शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

मुस्लिमांच्या नागरिकत्वाला धोका नाही - दयाशंकर तिवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 10:26 IST

सीएए कायदा व एनआरसीमुळे मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही, असे मत सीएए कायद्याचे अभ्यासक व नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी येथे व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: काँग्रेस, कम्युनिस्ट नेते सीएए, एनआरसीला विरोध करून जाती, धर्मांमध्ये विद्वेष निर्माण करीत आहेत. मुस्लीम समुदायाला भडकाविण्याचे काम करण्यात येत आहे. मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व देण्याचे, देशाबाहेर काढण्यासारखे चुकीचे संदेश काँग्रेसकडून पसरविल्या जात आहेत. सीएए कायदा व एनआरसीमुळे मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही, असे मत सीएए कायद्याचे अभ्यासक व नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी येथे व्यक्त केले.राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीने सीएए, एनआरसीच्या समर्थनार्थ रविवारी मुंगीलाल बाजोरिया प्रांगण ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या विशाल रॅलीचा समारोप करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे, माजी राज्यमंत्री व आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, लक्ष्मीनारायण दायमा महाराज, रा.स्व. संघाचे विभाग संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे, महापौर अर्चना मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, डॉ.नानासाहेब चौधरी, शशांक जोशी, समीर थोटगे, निशिकांत देशपांडे, प्रा. विवेक बिडवई आदी होते.दयाशंकर तिवारी म्हणाले की, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदायावर अत्याचार झाले. पाकिस्तानमधील हिंदू, शीख समुदायाचा प्रचंड छळ करण्यात आला. त्यांचे धर्मांतर करण्यात आले; परंतु भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत. आम्ही राष्ट्रासोबत उभे राहणारे लोक आहोत. राष्ट्राच्या नावाने राजकारण करणारे नाहीत. या तीन देशांमधील अल्पसंख्यांक धर्माच्या लोकांना भारत नागरिकत्व देण्यास तयार आहे, असे सांगत, तिवारी यांनी अतिथी देवो भव: ही आमची संस्कृती आहे. आम्ही पारसी, पोर्तुगिजांना आश्रय दिला. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना आश्रय दिला. आदराने जो येईल त्याचा आम्ही सन्मान करू; परंतु जो आमच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्याला जागा दाखवू. काँग्रेस, कम्युनिस्ट नेते सीएए, एनआरसीचे राजकारण करून मुस्लीम समुदायाची दिशाभूल करीत आहे. सीएए, एनआरसीमुळे मुस्लीम बांधवांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी चिंता करू नये, असे स्पष्ट करीत, तिवारी म्हणाले की, सीएए कायदा हा अडीच वर्षांच्या चर्चेनंतर संसदीय समितीने मंजूर केला आणि विधेयक संसदेत मांडले. या संसदीय समितीमध्ये सर्वच पक्षांचे नेते होते. त्यावेळी त्यांनी विरोध केला नाही आणि आता जात, धर्माचे राजकारण करण्यासाठी सीएए, एनआरसी कायद्याला विरोध करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. सभेचे संचालन सिद्धार्थ शर्मा यांनी केले. राष्ट्रगितानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी