शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

वाहनांवर मोबाईलचा सर्रास वापर

By admin | Updated: May 19, 2014 20:45 IST

चालत्या वाहनावर मोबाईल वापरावर बंदी; पण अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात या नियमांचे सर्रास उल्लघंन .

गांधीग्राम (अकोला): चालत्या वाहनावर मोबाईल वापरावर बंदी असली तरी ग्रामीण भागात सर्रास या नियमांचे उल्लघंन होत आहे. पोलिसांसमक्ष मोबाईलचा दुचाकीवर वापर होत असताना एकही कारवाई पोलिसांकडून होत नसल्याने मोबाईल वापर करण्यार्‍यांची हिंमत वाढली आहे. सध्या बहुतेकांकडे दुचाकी आणि मोबाईल या गोष्टी अनिवार्य झाल्या आहेत. परंतु दुचाकीस्वारांचे एका हाताने गाडीचा हँडल आणि एका हाताने मोबाईलवर बोलत गर्दीतही भरधाव गाडी चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक पोलिस विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे धोक्याचे आहे. दुचाकी चालवताना मोबाईल वाजल्यास थांबून बोल असे घरच्यांकडून वारंवार सांगितल्या जाते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत वाहने चालविताना मोबाईलवर बोलणे वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा प्रकार शहरासह ग्रामीण भागातही वाढत आहे. आकोट-अकोला या वर्दळीच्या मार्गावरील गांधीग्राम, देवरी फाटा या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी असते. या मार्गाने काळीपिवळी, बस, ट्रक, दुचाकी आदी वाहने सुसाट धावतात. अशावेळी दक्षतेने वाहन चालवावे लागते. परंतु मोबाईलचा वाहनावर वापर होत असल्याने अनेक लहान-मोठे अपघात या मार्गावर घडत आहेत. जीवाला आणि दंडात्मक कारवाईलाही न घाबरणार्‍यांमध्ये तरुणाई आघाडीवर आहे. पण आपण दुसर्‍याच्या जीवाशी खेळत आहो, हे मात्र ते विचारात घेत नाहीत. एका हातामध्ये मोबाईल कानाला लावून हसत खेळत संवाद सुरू असतात. त्यामुळे केव्हाही तोल जाण्याची शक्यता असते. अशावेळी रस्ता गर्दीचा आहे, पाठीमागून कोणते वाहने येत आहे, याचाही अंदाज दुचाकीस्वार घेत नाही. खरे तर वाहन चालविताना मोबाईलवरून बोलणे म्हणजे गुन्हाच आहे. मात्र असा गुन्हा सर्रासपणे केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.