शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दिवाळी निमित्त मुंबई-नागपूर विशेष रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:55 IST

दिवाळी निमित्ताने होणारी वाहतूक लक्षात घेत मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर मार्गावर या आठवड्यातील १५ आणि २२ ऑक्टोबर रोजी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे विदर्भातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देमध्य रेल्वेचा निर्णय विदर्भातील प्रवाशांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दिवाळी निमित्ताने होणारी वाहतूक लक्षात घेत मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर मार्गावर या आठवड्यातील १५ आणि २२ ऑक्टोबर रोजी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे विदर्भातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.रेल्वे क्रमांक 0१0७५ (मुंबई-नागपूर) रविवार, १५ आणि २२ ऑक्टोबर रोजी मुंबईहून रात्री 00.२0 वाजता नागपूरकडे निघेल. दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, मलकापूर, शेगाव होत ही गाडी अकोल्यात सकाळी ९ वाजता पोहोचणार आहे. बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा होत ही गाडी दुपारी १४ वाजता नागपूरला पोहोचणार आहे. परतीत रेल्वे क्रमांक्र 0१0७६ (नागपूर-मुंबई) गाडी सोमवार, १६ आणि २३ ऑक्टोबर रोजी १६ वाजून १५ मिनिटाला नागपूरहून निघेल. उपरोक्त स्थानकावर थांबा घेत ही रेल्वे रात्री २0.३५ वाजता अकोल्यात येईल. त्यानंतर मुंबईकडे रवाना होईल. सकाळी ८.१५ वाजता ही गाडी मुंबईत पोहोचणार आहे.

उधना-अलाहबाद विशेष सुपरफास्ट मध्य रेल्वेच्यावतीने उधना-अलाहबाद आणि वडोदरा-अहमदाबाद विशेष रेल्वे आठवड्यात धावणार आहेत. या रेल्वेच्या प्रवासासाठी भुसावळहून गाडी पकडावी लागेल. रेल्वे क्रमांक 0९0३९ ही गाडी १२ ऑक्टोबर ते २  नोव्हेंबरदरम्यान आठवड्यातील दर गुरुवारी धावणार आहे.

वडोदरा-अलाहबाद विशेष सुपरफास्टअलाहबादहून वडोदरादरम्यान साप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ट्रेन क्रमांक 0९१0३ क्रमांकाची (वडोदरा-अलाहबाद)  रेल्वे १५ ऑक्टोबर ते ५ नोंव्हेबरपर्यंत चालविली जाणार आहे.