शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

गटबाजीचे प्रदर्शन टाळण्यासाठी  खासदार-नामदारांची भाषणे नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:31 IST

भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात पालकमंत्री व खासदार गटामधील गटबाजी हमखास समोर येते. या दोन्ही गटातील नेते भाषणाच्या ओघात एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करतात. यामुळे गटबाजी अधिक ठळकपणे अधोरेखित होत असल्याने, शुक्रवारी भाजपाच्या संघटनात्मक बैठकीत केवळ संघटनेतील पाच लोकांनाच भाषणाची संधी देऊन नामदार व खासदारांची भाषणे टाळण्याचा प्रकार घडला आहे. 

ठळक मुद्देभाजपच्या राष्ट्रीय महासचिवांनी घेतला प्रमुख पदाधिकार्‍यांचा वर्ग 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात पालकमंत्री व खासदार गटामधील गटबाजी हमखास समोर येते. या दोन्ही गटातील नेते भाषणाच्या ओघात एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करतात. यामुळे गटबाजी अधिक ठळकपणे अधोरेखित होत असल्याने, शुक्रवारी भाजपाच्या संघटनात्मक बैठकीत केवळ संघटनेतील पाच लोकांनाच भाषणाची संधी देऊन नामदार व खासदारांची भाषणे टाळण्याचा प्रकार घडला आहे. राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे भाजपच्या संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी अकोल्यात आल्या होत्या. त्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचा वर्ग घेत, संघटन कार्यावर प्रश्नांची सरबत्ती करून, पदाधिकार्‍यांना घाम फोडला. सरोज पांडे यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, अनेक आघाड्यांचे पदाधिकारी चाचपडत होते. सरोज पांडे यांनी भाजपच्या विविध आघाड्यांच्या कामाचा आढावा आणि त्यांच्या कामाची पद्धत जाणून घेतली. जे पदाधिकारी बैठकीला अनुपस्थित आहेत, त्यावर नाराजी व्यक्त करीत, नेते म्हणून पदे बळकावली. त्यांना घरचा रस्ता दाखवा, अशा शब्दात खडेबोल सुनावले.  यावेळी मंचावर खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, भाजपचे संघटनमंत्री उपेंद्र कोठीकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शहराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, अँड. मोतीसिंह मोहता व श्रावण इंगळे आदींची उपस्थिती होती.  या नेत्यांपैकी सरोज पांडे यांचे व्यतिरिक्त तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, रामदास आंबटकर, उपेंद्र कोठीकर यांनाच भाषणाची संधी मिळाली. त्यामुळे मंचावर उपस्थित लोकप्रतिनिधींना केवळ मंचावर स्थान ग्रहण करून बसून राहणे एवढेच कार्य उरले होते. संघटनात्मक आढावा असल्यामुळे संघटनेत काम करणार्‍या पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. हे सर्मथन पक्षपातळीवर कदाचित असू शकते मात्र, भाषणाच्या माध्यमातून मतभेद समोर येऊ नये म्हणूनच लोकप्रतिनिधींची भाषणे टाळली असावी, अशी चर्चा आता राजकीय वतरुळात सुरू झाली आहे. -