शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

- हभप अशोक महाराज जायले, संत भास्कर महाराज पालखी, अध्यक्ष. ------------------------- वारी हा वारकऱ्याच्या जीवनातील सर्वांत मोठा आनंदाचा क्षण ...

- हभप अशोक महाराज जायले, संत भास्कर महाराज पालखी, अध्यक्ष.

-------------------------

वारी हा वारकऱ्याच्या जीवनातील सर्वांत मोठा आनंदाचा क्षण आहे. आषाढीच्या वारीची आस प्रत्येक वारकऱ्याला सहा महिन्यांपासून लागत असते. वारी वारकऱ्यांचा प्राण असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी खंडित झाल्याने दु:ख होत आहे. देवाने कोरोनाचे संकट दूर करावे व वारी पुन्हा सुरू व्हावी, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

-हभप राजू महाराज कोकाटे

-------------------------

वारकरी संतांनी वारीचं माहात्म्य सांगितले आहे. मी संत भास्कर महाराज पालखी सोहळ्यात वीणेकरी म्हणून गत २५ वर्षांपासून पायदळ वारी करीत आहे. या वारीतील अनुभव माझ्या आयुष्याची शिदोरी आहे. माझे जीवन धन्य झाले आहे. परंतु, गत वर्षापासून वारी खंडित झाल्याचे शल्य सारखे बोचत राहते. पंढरपूर हे वारकऱ्यांचे माहेर आहे. विठोबाचे परम्‌ दर्शन व संतजनांच्या सहवासापासून मी पारखा झालो आहे. शासनाने नियम शिथिल करून वारकऱ्यांना वारीची परवानगी द्यायला पाहिजे होती. मनाला खंत वाटते. पंढरी वारी न चुकावी हीच मनोमन इच्छा आहे.

हभप मोहन महाराज रेळे, वडाळी सटवाई

----------------------

पंढरीची वारी, आहे माझे घरी!

पंढरीनाथाच्या परम्‌ दर्शनाची आंतरिक ओढ असून, वारी खंडित झाली, ही मनाला अस्वस्थ करणारी आहे. कोरोना आपत्तीने हा माहेराचा आनंदच जणू हिरावून घेतला आहे. विठुरायाचे अस्तित्व चराचरांत आहे. गुरूवर्य वासुदेव महाराजांनी आषाढी यात्रेत विठ्ठल चरणी देह ठेवून विठ्ठलरूप झाले, हा भावार्थ हृदयात साठवून श्रद्धासागर क्षेत्री गुरूवर्य महाराजांचे दर्शनाने पंढरीची वारी झाल्याचे समाधान प्राप्त झाले.

हभप विष्णू महाराज गावंडे

----------------------------

पंढरपूर मानस वारी केली!

माझे घरी पिढ्यान्पिढ्या पंढरीची वारी आहे. विठुरायाने बोलावले तरच वारी घडते. भगवंतास भक्तांचे जीविताची काळजी आहे. कोविड आपत्तीकाळात पंढरीला न जाता घरीच विठ्ठलाचे नामस्मरण करणे, हीच खरी विठ्ठलभक्ती आहे. त्यामुळे पंढरीला न जाता विठ्ठलनामाचा गजर करीत मानस वारी मी पूर्ण केल्याचे समाधान आहे.

हभप ज्ञानेश्वर महाराज वसू.

------------------------

पंढरीची वारी परम् भाग्याचा क्षण

वारी परंपरेत ३१ वर्षे अखंडित पंढरीची वारी केली. पंढरीनाथाचे परम् दर्शन आणि संतजनांचा सहवास हा माझ्या जीवनाचा परम् भाग्याचा क्षण आहे. पंढरीची वारी गत दोन वर्षांत खंडित झाल्याने काहीतरी हरवल्यासारखे वाटते. ही मनाला वेदना देणारा प्रसंग का यावा, पंढरीनाथा! वारीचा मार्गच बंद झाला आहे. हे संकट दूर सारून पंढरीची वारी चुकू देऊ नको.

हभप सुधाकरराव महाराज पुंडकर.