शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महान धरणातील गाळ काढण्यासाठी मनपाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 15:04 IST

अकोला: शहरवासीयांना पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा (महान धरण)प्रकल्पासह शहरानजिकच्या कापशी तलावात साचलेल्या गाळामुळे धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देमहान धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, त्याचा परिणाम जलसाठ्यावर होत आहे. गाळ काढल्यास धरणातील पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ होईल, यात दुमत नाही. महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

- आशिष गावंडे

अकोला: शहरवासीयांना पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा (महान धरण)प्रकल्पासह शहरानजिकच्या कापशी तलावात साचलेल्या गाळामुळे धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत आहे. सद्यस्थितीत धरणातील अत्यल्प जलसाठा ध्यानात घेता, शहरावर जलसंकटाचे सावट आहे. उन्हाळ््यात महान धरण व कापशी तलावातील गाळ उपसल्यास जलसाठ्यात वाढ होईल, या विश्वासातून सत्ताधारी भाजपा व महापालिका प्रशासनाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंदर्भात महापौर विजय अग्रवाल यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे.अकोलेकरांना महान धरणातून पाणी पुरवठा केला जातो. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया केल्यानंतर ९०० व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे शहरवासीयांना पाणी उपलब्ध करून दिल्या जाते. गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे महान धरणातील जलसाठ्यात वाढ होऊ शकली नाही. परिणामी धरणात नऊ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जून महिन्यात पावसाची शक्यता वर्तविली जात असली, तरी तोपर्यंत अकोलेकरांना धरणातील मृतसाठ्यातून पाणी पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात, उन्हाळ््यात धरण कोरडे होणार असल्याचे निश्चित मानल्या जात आहे. महान धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, त्याचा परिणाम जलसाठ्यावर होत आहे. गाळ काढल्यास धरणातील पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ होईल, यात दुमत नाही. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तसा प्रस्ताव महापौर विजय अग्रवाल यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सादर केला असून, पाटबंधारे विभागाकडून तशी रीतसर परवानगी घेतल्याची माहिती आहे.मनपाकडून जलजागृती सप्ताहसंभाव्य जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर मनपा प्रशासनाने १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. नळ कनेक्शन वैध करून घेतल्यास वैधतेच्या रकमेच्या बदल्यात लागणाºया रकमेतून २५ टक्के रक्कम माफ केली जाईल. तसेच हातपंप, सबमर्सिबल पंपाजवळ जलपुनर्भरणाची उपाययोजना केल्यास मनपातर्फे १२५० रुपये अनुदान दिले जाणार आहे. जलवाहिनी फुटल्यास जलप्रदाय विभागातील अधिकाºयांसह १८००२३३५७३३ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण