शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तर महापालिकांचे अनुदान होणार बंद; शासनाचा निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:53 IST

अकोला : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवल्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात नव्याने ‘स्वच्छ  सर्वेक्षण-२0१८’ ही मोहीम राबवल्या जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत महापालिकांनी शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी किमान ८0 टक्के कचर्‍याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास त्यांना शासन स्तरावरून दिल्या जाणारी अनुदाने बंद करण्याचा निर्णय सोमवारी नगर विकास विभागाने घेतला आहे. 

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणांतर्गत घनकचर्‍यावर प्रक्रिया बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवल्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात नव्याने ‘स्वच्छ  सर्वेक्षण-२0१८’ ही मोहीम राबवल्या जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत महापालिकांनी शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी किमान ८0 टक्के कचर्‍याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास त्यांना शासन स्तरावरून दिल्या जाणारी अनुदाने बंद करण्याचा निर्णय सोमवारी नगर विकास विभागाने घेतला आहे. राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या घरी शौचालय नाही, त्यांचा शोध घेऊन त्यांना मनपा प्रशासनाच्या स्तरावर शौचालय बांधून देण्यात आले. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला. मोहिमेचा उद्देश सफल झाला की नाही, हे तपासण्यासाठी राज्य शासनाच्या चमूने संबंधित महापालिका क्षेत्राची तपासणी केली होती. ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानामध्ये शहर हगणदरीमुक्त करणार्‍या महापालिका, नगरपालिकांची घोषणा राज्य शासनाने केली होती. या मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता स्वच्छतेची मोहीम कायम सुरू ठेवण्यासाठी केंद्र शासनाने जानेवारी व फेब्रुवारीमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण-२0१८’ ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात केंद्र शासनाच्या चमूने विविध शहरातील स्वच्छतेच्या कामाची तपासणी केली असता काही शहरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळून आले होते. शिवाय, साठवणूक केलेल्या घनकचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे शहरांमध्ये कचर्‍याची समस्या निर्माण झाल्याचे चित्र तपासणीदरम्यान समोर आले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत नगर विकास विभागाने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानांतर्गत घनकचर्‍यावर तातडीने प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू न करणार्‍या महापालिकांचे अनुदान थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

कचर्‍यावर प्रभावी उपाय नाहीच!शहर मोठे असो वा लहान, दैनंदिन निघणार्‍या कचर्‍याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे शहरांमध्ये घनकचर्‍याची समस्या निर्माण झाली आहे. कचर्‍यावर थातूरमातूर प्रक्रिया करणारे अनेक मोठे प्रकल्प बंद पडले आहेत. त्यामुळे कमी खर्चात कचर्‍यावर प्रक्रिया शक्य झाल्यास ही समस्या निकाली निघण्यास मदत होणार असल्याचा सूर महापालिकांमधून उमटत आहे.

जागेवरच विलगीकरणाची अटशहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी निर्मितीच्या जागेवरच विलगीकरण केलेल्या कचर्‍यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची अट शासनाने बंधनकारक केली आहे. त्यासाठी ३0 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, तसेच स्वच्छ सर्वेक्षण-२0१८ मध्ये चांगले गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका