शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वाशिम जिल्ह्यातील माझं गावं, माझं पाणी आता संपूर्ण विदर्भात!

By admin | Updated: December 5, 2014 23:42 IST

लोकमत इफेक्ट: पाणीटंचाई दूर करणारा प्रकल्प संपूर्ण विदर्भात राबविण्याच्या सूचना.

संतोष मुंढे/ वाशिमजिल्ह्यातील चार गावांमध्ये पाणीटंचाईचे निवारण आणि सिंचनवाढीसाठी राबविण्यात आलेला माझ गावं, माझं पाणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता विदर्भातील अकराही जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना नागपूर आणि अमरावती विभागाचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या उपसंचालकांनी दिल्या आहेत. पाणीटंचाई दूर करून, सिंचनासाठीही उपयुक्त ठरणार्‍या या प्रकल्पावर लोकमतने प्रकाशझोत टाकला होता, हे विशेष. पाण्यासाठी कायम टँकरवर अवलंबून असलेल्या वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालूक्यांतर्गत येत असलेल्या सावरगाव फॉरेस्ट, रिसोड तालुक्यातील कवठा खूर्द, मालेगाव तालुक्यातील सुदी, अनसिंग आणि वाशिम तालुक्यातील भोयता या चार गावांमध्ये पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी जलसंधारणाची कामे हाती घेतली होती. या कामासाठी जिल्हाधिकार्‍यांनी भूजल सर्वेक्षण विभागाला एक कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला होता. त्यानंतर चारही गावांमध्ये जलसंधारणाच्या पथदश्री प्रकल्पाला सुरुवात झाली होती. वर्षभराचे काम अल्प कालावधीत, म्हणजे केवळ अडीच ते तीन महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाचे वरीष्ठ भूवैज्ञानिक बी.एस. गजभीये यांच्या नेतृत्वातील पथकाने पूर्ण केले. गावाजवळून वाहणार्‍या लहान, मोठय़ा नाल्यावर वरच्या बाजूला १५ ते २0 मिटर खोलीचे बोअर करण्यात आले. त्यामध्ये पावसाळ्य़ातील पाणी भूगर्भात सोडून जलपूनर्भरणाची व्यवस्था करण्यात आली. त्याखाली एक गॅबीयन बंधारा, त्यानंतर अडीच, तीन मिटर खोल व ९ ते १0 मिटर रुंद व १६0 ते २00 मिटर लांब असा पूनर्भरण चर बांधण्यात आला. मधल्या टप्यातही तीन बोअर, गॅबीयन बंधारा व तसाच पुनर्भरण चर बांधण्यात आला. शेवटच्या टप्प्यात तीन बोअर, गॅबीयन बंधारा, जलपूर्भरण चर, त्यानंतर आणखी तीन बोअर आणि एक मोठा भूमिगत बंधारा करण्यात आला. हे काम अंतीम टप्प्यात असतानाच मार्च, एप्रिलमध्ये परतीचा पाउस आला. त्यामुळे बोअरच्या सहाय्याने भूगर्भात जलपूनर्भरण होऊन चर पाण्याने तूडूंब भरले. त्यामुळे एरव्ही जानेवारी, फेब्रुवारीतच पाण्यासाठी टँकर बोलवावी लागणारी चारही गावे टँकरमुक्त झाली. यावर्षी पाऊस अत्यल्प झाला असला तरी, या चारही गावांमध्ये अद्याप जलसंकट ओढावलेले नाही. याशिवाय प्रत्येक गातील जवळपास १५0 एकर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास प्रकल्पामुळे मदत झाली. या यशोगाथेवर लोकमतने प्रकाशझोत टाकल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाच्या उपसंचालकांनी हा प्रकल्प संपूर्ण विदर्भात राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.भूजल सर्वेक्षण विभागाने चारही गावातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. वरिष्ठांनी या कामाची दखल घेवून प्रकल्पाची इत्थंभूत माहिती मागीतली होती. आता इतरत्र हा प्रकल्प राबविला जाणार असल्याने अभिमान वाटत असल्याचे वाशिम जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णीयांनी मत नोंदविले.