शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘रेटिंग’साठी महापालिकांची सेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 11:17 IST

Swachh Bharat Abhiyan : चांगले रेटिंग (गुणांकन) मिळावेत, यासाठी पथकातील सदस्यांसाेबत सेटिंग करण्यासाठी चांगलीच धावाधाव केली जात असल्याची माहिती आहे.

अकाेला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत कचरामुक्त शहराची संकल्पना राबविली जात आहे. त्या अनुषंगाने स्वच्छतेच्या कामांची केंद्रीय पथकांकडून पाहणी केली जात आहे. काही महापालिकांच्या स्तरावर चांगले रेटिंग (गुणांकन) मिळावेत, यासाठी पथकातील सदस्यांसाेबत सेटिंग करण्यासाठी चांगलीच धावाधाव केली जात असल्याची माहिती आहे. यामुळे केंद्रीय पथकांची विश्वासार्हता धाेक्यात आली आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत महापालिकांना पहिल्या टप्प्यात शहर हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. नागरिकांना वैयक्तिक शाैचालय बांधून दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शहरात निर्माण हाेणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे, त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताचे उत्पादन करणे तसेच केंद्रीय पथकामार्फत वेळाेवेळी शहरांमधील स्वच्छतेच्या कामांची पाहणी करून त्यांना गुणांकन (रेटिंग) देणे आदी निकषांचा समावेश आहे. मध्यंतरी काेराेनामुळे या तपासणीला ‘ब्रेक’ लागला हाेता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताच केंद्र शासनाचा चमू सरसावला असून ‘कचरामुक्त शहर’(जीएफसी-गारबेज फ्री सीटी) अंतर्गत शहरामधील स्वच्छतेच्या कामांची प्रत्यक्षात पाहणी केली जात आहे.

 

तपासणीनंतर गुणांकन

केंद्रीय पथकांमार्फत सार्वजनिक शाैचालये, उघड्यावर साचणाऱ्या कचऱ्याची ठिकाणे तसेच प्रभागातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली जात आहे. नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतर गुणांकन दिले जाणार आहे.

 

पथकांची बडदास्त राखताना कसरत

केंद्रीय पथकांनी चांगले गुणांकन द्यावेत, यासाठी महापालिकांच्या स्तरावर पथकांची बडदास्त राखली जात आहे. तीन वर्षांपूर्वी अकाेला मनपाच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालात अशा पथकासाठी स्वच्छता व आराेग्य विभागाने उच्चप्रतीची दारू खरेदी केल्याची पावती जाेडण्याचा उल्लेख केला हाेता हे विशेष.

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान