शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

महान धरणातील गाळ काढण्यासाठी मनपाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 15:04 IST

अकोला: शहरवासीयांना पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा (महान धरण)प्रकल्पासह शहरानजिकच्या कापशी तलावात साचलेल्या गाळामुळे धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देमहान धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, त्याचा परिणाम जलसाठ्यावर होत आहे. गाळ काढल्यास धरणातील पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ होईल, यात दुमत नाही. महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

- आशिष गावंडे

अकोला: शहरवासीयांना पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा (महान धरण)प्रकल्पासह शहरानजिकच्या कापशी तलावात साचलेल्या गाळामुळे धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत आहे. सद्यस्थितीत धरणातील अत्यल्प जलसाठा ध्यानात घेता, शहरावर जलसंकटाचे सावट आहे. उन्हाळ््यात महान धरण व कापशी तलावातील गाळ उपसल्यास जलसाठ्यात वाढ होईल, या विश्वासातून सत्ताधारी भाजपा व महापालिका प्रशासनाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंदर्भात महापौर विजय अग्रवाल यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे.अकोलेकरांना महान धरणातून पाणी पुरवठा केला जातो. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया केल्यानंतर ९०० व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे शहरवासीयांना पाणी उपलब्ध करून दिल्या जाते. गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे महान धरणातील जलसाठ्यात वाढ होऊ शकली नाही. परिणामी धरणात नऊ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जून महिन्यात पावसाची शक्यता वर्तविली जात असली, तरी तोपर्यंत अकोलेकरांना धरणातील मृतसाठ्यातून पाणी पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात, उन्हाळ््यात धरण कोरडे होणार असल्याचे निश्चित मानल्या जात आहे. महान धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, त्याचा परिणाम जलसाठ्यावर होत आहे. गाळ काढल्यास धरणातील पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ होईल, यात दुमत नाही. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तसा प्रस्ताव महापौर विजय अग्रवाल यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सादर केला असून, पाटबंधारे विभागाकडून तशी रीतसर परवानगी घेतल्याची माहिती आहे.मनपाकडून जलजागृती सप्ताहसंभाव्य जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर मनपा प्रशासनाने १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. नळ कनेक्शन वैध करून घेतल्यास वैधतेच्या रकमेच्या बदल्यात लागणाºया रकमेतून २५ टक्के रक्कम माफ केली जाईल. तसेच हातपंप, सबमर्सिबल पंपाजवळ जलपुनर्भरणाची उपाययोजना केल्यास मनपातर्फे १२५० रुपये अनुदान दिले जाणार आहे. जलवाहिनी फुटल्यास जलप्रदाय विभागातील अधिकाºयांसह १८००२३३५७३३ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण