शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

महान धरणातील गाळ काढण्यासाठी मनपाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 15:04 IST

अकोला: शहरवासीयांना पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा (महान धरण)प्रकल्पासह शहरानजिकच्या कापशी तलावात साचलेल्या गाळामुळे धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देमहान धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, त्याचा परिणाम जलसाठ्यावर होत आहे. गाळ काढल्यास धरणातील पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ होईल, यात दुमत नाही. महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

- आशिष गावंडे

अकोला: शहरवासीयांना पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा (महान धरण)प्रकल्पासह शहरानजिकच्या कापशी तलावात साचलेल्या गाळामुळे धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत आहे. सद्यस्थितीत धरणातील अत्यल्प जलसाठा ध्यानात घेता, शहरावर जलसंकटाचे सावट आहे. उन्हाळ््यात महान धरण व कापशी तलावातील गाळ उपसल्यास जलसाठ्यात वाढ होईल, या विश्वासातून सत्ताधारी भाजपा व महापालिका प्रशासनाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंदर्भात महापौर विजय अग्रवाल यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे.अकोलेकरांना महान धरणातून पाणी पुरवठा केला जातो. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया केल्यानंतर ९०० व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे शहरवासीयांना पाणी उपलब्ध करून दिल्या जाते. गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे महान धरणातील जलसाठ्यात वाढ होऊ शकली नाही. परिणामी धरणात नऊ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जून महिन्यात पावसाची शक्यता वर्तविली जात असली, तरी तोपर्यंत अकोलेकरांना धरणातील मृतसाठ्यातून पाणी पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात, उन्हाळ््यात धरण कोरडे होणार असल्याचे निश्चित मानल्या जात आहे. महान धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, त्याचा परिणाम जलसाठ्यावर होत आहे. गाळ काढल्यास धरणातील पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ होईल, यात दुमत नाही. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तसा प्रस्ताव महापौर विजय अग्रवाल यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सादर केला असून, पाटबंधारे विभागाकडून तशी रीतसर परवानगी घेतल्याची माहिती आहे.मनपाकडून जलजागृती सप्ताहसंभाव्य जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर मनपा प्रशासनाने १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. नळ कनेक्शन वैध करून घेतल्यास वैधतेच्या रकमेच्या बदल्यात लागणाºया रकमेतून २५ टक्के रक्कम माफ केली जाईल. तसेच हातपंप, सबमर्सिबल पंपाजवळ जलपुनर्भरणाची उपाययोजना केल्यास मनपातर्फे १२५० रुपये अनुदान दिले जाणार आहे. जलवाहिनी फुटल्यास जलप्रदाय विभागातील अधिकाºयांसह १८००२३३५७३३ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण