शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मोर्णा महोत्सव: आर्थिक व्यवहारांविषयी फाउंडेशनचे कोषाध्यक्षच अनभिज्ञ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:52 IST

अकोला: मोर्णा महोत्सव फाउंडेशन नामक संस्थेच्या माध्यमातून मोर्णा महोत्सव आयोजित करण्यात आला असला तरी, याचे खरे सूत्रधार हे जिल्हा प्रशासनच होते. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातच हा महोत्सव झाल्याची बाब समोर आली आहे.

अकोला: मोर्णा महोत्सव फाउंडेशन नामक संस्थेच्या माध्यमातून मोर्णा महोत्सव आयोजित करण्यात आला असला तरी, याचे खरे सूत्रधार हे जिल्हा प्रशासनच होते. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातच हा महोत्सव झाल्याची बाब समोर आली आहे. या महोत्सवाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात आला. त्यासाठी मोर्णा महोत्सव फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाचे आर्थिक पाठबळ मिळाले. फाउंडेशनचे कोषाध्यक्ष मोर्णा महोत्सवाच्या आर्थिक व्यवहारांविषयी अनभिज्ञ आहेत, हे विशेष.मोर्णा स्वच्छता अभियान यशस्वी झाल्यानंतर काही लोकांच्या डोक्यात मोर्णा महोत्सव फाउंडेशन नावाचे दुकान सुरू करण्याची कल्पना आली. जिल्हाधिकाºयांसमोर हा विषय मांडल्यानंतर त्यांनाही ही कल्पना आवडल्याने, मोर्णा महोत्सव फाउंडेशन नावाने नोंदणीकृत संस्थाच स्थापन करण्याचे ठरले. या संस्थेमध्ये अकोल्यातील कोणत्या व्यक्तींना घ्यायचे, याचेसुद्धा नियोजन झाले. पदाधिकारी ठरल्यानंतर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाºयांच्या पुढाकारातून मोर्णा महोत्सव फाउंडेशनची अधिकृत नोंदणी करण्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे अर्ज करण्यात आल्यानंतर एका दिवसातच या संस्थेची नोंदणी झाली आणि मोर्णा महोत्सवाच्या आयोजनासाठी अधिकृत वर्गणी गोळा करण्याची परवानगीच फाउंडेशनच्या नावाखाली जिल्हा प्रशासन व काही पदाधिकाºयांना मिळाली. मोर्णा महोत्सव फाउंडेशनचे पदाधिकारी आणि ही संस्था केवळ नावालाच आहे. त्यांच्या नावाखाली दुकानदारी करून कोट्यवधी रुपयांचा निधी उभा करण्यात आला; परंतु फाउंडेशनच्या पदाधिकाºयांनाच किती निधी जमा झाला, याची निश्चित माहिती नाही. यावरून जिल्हा प्रशासनाचे मोर्णा महोत्सव आयोजनामागील अर्थपूर्ण गौडबंगाल लक्षात येते. मोर्णा महोत्सव फाउंडेशन स्थापनेमागे सांस्कृतिक महोत्सव, मोर्णा नदी स्वच्छता अभियान, मोर्णा नदीचे सौंदर्यीकरण, ग्रामीण विकास योजना, मनपा, नपाच्या योजनांची अंमलबजावणी, जलसाक्षरता, जलसंधारण, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांना मदत, वृक्षारोपण, वृक्ष संगोपनासह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रम, पर्यटन महोत्सव, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, पुरस्कार वितरण यांसह इतर उद्देश निश्चित करण्यात आले; परंतु ठरविलेल्या उद्देशांनाच हरताळ फासण्याचा प्रयत्न पहिल्याच मोर्णा महोत्सवात जिल्हा प्रशासनाने केला. मोर्णा महोत्सवातून अकोलेकरांचे हित तर साधल्या गेलेच नाही, उलट मोर्णा महोत्सव फाउंडेशनच्या नावाने जिल्हा प्रशासन आणि फाउंडेशनच्या पदाधिकाºयांनी स्वहित मात्र साधले, असाच संदेश यातून गेला आहे. (प्रतिनिधी)

येथून चालला कारभार!मोर्णा महोत्सव फाउंडेशनची स्थापना झाली; परंतु या स्थापनेमध्ये पुढाकार असलेले डॉ. गजानन नारे हे फाउंडेशनमध्ये पदाधिकारी नाहीत; परंतु संस्था नोंदणी करताना, संस्थेचा पत्ता मात्र प्रभात किड्स, तोष्णीवाल ले-आउट हा देण्यात आला. मोर्णा महोत्सव आयोजनाचा सर्व कारभारसुद्धा येथूनच चालला. फाउंडेशनच्या बैठका, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सर्व काही याच कार्यालयातून ठरले.

 

टॅग्स :Akolaअकोला