शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

तर महापालिकांचे अनुदान होणार बंद; शासनाचा निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:53 IST

अकोला : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवल्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात नव्याने ‘स्वच्छ  सर्वेक्षण-२0१८’ ही मोहीम राबवल्या जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत महापालिकांनी शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी किमान ८0 टक्के कचर्‍याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास त्यांना शासन स्तरावरून दिल्या जाणारी अनुदाने बंद करण्याचा निर्णय सोमवारी नगर विकास विभागाने घेतला आहे. 

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणांतर्गत घनकचर्‍यावर प्रक्रिया बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवल्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात नव्याने ‘स्वच्छ  सर्वेक्षण-२0१८’ ही मोहीम राबवल्या जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत महापालिकांनी शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी किमान ८0 टक्के कचर्‍याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास त्यांना शासन स्तरावरून दिल्या जाणारी अनुदाने बंद करण्याचा निर्णय सोमवारी नगर विकास विभागाने घेतला आहे. राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या घरी शौचालय नाही, त्यांचा शोध घेऊन त्यांना मनपा प्रशासनाच्या स्तरावर शौचालय बांधून देण्यात आले. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला. मोहिमेचा उद्देश सफल झाला की नाही, हे तपासण्यासाठी राज्य शासनाच्या चमूने संबंधित महापालिका क्षेत्राची तपासणी केली होती. ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानामध्ये शहर हगणदरीमुक्त करणार्‍या महापालिका, नगरपालिकांची घोषणा राज्य शासनाने केली होती. या मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता स्वच्छतेची मोहीम कायम सुरू ठेवण्यासाठी केंद्र शासनाने जानेवारी व फेब्रुवारीमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण-२0१८’ ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात केंद्र शासनाच्या चमूने विविध शहरातील स्वच्छतेच्या कामाची तपासणी केली असता काही शहरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळून आले होते. शिवाय, साठवणूक केलेल्या घनकचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे शहरांमध्ये कचर्‍याची समस्या निर्माण झाल्याचे चित्र तपासणीदरम्यान समोर आले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत नगर विकास विभागाने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानांतर्गत घनकचर्‍यावर तातडीने प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू न करणार्‍या महापालिकांचे अनुदान थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

कचर्‍यावर प्रभावी उपाय नाहीच!शहर मोठे असो वा लहान, दैनंदिन निघणार्‍या कचर्‍याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे शहरांमध्ये घनकचर्‍याची समस्या निर्माण झाली आहे. कचर्‍यावर थातूरमातूर प्रक्रिया करणारे अनेक मोठे प्रकल्प बंद पडले आहेत. त्यामुळे कमी खर्चात कचर्‍यावर प्रक्रिया शक्य झाल्यास ही समस्या निकाली निघण्यास मदत होणार असल्याचा सूर महापालिकांमधून उमटत आहे.

जागेवरच विलगीकरणाची अटशहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी निर्मितीच्या जागेवरच विलगीकरण केलेल्या कचर्‍यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची अट शासनाने बंधनकारक केली आहे. त्यासाठी ३0 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, तसेच स्वच्छ सर्वेक्षण-२0१८ मध्ये चांगले गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका