनर्भरण होऊन चर पाण्याने तूडूंब भरले. त्यामुळे एरव्ही जानेवारी, फेब्रुवारीतच पाण्यासाठी टँकर बोलवावी लागणारी चारही गावे टँकरमुक्त झाली. यावर्षी पाऊस अत्यल्प झाला असला तरी, या चारही गावांमध्ये अद्याप जलसंकट ओढावलेले नाही. याशिवाय प्रत्येक गातील जवळपास १५0 एकर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास प्रकल्पामुळे मदत झाली. या यशोगाथेवर लोकमतने प्रकाशझोत टाकल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाच्या उपसंचालकांनी हा प्रकल्प संपूर्ण विदर्भात राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.भूजल सर्वेक्षण विभागाने चारही गावातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. वरिष्ठांनी या कामाची दखल घेवून प्रकल्पाची इत्थंभूत माहिती मागीतली होती. आता इतरत्र हा प्रकल्प राबविला जाणार असल्याने अभिमान वाटत असल्याचे वाशिम जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णीयांनी मत नोंदविले.