शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

‘रेटिंग’साठी महापालिकांची सेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 11:17 IST

Swachh Bharat Abhiyan : चांगले रेटिंग (गुणांकन) मिळावेत, यासाठी पथकातील सदस्यांसाेबत सेटिंग करण्यासाठी चांगलीच धावाधाव केली जात असल्याची माहिती आहे.

अकाेला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत कचरामुक्त शहराची संकल्पना राबविली जात आहे. त्या अनुषंगाने स्वच्छतेच्या कामांची केंद्रीय पथकांकडून पाहणी केली जात आहे. काही महापालिकांच्या स्तरावर चांगले रेटिंग (गुणांकन) मिळावेत, यासाठी पथकातील सदस्यांसाेबत सेटिंग करण्यासाठी चांगलीच धावाधाव केली जात असल्याची माहिती आहे. यामुळे केंद्रीय पथकांची विश्वासार्हता धाेक्यात आली आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत महापालिकांना पहिल्या टप्प्यात शहर हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. नागरिकांना वैयक्तिक शाैचालय बांधून दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शहरात निर्माण हाेणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे, त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताचे उत्पादन करणे तसेच केंद्रीय पथकामार्फत वेळाेवेळी शहरांमधील स्वच्छतेच्या कामांची पाहणी करून त्यांना गुणांकन (रेटिंग) देणे आदी निकषांचा समावेश आहे. मध्यंतरी काेराेनामुळे या तपासणीला ‘ब्रेक’ लागला हाेता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताच केंद्र शासनाचा चमू सरसावला असून ‘कचरामुक्त शहर’(जीएफसी-गारबेज फ्री सीटी) अंतर्गत शहरामधील स्वच्छतेच्या कामांची प्रत्यक्षात पाहणी केली जात आहे.

 

तपासणीनंतर गुणांकन

केंद्रीय पथकांमार्फत सार्वजनिक शाैचालये, उघड्यावर साचणाऱ्या कचऱ्याची ठिकाणे तसेच प्रभागातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली जात आहे. नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतर गुणांकन दिले जाणार आहे.

 

पथकांची बडदास्त राखताना कसरत

केंद्रीय पथकांनी चांगले गुणांकन द्यावेत, यासाठी महापालिकांच्या स्तरावर पथकांची बडदास्त राखली जात आहे. तीन वर्षांपूर्वी अकाेला मनपाच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालात अशा पथकासाठी स्वच्छता व आराेग्य विभागाने उच्चप्रतीची दारू खरेदी केल्याची पावती जाेडण्याचा उल्लेख केला हाेता हे विशेष.

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान