शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सोयाबीनवर पाचपेक्षा अधिक किडींचे आक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 13:11 IST

या किडींचे व्यवस्थापन करताना शेतमजूर, शेतकऱ्यांना विषबाधांचे प्रकार वाढले आहेत.

अकोला : हवामानात सारखा होत असलेला बदल, पावसाची कमतरता हे प्रतिकूल वातावरण किडींना पोषक ठरत असून, सोयाबीनसह इतर सर्वच पिकांवर किडींनी आक्रमण केले. सोयाबीनवर तर पाच ते सहा अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडींचे व्यवस्थापन करताना शेतमजूर, शेतकऱ्यांना विषबाधांचे प्रकार वाढले आहेत. तसेच शेतकºयांचा कीटकनाशकांच्या नियंत्रणासाठी फवारणीचा खर्च वाढला आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसात अनियमितता सुरू असून, २३ जून रोजी आल्यांनतर थेट २५ जुलै रोजी पाऊस बरसला. त्यानंतर तुरळक स्वरू पाचा पाऊस अधून-मधून सुरू आहे. मध्येच कमाल तापमान वाढत असून, उन्हाचे चटके, दमट वातावरण तयार होत आहे. हेच वातावरण किडींना पोषक ठरत असल्याने यावर्षी सुरुवातीपासूनच शेतकºयांना कीड व्यवस्थापनावर खर्च करावा लागत आहे. सोयाबीन पिकावर सध्या काळ्या रंगाच्या अळीसह हिरवी उंटवर्गीय अळी, तंबाखूची पाने खाणारी अळी, चक्रभुंगा आदी अळ्या, किडींनी आक्रमण केले आहे.कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून, ज्यांनी रेफ्युजीची पेरणी केली, तिथे हे प्रमाण सध्या कमी आहे; परंतु ज्या ठिकाणी उपाययोजना केल्या नाहीत, तेथे बोंडअळी वाढण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व कपाशीवर यावर्षीही बोंडअळीने बस्तान मांडल्याने त्या शेतकºयांना चांगलीच दक्षता घ्यावी लागत आहे. हीच अळी नियमित खरीप कपाशीवर येण्याचे प्रकार मागच्या काही वर्षांत घडले. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात ही अळी या कपाशीवर दिसून येते, तेव्हा शेतकºयांना दक्षता घेण्याची गरज आहे.

 सोयाबीन पिकावर चार ते पाच अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या तुलनेत कपाशीवर बोंडअळीचे प्रमाण कमी आहे. असे असले तरी या दोन्ही मुख्य पिकांवरील कीड, अळ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकºयांनी शेताचे नियमित सर्वेक्षण करू न कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीटकनाशके फवारणी करावी.- डॉ. अनिल कोल्हे,मुख्य पीक संरक्षण अधिकारी,कीटकशास्त्र विभाग,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी