शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

‘रेटिंग’साठी महापालिकांची सेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 11:17 IST

Swachh Bharat Abhiyan : चांगले रेटिंग (गुणांकन) मिळावेत, यासाठी पथकातील सदस्यांसाेबत सेटिंग करण्यासाठी चांगलीच धावाधाव केली जात असल्याची माहिती आहे.

अकाेला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत कचरामुक्त शहराची संकल्पना राबविली जात आहे. त्या अनुषंगाने स्वच्छतेच्या कामांची केंद्रीय पथकांकडून पाहणी केली जात आहे. काही महापालिकांच्या स्तरावर चांगले रेटिंग (गुणांकन) मिळावेत, यासाठी पथकातील सदस्यांसाेबत सेटिंग करण्यासाठी चांगलीच धावाधाव केली जात असल्याची माहिती आहे. यामुळे केंद्रीय पथकांची विश्वासार्हता धाेक्यात आली आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत महापालिकांना पहिल्या टप्प्यात शहर हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. नागरिकांना वैयक्तिक शाैचालय बांधून दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शहरात निर्माण हाेणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे, त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताचे उत्पादन करणे तसेच केंद्रीय पथकामार्फत वेळाेवेळी शहरांमधील स्वच्छतेच्या कामांची पाहणी करून त्यांना गुणांकन (रेटिंग) देणे आदी निकषांचा समावेश आहे. मध्यंतरी काेराेनामुळे या तपासणीला ‘ब्रेक’ लागला हाेता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताच केंद्र शासनाचा चमू सरसावला असून ‘कचरामुक्त शहर’(जीएफसी-गारबेज फ्री सीटी) अंतर्गत शहरामधील स्वच्छतेच्या कामांची प्रत्यक्षात पाहणी केली जात आहे.

 

तपासणीनंतर गुणांकन

केंद्रीय पथकांमार्फत सार्वजनिक शाैचालये, उघड्यावर साचणाऱ्या कचऱ्याची ठिकाणे तसेच प्रभागातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली जात आहे. नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतर गुणांकन दिले जाणार आहे.

 

पथकांची बडदास्त राखताना कसरत

केंद्रीय पथकांनी चांगले गुणांकन द्यावेत, यासाठी महापालिकांच्या स्तरावर पथकांची बडदास्त राखली जात आहे. तीन वर्षांपूर्वी अकाेला मनपाच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालात अशा पथकासाठी स्वच्छता व आराेग्य विभागाने उच्चप्रतीची दारू खरेदी केल्याची पावती जाेडण्याचा उल्लेख केला हाेता हे विशेष.

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान