शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

माझ्या जीवाला धोका आहे; माझा घातपात होऊ शकतो! आमदार नितीन देशमुख यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

By आशीष गावंडे | Updated: April 20, 2023 19:02 IST

गुरुवारी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य शासनाच्या धोरणात्मक भूमिकेवर सडकून टीका केली. 

अकोला - जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघातील ६९ गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी अकोला ते नागपूर पायी संघर्ष यात्रा काढणाऱ्या शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगत माझा घातपात होऊ शकतो, असे म्हणत, राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गुरुवारी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य शासनाच्या धोरणात्मक भूमिकेवर सडकून टीका केली. 

बाळापुर मतदार संघातील खारपाणपट्ट्यात समाविष्ट होणाऱ्या ६९ गावांमध्ये गोड्या पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने खारेपाणी प्यावे लागत आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांना किडनीचे विकार जडले असून त्यामुळे अनेकांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाण धरणातून २२० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. योजनेचे काम ६० टक्के पूर्ण झाले असताना भाजपच्या काही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेला स्थगिती दिली. ही स्थगिती उठविण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी १० एप्रिल पासून अकोला ते नागपूर पायी संघर्ष यात्रेला प्रारंभ केला. ही यात्रा २० एप्रिल रोजी नागपूरच्या सीमेवर पोहोचली असतानाच आमदार देशमुख यांच्यासह असंख्य शिवसैनिकांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. आमदार देशमुख यांना पोलीस व्हॅनमध्ये तसेच इतर शिवसैनिकांना लक्झरी बसेसद्वारे अकोला शहरात दुपारी परत आणले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. 

पालकत्व घेतले म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो! -देवेंद्र फडणवीस हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.  खारपाणपट्ट्यात लहान मुले, गर्भवती माता, व वयोवृद्ध नागरिकांना क्षारयुक्त पाण्यामुळे अनेक प्रकारचे विकार जडले आहेत. गोड पाण्याविना या भागातील नागरिकांचे अतोनात हाल होत असल्यामुळे तुम्ही सुद्धा खाऱ्या पाण्याची चव घ्यावी व त्यानंतर स्थगिती उठवावी, अशी आमची भावना होती. फडणवीस यांनी पालकत्व घेतल्यामुळेच आम्ही तीव्र उन्हात अकोला ते नागपूर पायी यात्रा काढली. ते आमच्या भावना समजून घेतील अशी अपेक्षा होती; परंतु पालकमंत्र्यांनी आमची भेट घेण्याचे औचित्य न दाखविता पोलीस बळाचा वापर करून आम्हाला ताब्यात घेतले. ही बाब लक्षात घेता पालकमंत्री अत्यंत असंवेदनशील व अहंकारी वृत्तीचे असल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी यावेळी केला. 

अन्यथा हीच संघर्ष यात्रा दिल्ली पर्यंत घेऊन जाणार -अकोला शहरात अंध पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या अंध पत्नीवर तीन वेळा बलात्कार केला जातो. जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या चार मुलींचे त्याच शाळेतील दोन नराधम शिक्षकांकडून लैंगिक शोषण केले जाते. पारस येथील मंदिरात आरती करत असताना वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून त्यामध्ये सात भाविकांचा मृत्यू होतो. जिल्ह्यात अशा घटना घडत असताना पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्याकडे साधे ढुंकूनही पाहिले नाही.  गृहमंत्री म्हणून ते सपशेल अपयशी ठरल्याची टीका करीत, पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती आठ दिवसात न हटविल्यास ही संघर्ष यात्रा थेट दिल्लीपर्यंत घेऊन जाणार असल्याचा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला.अकोल्यात शिवसैनिकांचे शक्ती प्रदर्शन -आमदार देशमुख यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त कळताच शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शिवसैनिकांनीजोरदार शक्ती प्रदर्शन केले. पोलीस व्हॅनमध्ये आमदार देशमुख अकोल्यात आले असता पोलिसांचा ताफा अडवत शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

टॅग्स :AkolaअकोलाNitin Deshmukhनितीन देशमुखShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस