शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

समायाेजनाचा तिढा निकाली काढण्यासाठी मनपाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 11:22 IST

Akola Municipa Corporation News : कर्मचाऱ्यांसाेबत साेमवार, १९ जुलै राेजी मनपात बैठकीचे आयाेजन केले आहे.

अकाेला : मनपाच्या हद्दवाढ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समायाेजनाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याप्रकरणी काही कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली असता न्यायालयाने मनपाने सुरू केलेल्या प्रक्रियेला ‘जैसे थे’चा आदेश दिला. समायाेजनाचा तिढा निकाली काढण्याच्या अनुषंगाने मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी हालचाली सुरू केल्या असून यासंदर्भात याचिका दाखल केलेल्या कर्मचाऱ्यांसाेबत साेमवार, १९ जुलै राेजी मनपात बैठकीचे आयाेजन केले आहे. महापालिकेची २०१६ मध्ये हद्दवाढ करण्यात आली. यामध्ये शहरालगतच्या १३ ग्रामपंचायती व त्यामध्ये सामील असलेल्या २४ गावांचा समावेश आहे. यामध्ये तत्कालीन ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सुमारे ८६ कर्मचाऱ्यांचे समायाेजन करणे अपेक्षित हाेते. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मूळ नियुक्तीचा दाेनदा अहवाल सादर केला. याची मनपाने पडताळणी केली असता काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती निकषानुसार करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासनाने ८६ कर्मचाऱ्यांमधून पात्र व अपात्र कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला. या प्रक्रियेच्या विराेधात गाैतम महादेव भगत यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.

 

३१ कर्मचारी पात्र; ३२ चे भविष्य टांगणीला

हद्दवाढ क्षेत्रातील ८६ पैकी सुमारे २१ कर्मचारी आकृतिबंधाच्या निकषात याेग्य ठरत नसल्याने त्यांची सेवा बंद करण्यात आली. ३१ कर्मचारी पात्र ठरले. दाेन कर्मचारी सेवानिवृत्त झाले. आता ३२ कर्मचाऱ्यांच्या समायाेजनाचा तिढा कायम आहे. संबंधितांचे मूळ दस्तऐवज तपासले असता वाढते वय पाहता आकृतिबंधात शिथिलता देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा मनपासमाेर पर्याय शिल्लक आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला