शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

मृत्यूदर कमी करण्यासाठी आता ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 10:51 AM

राज्यभरात या मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्याकरिता आता राज्यभरात ‘माझे कुटुंब-माझी जबाबादारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या मोहिमेची जनतेच्या सहभागातून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील कोविड-१९ रुग्णालयांमध्ये होणाºया रुग्णांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यानुषंगाने यापुढे कोरोना विषाणूचा संसर्ग आणि मृत्यूदर नियंत्रित करण्यासाठी जनतेच्या सहभातून उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभर ‘माझे कुटुंब-माझी जबाबादारी’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, ही मोहीम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे निर्देश शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना ११ सप्टेंबर रोजी पत्राद्वारे दिले आहेत. त्यानुसार १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाºया ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे, वस्त्या व तांडे यातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी, दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना उपचार आणि प्रत्येक नागरिकास भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. मोहिमेच्या कालावधीत गृहभेटी देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक आरोग्य पथकांची संख्या निश्चित करण्यात आली असून, एका पथकात एक आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक सरपंच, नगरसेवकांनी निश्चित केलेले दोन स्वयंसेवक असणार आहेत. पथकातील या सदस्यांना ‘कोरोना दूत’ असे संबोधण्यात येणार आहे. एक पथक दररोज ५० घरांना भेटी देणार असून, त्यामध्ये घरातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी तसेच दुर्धर आजाराच्या व्यक्तींची माहिती घेण्यात येणार आहे. ताप, खोकला, दम लागणे इत्यादी कोरोनासदृश लक्षणे असणाºया व्यक्तींना जवळच्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये संदर्भित करण्यात येणार आहे. तेथे चाचणी करून पुढील उपचार करण्यात येणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्यभरात या मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका इत्यादी यंत्रणांमार्फत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.- संजय खडसेनिवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या