शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

महावितरणने केला विक्रमी २२,३३० मेगावॅट वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:33 IST

राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढायला सुरुवात झाली आहे. सोबतच प्रामुख्याने कृषिपंपांद्वारे विजेचा वापरदेखील वाढला आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून ...

राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढायला सुरुवात झाली आहे. सोबतच प्रामुख्याने कृषिपंपांद्वारे विजेचा वापरदेखील वाढला आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ सुरू आहे. मात्र, मंगळवारी राज्यात मुंबईसह तब्बल २५ हजार २०३ मेगावॅट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून सुमारे २ कोटी ८० लाख ग्राहकांना आजवरच्या उच्चांकी २२ हजार ३३९ मेगावॅट विजेचा सुरळीत व अखंडित पुरवठा करण्यात आला. राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही, हे उल्लेखनीय.

उन्हाळ्यामुळे येत्या एप्रिल व मे महिन्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. त्याप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून तयारी सुरू आहे.

२१,५७० मेगावॅटचा विक्रम मोडला

महावितरणने १९ फेब्रुवारी २०२० रोजी उच्चांकी मागणीप्रमाणे आतापर्यंत २१ हजार ५७० मेगावॅट विजेचा विक्रमी पुरवठा केला होता. मंगळवारी हा विक्रम मोडीत निघाला.

अशी झाली वीज उपलब्ध

महावितरणला दीर्घकालीन करार असलेल्या महानिर्मितीकडून ७७६१ मेगावॉट, एनटीपीसी व एनपीसीआयएलकडून ४२१६ मेगावॉट, अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्ल्यू, साई वर्धा, एम्को आदींकडून ४२०२ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. सोबतच सौरऊर्जेद्वारे १९७४ मेगावॅटसह नवीन व नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांतून ३१६२ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. तसेच कोयना, घाटघर व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १७४० मेगावॅट, तर पॉवर एक्सचेंजमधील खरेदीसह मुक्त ग्राहक वीजनिर्मिती स्रोताद्वारे १२५८ मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे.