शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

वाशिम जिल्ह्यातील माझं गावं, माझं पाणी आता संपूर्ण विदर्भात!

By admin | Updated: December 5, 2014 23:42 IST

लोकमत इफेक्ट: पाणीटंचाई दूर करणारा प्रकल्प संपूर्ण विदर्भात राबविण्याच्या सूचना.

संतोष मुंढे/ वाशिमजिल्ह्यातील चार गावांमध्ये पाणीटंचाईचे निवारण आणि सिंचनवाढीसाठी राबविण्यात आलेला माझ गावं, माझं पाणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता विदर्भातील अकराही जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना नागपूर आणि अमरावती विभागाचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या उपसंचालकांनी दिल्या आहेत. पाणीटंचाई दूर करून, सिंचनासाठीही उपयुक्त ठरणार्‍या या प्रकल्पावर लोकमतने प्रकाशझोत टाकला होता, हे विशेष. पाण्यासाठी कायम टँकरवर अवलंबून असलेल्या वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालूक्यांतर्गत येत असलेल्या सावरगाव फॉरेस्ट, रिसोड तालुक्यातील कवठा खूर्द, मालेगाव तालुक्यातील सुदी, अनसिंग आणि वाशिम तालुक्यातील भोयता या चार गावांमध्ये पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी जलसंधारणाची कामे हाती घेतली होती. या कामासाठी जिल्हाधिकार्‍यांनी भूजल सर्वेक्षण विभागाला एक कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला होता. त्यानंतर चारही गावांमध्ये जलसंधारणाच्या पथदश्री प्रकल्पाला सुरुवात झाली होती. वर्षभराचे काम अल्प कालावधीत, म्हणजे केवळ अडीच ते तीन महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाचे वरीष्ठ भूवैज्ञानिक बी.एस. गजभीये यांच्या नेतृत्वातील पथकाने पूर्ण केले. गावाजवळून वाहणार्‍या लहान, मोठय़ा नाल्यावर वरच्या बाजूला १५ ते २0 मिटर खोलीचे बोअर करण्यात आले. त्यामध्ये पावसाळ्य़ातील पाणी भूगर्भात सोडून जलपूनर्भरणाची व्यवस्था करण्यात आली. त्याखाली एक गॅबीयन बंधारा, त्यानंतर अडीच, तीन मिटर खोल व ९ ते १0 मिटर रुंद व १६0 ते २00 मिटर लांब असा पूनर्भरण चर बांधण्यात आला. मधल्या टप्यातही तीन बोअर, गॅबीयन बंधारा व तसाच पुनर्भरण चर बांधण्यात आला. शेवटच्या टप्प्यात तीन बोअर, गॅबीयन बंधारा, जलपूर्भरण चर, त्यानंतर आणखी तीन बोअर आणि एक मोठा भूमिगत बंधारा करण्यात आला. हे काम अंतीम टप्प्यात असतानाच मार्च, एप्रिलमध्ये परतीचा पाउस आला. त्यामुळे बोअरच्या सहाय्याने भूगर्भात जलपूनर्भरण होऊन चर पाण्याने तूडूंब भरले. त्यामुळे एरव्ही जानेवारी, फेब्रुवारीतच पाण्यासाठी टँकर बोलवावी लागणारी चारही गावे टँकरमुक्त झाली. यावर्षी पाऊस अत्यल्प झाला असला तरी, या चारही गावांमध्ये अद्याप जलसंकट ओढावलेले नाही. याशिवाय प्रत्येक गातील जवळपास १५0 एकर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास प्रकल्पामुळे मदत झाली. या यशोगाथेवर लोकमतने प्रकाशझोत टाकल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाच्या उपसंचालकांनी हा प्रकल्प संपूर्ण विदर्भात राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.भूजल सर्वेक्षण विभागाने चारही गावातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. वरिष्ठांनी या कामाची दखल घेवून प्रकल्पाची इत्थंभूत माहिती मागीतली होती. आता इतरत्र हा प्रकल्प राबविला जाणार असल्याने अभिमान वाटत असल्याचे वाशिम जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णीयांनी मत नोंदविले.